शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
4
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
5
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
6
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
7
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
8
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
9
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
10
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
11
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
12
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
13
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
14
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
15
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
16
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
17
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
18
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
19
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
20
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार

शिवार व्हावं आबादानी!

By admin | Published: June 16, 2017 4:16 AM

बळीराजाने रस्त्यावर उतरून जेव्हा त्याचा आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा सारेच हबकले होते. कारण आपल्या साऱ्यांचा पोशिंदा तो.

बळीराजाने रस्त्यावर उतरून जेव्हा त्याचा आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा सारेच हबकले होते. कारण आपल्या साऱ्यांचा पोशिंदा तो. तोच जर असा जगण्यावर रुसला तर कसं होणार? पण वर्षानुवर्षे चालत आलेली कमालीची राजकीय अनास्था आणि स्वार्थलोलुप राजकारण यामध्ये हा शेतकरी नुसताच भरडला जात होता हे वास्तव होतं. उत्पादनखर्चही निघेना, हमीभाव मिळेना, जगण्यासाठी कर्ज घेऊन त्याचं ओझं वागवू लागला. तेही डोईजड झालं तेव्हा त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि सहन न होणाऱ्या त्रासातून स्वत:ला मुक्त केलं. पण या परिस्थितीविरुद्ध पहिल्यांदाच तो एल्गार करून उठला आणि थेट रस्त्यावर उतरला. असाही उत्पादन केलेला माल पडून सडतोय. तो त्याने चक्क रस्त्यावर फेकला. दुधाचे टँकर रस्त्यावर रिते केले आणि आपल्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. अर्थात त्यातही ओघाने राजकारण घुसलेच. मात्र ही परिस्थिती चिघळेल असे वाटत असताना शासनाला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले आणि कर्जमाफीपासून इतर अनेक शेतकरी हक्काच्या घोषणा झाल्या आणि शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले. हे आंदोलन योग्य वेळी थांबले कारण बळीराजाच्या डोळ्यांसमोर होता पेरणीचा काळ. काळी माती त्याची वाट पाहत होती. आंदोलन थांबले आणि पोशिंदा पुन्हा मातीतून सोनं काढण्यासाठी सज्ज झाला. योगायोग पहा, हे सारे चित्र बदलत असताना अगदी मोक्याच्या क्षणी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. बरोबर ठरल्या मुहूर्तावर येऊन सगळीकडे बरसला. त्याच्या आगमनानेच शुभशकुनाची ग्वाही दिली. शेतकरी दुहेरी आनंदाने मनोमन सुखावला. गेले वर्ष त्याला तसे त्रास देणारेच ठरले होते. पाणीटंचाईने लोकांचे हाल होत होते. अनेक भागांत पाणी नव्हते. नद्या, तलाव, विहिरी, ओढे सारे काही कोरडेठाक पडलेले होते आणि पाऊस लांबलेला होता. त्यात भरीस भर शेतकऱ्यांचे न सुटणारे प्रश्न होतेच. त्यामुळे यंदा काय होणार याकडे शेतकरी डोळे लावून बसलेला होता. त्याला योग्य वेळी आलेल्या पावसाने चांगला दिलासा दिला आहे. घाम गाळून शेतातून समृद्धी आणणारा प्रत्येक शेतकरी आता कष्टाने, जिद्दीने आणि नेटाने पुन्हा पीक पीकवणार आहे. साऱ्या बळीराजांचं शिवार आबादानी व्हावं हीच प्रत्येकाची सद्भावना आहे.