शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उथळ राजकारण हा देशाला लागलेला रोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 03:51 IST

खरे तर टीकाटिप्पणी आणि चर्चा हा लोकशाहीचा पंचप्राण आहे. मात्र ही चर्चा कोणत्या विषयांची, कोणत्या दर्जाची किंवा कोणत्या पातळीवर जाऊन केली जाते, यावरच त्या समाजातील किंवा देशातील लोकशाहीचे किंवा तिला येणाऱ्या यशापयशाचे गणित अवलंबून असते, हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही.

- डॉ. रविनंद होवाळ  (प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान)सुमारे सहा महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांसमवेत निवडणूक प्रचारात उतरलेल्या आणि वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून आमदारकी मिळविलेल्या एका भाजप सदस्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालेले आहे. खरे तर टीकाटिप्पणी आणि चर्चा हा लोकशाहीचा पंचप्राण आहे. ‘चर्चेतून चालणारे शासन म्हणजे लोकशाही’ असे लोकशाहीबाबत आपण मोठ्या अभिमानाने सांगतो! मात्र ही चर्चा कोणत्या विषयांची, कोणत्या दर्जाची किंवा कोणत्या पातळीवर जाऊन केली जाते, यावरच त्या समाजातील किंवा देशातील लोकशाहीचे किंवा तिला येणाऱ्या यशापयशाचे गणित अवलंबून असते, हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही.शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, असे मत संबंधित सदस्याने व्यक्तकेलेले आहे. त्यांचे हे मत कितपत खरे आणि कितपत खोटे, हे शोधण्याचा कोणताही फुलप्रूफ मार्ग आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र, कोणत्याही एका समाजात केवळ एखादीच व्यक्ती कोणत्याही संपूर्ण दोषाला जबाबदार ठरू शकत नाही. जर ती व्यक्ती दोषी असेल, तर तिच्या आजूबाजूची, तिचे समर्थन करणारी व तिचा विरोध करणारी अशी विविध प्रकारची माणसे, संस्था, संघटना असे अनेकजण अशा दोषात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की दुर्दैवाने आपल्या भारतीय समाजाची एकंदर रचनाच अशा प्रकारची झालेली आहे, की कोणत्याही एका विचाराला, एका मार्गाला, एका व्यक्तीला किंवा एका संघटनेला आपल्या सर्वांचे समर्थन लाभू शकत नाही. अशा परिस्थितीत समाजकारण किंवा राजकारणात पडलेला कोणताही माणूस एकच एक भूमिका घेऊन सतत चालू शकत नाही. परिस्थितीप्रमाणे कधी इकडे, तर कधी तिकडे त्याला उडी मारावी लागते. अशा वेळी अनेकदा माणूस नव्हे, तर त्याच्या आजूबाजूला उत्पन्न झालेल्या परिस्थितीकडे खरा दोष जातो. त्यामुळे समाजकारण किंवा राजकारणातील कोणत्याही व्यक्तीबाबत जाहीर विधाने करताना आपण सर्वांनी काही किमान मर्यादा ही पाळलीच पाहिजे.महाराष्ट्रातील काय किंवा देशभरातील काय, सध्याचे राजकारण हे मोठ्या प्रमाणात उथळपणाकडे झुकलेले आहे. एकेकाळी या देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, बॅ. चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे यांच्यासारख्या अत्यंत विद्वान आणि प्रगल्भ राजकारण्यांचे व समाजकारण्यांचे राजकारण आणि समाजकारण पाहिलेले आहे. यांच्यातील अनेकांच्या विचारांकडे आणि कार्याकडे पाहताना यांना राजकारणी म्हणावे की समाजकारणी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असे! आजही पडतो! हा काळ खरे तर फार जुना झालेला नाही. फार तर पाऊण किंवा एखाद्या शतकापूर्वीचा आहे.केवळ पाचपन्नास किंवा शंभरेक वर्षांत एखाद्या देशातील राजकारणाची इतकी मोठी अधोगती होऊ शकते, यावर आपल्या देशाबाहेरील कोणाचा कदाचित विश्वासही बसणार नाही; पण हे सत्य आहे आणि याला आपण सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरलेलो आहोत! लोकशाही ही तशीही सामूहिक जबाबदारी स्वीकारणारी शासनपद्धती किंवा जीवनपद्धती असते, हे तर आपल्या सर्वांना मान्य आहेच! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘शरद पवार हे आमचे विरोधक आहेत; शत्रू नाहीत!’ अशी जाहीर भूमिका या अनुषंगाने व्यक्तकेलेली आहे. ही भूमिका अत्यंत योग्य आणि निरोगी अशी आहे. एकेकाळी आपण सर्वजण एकमेकांशी मोठे वैर धरत असू! पारतंत्र्य, मागासलेपणा, कमकुवतपणा अशा अनेक अनिष्ट गोष्टी यातून आपल्या वाट्याला आल्या. अनिष्ट गोष्टींची ही अनिष्ट फळे भोगल्यानंतर आता आपण एक स्वतंत्र आणि सार्वभौम समाज किंवा देश म्हणून उदयास आलेलो आहोत! अशा परिस्थितीत आपण आता एकमेकांचे शत्रू राहिलेलो नसून, फार तर काही मुद्द्यांच्या अनुषंगाने एकमेकांचे ‘वैचारिक’ विरोधक उरलेलो आहोत.देशातील सर्व लोक, सर्वच नेते, कार्यकर्ते, पक्ष, संस्था, संघटना आदींनी हे सत्य आता ओळखले पाहिजे व एकमेकांबाबत न्याय्य भूमिका घेतली पाहिजे! मात्र केवळ समोरच्याचे तोंड बंद करण्यासाठी, वेळ मारून नेण्यासाठी किंवा राजकारणातील एक ट्रिक म्हणून आपण अशा गोष्टी करता कामा नयेत! एकमेकांच्या चांगल्या कार्याला मनापासून दाद देण्यात, चुकलेल्या गोष्टींबाबत निर्भीड मतप्रदर्शन करण्यात, ते करताना मर्यादांचे भान ठेवण्यात आणि मुख्य म्हणजे महत्त्वाच्या प्रश्नांची अभ्यासपूर्वक सखोल चर्चा करण्यात व त्यातून सामंजस्याने मार्ग काढण्यातच आपले सर्वांचे शाश्वत हित सामावलेले आहे.

टॅग्स :democracyलोकशाहीIndiaभारतPoliticsराजकारण