शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

वयस्कांनीही समज राखू नये काय ?

By admin | Published: March 08, 2016 9:04 PM

अर्थमंत्री अरुण जेटली हे लोकसभा निवडणुकीत पडलेले पुढारी आहेत. मोदींची लाट देशात असताना आणि तिच्या जोडीला पंजाबातला शिरोमणी अकाली दल हा प्रबळ प्रादेशिक पक्ष

अर्थमंत्री अरुण जेटली हे लोकसभा निवडणुकीत पडलेले पुढारी आहेत. मोदींची लाट देशात असताना आणि तिच्या जोडीला पंजाबातला शिरोमणी अकाली दल हा प्रबळ प्रादेशिक पक्ष उभा असताना जेटलींना अमृतसर मतदारसंघात काँग्रेसच्या कॅ. अमरिंदरसिंग यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. तेवढ्यावरही मोदींनी आपल्या अधिकारात त्यांना मंत्रिमंडळात घेतले व राज्यसभेवर आणले. आपल्याला नसलेला जनाधार विसरून त्यांच्यासारखी वजनदार माणसे जेव्हा असभ्य विधाने करतात तेव्हा देशातील राजकारणाच्या मध्यवर्ती अवस्थेविषयीचीच चिंता वाटू लागते. प्राची किंवा निरंजना, गिरीराज सिंह किंवा रामशंकर कथेरिया आणि साक्षी महाराज किंवा अनंतकुमार ही माणसे तसे बोलताना पाहण्याची व ते लक्षात न घेण्याची देशाला आता सवय झाली आहे. अरुण जेटलींचे मात्र तसे नाही. ते कायदेपंडित आहेत. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात (वाजपेयींच्या इच्छेविरुद्ध) त्यांनी काम केले आहे आणि राजकारणाचा त्यांना असलेला अनुभवही मोठा आहे. तरीही परवा राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेवर त्यांनी जी मल्लीनाथी केली ती त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सध्याच्या असहिष्णू व तुच्छतावादी वृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे. ‘बड्या भांडवलदारांनी दडविलेला काळा पैसा पांढरा करण्याची जी संधी मोदींच्या सरकारने त्यांना दिली तिचा ‘फेअर अ‍ॅन्ड लव्हली’ असा उपरोधिक उल्लेख राहुल गांधींनी केला. त्याला सरळ उत्तर न देता जेटली म्हणाले, राहुल गांधी प्रौढ वयात आले आहेत पण त्यांना या वयातही यावी तशी समज आल्याचे मला दिसत नाही. राहुल गांधींनी अमेठीमधून सलग दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. काँग्रेसचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वीस महिन्यात नरेंद्र मोदींची देशातील लोकप्रियता ५७ टक्क्यावरून उतरून ४० टक्क्यांवर आली असताना राहुल गांधींची लोकप्रियता आठ टक्क्यंवरून वाढून २२ टक्क्यावर गेल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. मोदी आणि राहुल या दोघांच्या मध्ये उभा राहू शकेल असा दुसरा नेता देशातील कोणत्याही पक्षात आता नाही. राहुल गांधींना लाभलेल्या लोकप्रियतेच्या तुलनेत मोदींच्या मंत्रिमंडळातीलच नव्हे तर पक्षातीलही दुसरा नेता येऊ शकणारा नाही. अशा मागे राहणाऱ्या पुढाऱ्यात अर्थातच अरुण जेटलींचाही समावेश आहे. तरीही त्यांनी राहुल गांधींची ‘समज’ संसदेत काढून आपल्या प्रौढपणाचा व पराभूत पुढारकीचा बडेजाव मिरविला असेल तर तो त्यांच्याविषयीची अनुकंपा वाटायला लावणारा प्रकार आहे. (मात्र जेटलींविषयीची अनुकंपा जराही मनात येऊ न देता प्रत्यक्ष नरेंद्र मोदींनी राहुलविषयी जे विपरित वक्तव्य नंतर केले ते पाहता आपल्या राजकारणाने पातळी राखायची नाहीच असे ठरविले असावे असेच वाटायला लावले. त्यांनी राहुल यांना ‘वय होऊनही समज न आलेला’ असे त्यांचे नाव टाळून लोकसभेत म्हणून टाकले.) राजकारणात संवादाची जागा वादाने घेणे आणि त्या वादाने तीव्र स्वरूप धारण करणे हे समजण्याजोगे असले तरी संवादांनी अवमानास्पद पातळीवर उतरणे हे न समजणारे आहे. राहुल गांधींनी लोकसभेत मोदींच्या सरकारला ‘सूट-बूटवाली सरकार’ हे विशेषण चिकटविल्यापासूनच त्यांच्यावर उधळली जाणारी भाजपावाल्यांची शिव्यांची लाखोली वाढत गेली आहे. ते अजून अपक्व आहेत, त्यांना राजकारणाचा अनुभव नाही, घराण्याच्या मोठेपणामुळे त्यांना नेतृत्व लाभले आहे इथपासून सुरू झालेली टीका त्यांना ‘नाजायज औलाद’ म्हणण्याच्या खालच्या पातळीवर उतरलेली देशाने पाहिली आहे. पं. मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी असा थोर वारसा व त्याचा संचित संस्कार लाभलेल्या राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यापर्यंत भाजपाच्या लोकांची मजल गेली आहे. तिला उत्तर देताना ‘देशभक्ती माझ्या रक्तात आहे. ती तुम्ही मला शिकविण्याची गरज नाही’ हे राहुल गांधींनी काढलेले उद्गार अरुण जेटलींसह त्यांच्या पक्षाला बरेच काही सांगू शकणारे आहे. ‘अवतार’ (इन्कार्नैशन) या नावाच्या सध्या गाजत असलेल्या आपल्या पुस्तकाविषयी त्याचे लेखक व इतिहास संशोधक सुनील खिलनानी म्हणतात ‘खरी देशभक्ती खोट्या आत्मस्तुतीत नसून परखड आत्मपरीक्षणात आहे’. राहुल गांधींच्या दोन पूर्वजांनी देशासाठी केलेले बलिदान अरुण जेटलींनी नुसते आठवून पाहिले तरी त्यांना असे आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्याचवेळी राहुल किंवा सोनिया गांधी यांच्याविषयी बोलताना वा त्यांच्यावर टीका करताना केवढा विवेक बाळगायचा हेही त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना समजू शकेल. दुर्दैवाने राजकारण ही शिकण्याची शाळा राहिली नसून इतरांना शिकविण्याची व ऐकविण्याची बाब आता बनली आहे. त्यामुळे जेटली वा मोदींकडून तसल्या आत्मपरिक्षणाची अपेक्षा बाळगणे हीच आता चूक ठरावी अशी गोष्ट झाली आहे.