शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

धुमस!

By admin | Published: October 11, 2016 4:23 AM

कायदे कठोर केले की समाजात त्यांचा धाक निर्माण होतो आणि त्यांचा भंग करण्याच्या प्रवृत्ती नामोहरम होतात हे केवळ एक मिथक

कायदे कठोर केले की समाजात त्यांचा धाक निर्माण होतो आणि त्यांचा भंग करण्याच्या प्रवृत्ती नामोहरम होतात हे केवळ एक मिथक ठरु पाहाते आहे काय अशी शंका आता येऊ लागली आहे. महिलांवरील अत्त्याचारांच्या संदर्भातील कायदे अधिक कठोर केल्यानंतर तशा घृणास्पद प्रकारांना आळा बसण्याऐवजी उलट ते आणखीनच वाढत चाललेले दिसावेत हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे. नाशिकनजीक तळेगाव-अंजनेरी या लहानशा गावात शनिवारी रात्री जो काही किळसवाणा आणि लाजीरवाणा प्रकार घडला तो याचाच द्योतक आहे. पाच वर्षाचे वय ते काय आणि पंधरा वर्षाचे वय तरी असे कितीसे समजदारीचे. पण पाच वर्षाच्या अजाण आणि निष्पाप बालिकेवर एका पंधरा वर्षीय मुलाने बलात्कार केला म्हटल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया केवळ त्या गावात किंवा परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात न उमटती तरच आश्चर्य होते. नगर जिल्ह्यातील कोपर्डीत आणि त्याच जिल्ह्यातील पाथर्डीत असेच प्रकार घडले व कायद्याच्या लेखी हे प्रकार त्यांच्या तार्किक शेवटापर्यंत जाण्याआधीच तळेगावचा प्रकार घडला. लोक संतप्त झाले आणि संतप्त जमावाचे मानसशास्त्रच वेगळे असल्याने या समाजाने जो समोर येईल त्याच्यावर आपला संताप काढण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत सरकारने म्हणजेच सरकारच्या प्रतिनिधीने समक्ष हजर राहून लोकांच्या क्षुब्ध भावनांना आवर घालणे आणि दु:खित आणि पीडितांना दिलासा देणे त्याचे कर्तव्यच ठरते. पण तळेगावला याबाबतीत अंमळ वेगळाच अनुभव आला आणि लोक अधिकच प्रक्षुब्ध झाले. घडलेल्या घटनेचा साधकबाधक विचार केला जाण्याची आणि समजूत व सबुरीने घेण्याची अपेक्षा अशा स्थितीत जमावाकडून बाळगता येत नाही. अर्थात त्याचे भान शासनकर्त्यांनी बाळगायचे असते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य बजावताना लोकाना शांततेचे आवाहन केले आणि पंधरा दिवसात खटला दाखल करण्याचे जाहीरही केले. अर्थात हेच त्यांनी कोपर्डी प्रकरणीही जाहीर केलेच होेते. वस्तुत: जर त्या अभागी बालिकेची वैद्यकीय तपासणी शनिवारी रात्रीच झाली होती आणि संबंधित मुलग्यास पोलिसांनी लगेच अटकही केली होती तर मग खटला दाखल करण्यास पंधरा दिवस तरी लागण्याचे काही कारण नाही. एकदा आरोपपत्र दाखल केले व अधिक तपासांती आणखी काही बाबी उघड झाल्या तर पुरवणी आरोपपत्रदेखील दाखल करता येतच असते. परिणामी सत्वर कारवाई केली जाण्याने प्रक्षुब्ध समाजाच्या भावना निवळण्यास थोडी फार तरी मदत नक्कीच होऊ शकते. तळेगाव प्रकरणात तसे होण्याची अधिक गरज आहे व त्याचीही काही कारणे आहेत. शनिवार रात्रीपासून नाशिक-त्र्यंबेकश्वर रस्त्यावरील तळेगाव परिसरात जो तणाव निर्माण झाला तो हळूहळू सरकत गेला आणि रविवारी या तणावाने संपूर्ण नाशिक जिल्ह्याला घेरले. सोमवारचा दिवसदेखील तणावातच सुरु झाला आणि या तणावातच कोणत्या क्षणी काय होईल याचा भरवसा नाही अशी स्फोटक भीती भरली गेली. याचा एक अर्थ असाही निघू शकतो की हा जो काही उद्रेक दिसतो आहे तो केवळ तळेगावच्या घटनेतूनच निर्माण झालेला नसावा. कारण ती घटना घडल्यापासून समाज माध्यमांमधून ज्या संदेशांचे मोठ्या प्रमाणावर आदान-प्रदान सुरु झाले ते समाजाच्या विभिन्न घटकांमध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचे होते. या विध्वंसक संदेशांचे हिडीस दृष्य रुपदेखील लोकांच्या अनुभवास आले. त्यामुळे पोलीस आणि सरकार यांनी परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली असल्याचे जाहीर करुन लोकाना आश्वस्त केले असले तरी लोकांच्या मनातील भीती कमी करण्यावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. लोकानी अफवांवर विश्वास ठेऊ नये हे अशा प्रसंगांमधील पालुपदही आता निरर्थक ठरु लागले आहे कारण फेसबुक वा व्हॉट्स अ‍ॅपवरुन जे संदेश दिले घेतले जातात ते इतके ‘आत्मविश्वासपूर्ण’ असतात की त्यांच्या समोर पोलिसांचे आवाहन केविलवाणेच ठरते. याच संदर्भात मग अधूनमधून डोके वर काढणाऱ्या ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या विषयाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहाण्याची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो. इंटरनेटच्या जोडणीबरोबर सारी समाज माध्यमे फुकटात उपलब्ध होणे एरवी कितीही उपयोगी वाटत असले तरी व्हॉट्स अ‍ॅपसारखे दुधारी अस्त्र अशा वेळी अत्यंत घातक ठरत असते. कोणतेही अस्त्र एकाचवेळी तारक आणि मारकही असते, प्रश्न केवळ ते कोणाच्या हाती गेले यातून निर्माण होत असतो. तणावाच्या प्रसंगी अशी सारी अस्त्रे मारकच ठरविली जातात आणि तसे नसते तर सोमवारी सकाळपासून पोलिसांनी नाशिकमधील इंटरनेट सेवा बंद करुन ठेवली नसती. याच संदर्भात मग आठवण होते ती सर आॅल्फ्रेड नोबेल यांची. जगातील शांततेचा सर्वोच्च पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो, त्याच या नोबेल यांनी आधी डायनामाईटचा शोध लावला आणि त्यातूनच पुढे जिलेटीनचा अवतार उदयास आला. मानवजातीच्या कल्याणासाठी आपण हे संशोधन केले पण त्याच्या संहारक शक्तीचा दुरुपयोग पाहून नोबेल यांना त्यांच्या उत्तरायुष्यात पश्चात्ताप होऊ लागला. इंटरनेटच्या आणि व्हॉट्स अ‍ॅप आणि तत्सम समाज माध्यमांच्या उद्गात्यांवर उद्या अशीच वेळ न येवो म्हणजे मिळवली.