शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पशुपक्ष्यांना फटका!

By admin | Published: December 21, 2014 12:23 AM

जसा फटका जमिनीला, पिकाला आणि शेतकरी वर्गाला बसतो, तसाच किंवा तेवढाच गारपिटीचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतो.

वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात दरवर्षी गारपीट होते आहे. त्याचा जसा फटका जमिनीला, पिकाला आणि शेतकरी वर्गाला बसतो, तसाच किंवा तेवढाच गारपिटीचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतो. दुर्दैवाने गारपिटीमध्ये ज्यांना स्वत:चे संरक्षण करता येत नाही, अशा पशुपक्ष्यांचा मृत्यू होतो आहे.रपीट होण्यापूर्वी वातावरणात बदल होत असतात. हे बदल काही प्रमाणात पशुपक्षी, किटक, सरपटणारे जीव यांना कळत असतात. कालांतराने पशू गुहेचा आसरा घेतात आणि सरपटणारे जीव बिळांचा आसरा घेतात. शिवाय काही पक्षी वातावरणातील बदल लक्षात येताच संबंधित ठिकाणांहून उडून जातात. परंतु जे पक्षी झाडांवर घरटी करून राहतात. उदा. बगळे, कावळे, मैना, पोपट आणि करकोचा अशा पक्ष्यांचा गारपिटीच्या फटक्याने मृत्यू होतो. कारण हे पक्षी घरट्यातील अंडी, आपली पिल्ले यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. तर काही पक्षी शेकडोच्या संख्येने झाडावरच रात्र काढतात. अशावेळी या गारपिटीचा त्यांना देखील वाईट फटका बसतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत स्थलांतरित पक्षी आपल्याकडे येत असतात. हजारो मैलांचा प्रवास करून हे पक्षी आपल्याकडे दाखल होत असतात. एवढ्या मोठ्या प्रवासाने ते थकलेले आणि भुकेलेले असतात. या पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणपक्ष्यांचा समावेश असतो. याच काळात ते विश्रांतीसाठी एखाद्या तलावात उतरले आणि रात्रीच्या वेळेस गारपीट झाली तर त्यांना गारांच्या माऱ्यामुळे उडता येत नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम सहन न झाल्याने काही कीटकांच्या प्रजातींचा अंत होतो. काही फुलपाखरे सुद्धा अशा बदलत्या वातावरणात तग धरू शकत नाहीत. गारपिटीचा परिणाम जसा मनुष्य प्राण्यावर होतो तसा तो पशुपक्ष्यांवर आणि जैविक विविधतेवरही होत असतो.(लेखक निसर्गमित्र आहेत.)विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात फेब्रुवारी ते मे २०१४ दरम्यान गारपीट झाली. या गारपिटीमुळे पशुपक्ष्यांनाही जीव गमवावा लागला. विविध प्रकारच्या २६ पक्ष्यांच्या प्रजाती आणि ९ प्रकारच्या सस्तन प्राण्यांना या गारपिटीचा फटका बसला, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अहवालात नमूद करण्यात आले. या गारपिटीच्या तडाख्यात ६५ हजारांपेक्षा अधिक पक्षी आणि शेकडो सस्तन प्राण्यांचा मृत्यू झाला. अनेक पक्षी जखमी झाले गारांचा आकार १-२ इंच इतका होता. मैना, चिमण्या, पोपट या पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या अधिक होती. मोकळ्या जागेत राहणाऱ्या भारतीय प्रकारच्या काळविटांचाही गारपिटीने मृत्यू झाल्याची नोंद अहवालात आहे. मानवी वास्तव्याच्या परिसरात आढळणाऱ्या मैना, घुबड यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. कोकिळा, बुलबुल, बगळा आणि मधमाशा यांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे.- विजय अवसरे