शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 00:31 IST

सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सोमनाथदा बंगालचे असले तरी साऱ्या देशाला आपले वाटणारे व साºयांना घेऊन चालणारे नेते होते. त्याचमुळे ते डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे असतानाही २००४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने त्यांची सभापतिपदावर निवड केली. तो पदभार त्यांनी ज्या डौलाने व गांभीर्याने सांभाळला त्याची तुलना लोकसभेचे पहिले सभापती अनंत शयनम् अय्यंगार यांच्या कारकिर्दीशीच करता यावी. ते सभापती असताना घडलेल्या दोन घटना या संदर्भात नमूद करण्याजोग्या आहेत. त्यांच्या कोणत्याशा निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आपल्यासमोर हजर व्हायला सांगणारा आदेश (समन्स) काढला तेव्हा कायदे मंडळाच्या प्रमुखाला असा आदेश देण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे सोमनाथदांनी त्या न्यायालयाला ऐकविले. कायदेकारी, कार्यकारी आणि न्याय या सरकारच्या तीनही शाखांना घटनेने स्वायत्तता दिली असताना आपल्या शाखेचा अधिकार व सन्मान राखण्यासाठी सोमनाथदांनी तेव्हा एक संवैधानिक संकटच ओढवून घेतले होते. पुढे भारताने अमेरिकेशी केलेल्या अणुइंधनाच्या करारावरून भाजप व कम्युनिस्टांसह अनेक पक्षांनी तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचेविरुद्ध राष्टÑपतींकडे तक्रारपत्र दिले. त्या पत्रावर सही करायला नकार देऊन सोमनाथदांनी ‘सभापतीने अशा पक्षीय भूमिका घेऊ नये’ असे त्यांच्या पक्षाचे पुढारी प्रकाश करात यांना सुनावले. त्यावर संतापलेल्या करातांनी त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करणारा आदेश काढला. सोमनाथदांनी तो आनंदाने स्वीकारला. मात्र नंतरच्या काळात त्यांची प्रतिष्ठा उंचावलेली व करातांची रसातळाला गेलेली देशाला दिसली. सोमनाथ चॅटर्जी हे भूमिका घेणारे नेते होते. १९९६ मध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देवेगौडा यांची देशाच्या पंतप्रधानपदावर निवड करण्याआधी त्यांचे बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नावावर एकमत झाले होते. ज्योती बसूंनी पंतप्रधानपद स्वीकारावे या मताला सोमनाथदांची मान्यता होती. परंतु तेव्हा नव्यानेच पक्षाच्या सचिवपदावर आलेल्या करात यांनी तसे केल्याने पक्षाचे नुकसान होईल असा पवित्रा घेऊन ज्योती बसूंना ते पद मिळू दिले नाही. त्यावेळी व नंतरच्या काळातही प्रकाश करातांना साथ देणारे उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. ए.बी. बर्धन यांनी या साºया घटनाक्रमाबाबत खंत व्यक्त करताना म्हटले ‘आम्ही करातांऐवजी सोमनाथदांचे म्हणणे ऐकले असते तर ते पक्ष व देश या दोहोंसाठीही चांगले झाले असते’. मोठ्यांचे शहाणपण ज्यांच्या उशिरा लक्षात येते त्यांची व त्यांच्या संघटनांची स्थिती कशी होते हे आता करात व त्यांचा डावा कम्युनिस्ट पक्ष बंगाल व अन्यत्र अनुभवत आहे. असो, सोमनाथदांचा पक्ष देशात कधी सत्तेवर येणार नव्हता. तरीही त्यांनी सरकारला कधी ‘विरोधासाठी विरोध’ केला नाही. विकासाच्या व चांगल्या योजनांना त्यांनी नेहमी साथ दिली. झालेच तर सरकार व त्यातील नेत्यांविषयी त्यांनी कधी पातळी सोडून टीका केली नाही. त्याचमुळे सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंग यांच्याएवढेच अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्याशीही त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे राहिले. राजकीय विरोध करताना त्याला व्यक्तिगत विरोधाची जोड न देण्याचा त्यांचा संयम देशातील फारच थोड्या नेत्यांना राखता आला आहे. त्याचमुळे डाव्या कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी स्वीकारलेले सोमनाथदा एखाद्या सर्वपक्षीय नेत्यासारखेच देशात व संसदेत वावरले. सर्वच पक्ष व राज्ये त्यांच्याविषयीचा आदरभाव बाळगून होती. त्यांची स्मृती हा देश दीर्घकाळ जपणारही आहे.

टॅग्स :Somnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जीPoliticsराजकारणnewsबातम्या