शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

सामाजिक भान जपणारा निर्णय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:38 PM

मिलिंद कुलकर्णी कोरोनाचा प्रकोप वाढण्यासाठी अन्य कारणांसोबतच लग्न आणि अंत्ययात्रेला झालेली गर्दी हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मिलिंद कुलकर्णीकोरोनाचा प्रकोप वाढण्यासाठी अन्य कारणांसोबतच लग्न आणि अंत्ययात्रेला झालेली गर्दी हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. काही ठिकाणी कारवाईदेखील झाली. अशा गर्दीची माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांना निलंबितदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय लेवा पाटीदार गुर्जर समाज आणि जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाने पुढाकार घेऊन लग्नाला ५० तर अंत्ययात्रेला २० पेक्षा अधिक लोक न बोलावण्याच्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. दोन्ही समाजातील धुरिणांनी स्वयंस्फूर्तीने केलेले आवाहन समाजाला दिशादर्शक आणि सामाजिक भान जपणारे आहे.कोरोना ही जागतिक महामारी आहे. संपूर्ण जग त्याच्याशी लढतेय. हात धुणे, मास्क वापरणे व शारीरिक अंतर राखणे हे उपाय करुन कोरोनापासून दूर राहण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. पाश्चात्य देशात मास्कविरोधात आंदोलने होत असताना आपल्याकडे लग्न व अंत्ययात्रेप्रसंगी गर्दी करु नये, या शासकीय दंडकाला सामाजिक बळ देण्याचे मोठे कार्य या दोन समाज संघटनांनी केले आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्यासाठी सुमारे १२५ संस्था प्रयत्नशील आहेत. काहींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. आशादायक असे चित्र त्यातून दिसून येत असले तरी सद्यस्थितीत समूह संसर्गाची भीती भारतात व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वैयक्तीक, सामाजिक पातळीवर जनजागृतीची मोठी आवश्यकता आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्याचीअ ावश्यकता आहे. त्यात अखिल भारतीय लेवा पाटीदार गुर्जर समाज व जळगाव जिल्हा सकल मराठा समाज या सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनमत तयार करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दोन्ही संस्थांनी सामाजिक विकासात मोठे योगदान दिलेले आहे. गुर्जर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांचे वडील ज्येष्ठ नेते स्व.पी.के.अण्णा पाटील यांनी काळानुरुप बदलासाठी गुर्जर समाजाला तयार केले. संपर्क, संवाद आणि समन्वय अशी त्रिसूत्री वापरत त्यांनी अनेक कालबाह्य रुढी, परंपरा बदलण्यासाठी समाजाची मानसिकता तयार केली. त्याच प्रमाणे प्रा.डी.डी.बच्छाव यांनी शिक्षणक्षेत्रात कार्य करीत असताना भावी पिढीला सुशिक्षित करीत असताना सुसंस्कृत बनविले. उद्यमशीलतेचे धडे दिले. या दोन्ही नेत्यांच्या शब्दाला वजन आहे. मान आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन्ही समाज शासकीय नियमांचे काटेकोर पालन करतील, असा सार्थ विश्वास आहे.कोरोनाशी लढ्याला चार महिने पूर्ण होत आले. प्रशासकीय, वैद्यकीय व पोलीस यंत्रणा आता थकली आहे. त्यापैकी काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. हीच वेळ आहे, समाजाने पुढे येण्याची. ती गरज ओळखून आता विविध ठिकाणी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, व्यावसायिक समूह यांनी प्रशासनाला मदत करण्याचे काम सुरु केले आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध करुन देण्याचे काम, आरोग्य केंद्र, विलगीकरण कक्ष उभारण्याचे कार्य केले जात आहे. जळगाव शहरात जैन समाज, माहेश्वरी समाजाने विलगीकरण कक्ष उभारले आहेत. लहान कुटुंबामुळे विलगीकरणात राहण्यासाठी जागेची अडचण, शुश्रूषा करताना गैरसोय अशा बाबी लक्षात घेऊन वसतिगृह, मंगल कार्यालयात विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. नाश्ता, भोजन, वैद्यकीय मदत अशी सुविधा त्याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोरोनासारख्या कठीण काळात समाज संघटनांचा हा सकारात्मक पुढाकार निश्चितच स्वागतार्ह आणि दिशादर्शक असा आहे.सोन्याचा धूर निघणाºया देशात ग्रामस्वराज्य होते. स्वयंपूर्ण गाव होते. चलनासाठी पैशाची गरज नसे. धान्याने व्यवहार होत असत. हा काही फार जुना काळ नव्हे. पण समाजाची मानसिकता बदलली, शासकीय धोरणे बदलली. गाव-खेडी ओस पडली. शहरे फुगली. कोरोनापूर्व काळात शहरे बकाल झाली आणि गावे भकास झाली. कोरोनापश्चात लोक गावाकडे परतले. शेतीत रमले. कुटुंब, समाजाचे मोल जाणले. आपत्तीने आम्हाला ह्यजुने ते सोनेह्ण हा मोलाचा संदेश दिला. तो जपूया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव