शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सोशल इंजिनिअरिंग

By admin | Published: May 14, 2016 1:39 AM

कोणताही राजकीय पक्ष एखादा धर्म किंवा जातीविशेषच्या पाठिंब्यावर वाढू शकत नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष अधिक व्यापक आणि सर्वांच्या हिताचा विचार करणारा ठरावा

कोणताही राजकीय पक्ष एखादा धर्म किंवा जातीविशेषच्या पाठिंब्यावर वाढू शकत नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष अधिक व्यापक आणि सर्वांच्या हिताचा विचार करणारा ठरावा म्हणून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियामध्ये रूपांतरित केले. या महामानवाने राजकारण कसं सर्वंकष असावं, यासाठीचा मार्गच ‘रिपाइं’च्या स्थापनेतून आखून दिला. डॉ. आंबेडकरांच्या या राजकारणातील मार्गाला आता सोशल इंजिनिअरिंग म्हटले जात असले तरी याचे श्रेय बाबासाहेबांकडेच कायमचे राहणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सन २००७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी केला होता. त्या निवडणुकीत मायावतींनी स्टान्स बदलून दलितांबरोबर ब्राह्मणांचाही विश्वास संपादन केला होता. त्याचेच फलित म्हणून त्या बहुमताने विजयी झाल्या. आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार असदुद्दिन ओवेसी यांनीही आता सोशल इंजिनिअरिंगचे महत्त्व ओळखले आहे. केवळ मुस्लिमांच्या हिताचे राजकारण केल्यामुळे पक्षाचा प्रसार आणि वाढ होणार नाही, हे त्यांना पुरते कळून चुकले आहे. त्यामुळे आक्रमक भाषणे करण्यापेक्षा त्यांनी मुस्लिमेतर जाती-जमातीच्या हिताचे प्रश्न उपस्थित करण्याकडे कल ठेवला आहे. ‘एमआयएम’चे संघटन मजबूत करण्यासाठी ओवेसी यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. सोलापुरातही ते येऊन गेले. ओवेसी काय बोलणार, हे ऐकण्यासाठी मुस्लिमेतरांनीही मोठी गर्दी केली होती; पण त्यांनी परिपक्वपणे भाषण केले. महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी झगडत आहे. अनेक राजकीय पक्षांनी केवळ आश्वासने देऊन त्यांची बोळवण केली; पण ठोस निर्णय होताना दिसून येत नाही. हाच मुद्दा घेऊन ओवेसी यांनी यापुढे धनगरांच्या न्याय्यहक्कांसाठी झगडणार असल्याची ग्वाही दिली. दलितांसाठी अशीच घोषणा करून त्यांनाही खूश करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सध्या कोणत्या मोठ्या निवडणुका नसल्या तरी अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळेच ओवेसींनी ही सोशल इंजिनिअरिंगची भूमिका घेतली असली तरी, त्यांच्या आणि ‘एमआयएम’च्या राजकारणाला व्यापकता आणणारी ही भूमिका आहे. या नव्या भूमिकेची प्रशंसा करायला हवी.