शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

सात-बारा कोरा कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 6:40 AM

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नवा नाही. मराठवाड्याच्या लातूर, उस्मानाबाद, बीड आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

राजेंद्र दर्डा, एडीटर- इन- चिफ,  लोकमत वृत्तपत्र समूह
 
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नवा नाही. मराठवाड्याच्या लातूर, उस्मानाबाद, बीड आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. बीडमध्ये पाच जणांचा जीव गेला. याशिवाय हाता-तोंडाशी आलेला गहू, हरभरा, ज्वारीची दाणादाण झाली. आंबा गेला आणि शेतकरी पुन्हा नागवा झाला. अशा नियमित येणाऱ्या संकटांना सामोरे जात शेती करावी लागते व पीक हाती आलेच तर बाजार पडलेला असतो. कधी दुष्काळ भाजून काढतो. अर्थ एकच शेतकऱ्याची अवस्था पीक हाती येऊन आणि न येऊन सारखीच असते. महाराष्ट्रात १९८६ साली यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने पत्नी आणि चार मुलांसह आत्महत्या केली. ही पहिली घटना होती. तेव्हापासून सुरू झालेले सत्र तीस वर्षांत थांबले नाही. गेल्या सोळा वर्षांत महाराष्ट्रात तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केवळ कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविले. आपण कोणाचे तरी देणे लागतो; पण परतफेड करू शकत नाही. त्यामुळे होणारी मानहानी आणि घुसमटीतून तो मरण पत्करतो. ही घटनाच ‘शेतकरी राजा’ मानणाऱ्या महाराष्ट्रात भयानक आहे. आता शेतकऱ्याची आत्महत्या गंभीरपणे कोणी घेत नाही इतक्या संवेदना बोथट झाल्या. या दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी २००८ साली केंद्रातील काँग्रेसच्या पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने कर्जमाफी दिली तब्बल ६० हजार कोटींची! उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील असमतोलामुळे परिस्थिती काही सुधारली नाही. शेती व शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी पुन्हा एकदा सरकारने त्याचा सात-बारा कोरा करण्याची गरज निर्माण झाली आहे. या मुद्यावर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष आक्रमक असतानाच सरकारमधील घटक पक्ष असलेली शिवसेनाही आक्रमक झाली आहे. सत्ताधारी भाजपचाही विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही तेवढेच संवेदनशील आहेत, त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या जवळून पाहिल्या आहेत. उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पंतप्रधानांचा शब्द असल्याने ते पूर्ण होईलच. महाराष्ट्रात तर सरकार आणि विरोधी पक्ष साऱ्यांचीच ही मनोधारणा असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास कोणती आडकाठी आहे? देशातील दहा बड्या उद्योगपतींकडे असलेल्या थकीत कर्जाचा आकडा पाहता यातील एकाच्या थकबाकीएवढेच महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज असेल. आजही ६० टक्के रोजगार शेतीवरच अवलंबून आहे; सरकारने या अधिवेशनातच कर्जमाफीची घोषणा करून शेती व शेतकऱ्याला उभारी दिली तर दोघेही वाचतील. उत्तर प्रदेशात सात-बारा कोरा होत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रात का नाही?