शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

By विजय दर्डा | Updated: July 11, 2022 07:47 IST

मनमानी राज्यकर्त्यांची बेशरम मौजमस्ती आणि बेलगाम वर्तनाने भडकलेल्या सामान्य नागरिकांच्या झुंडी जेव्हा सत्तास्थानांवर कब्जा करतात...

विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह 

जेव्हा एखादा प्रशासक किंवा लोकशाही पद्धतीने निवडून येऊन खुर्चीत बसलेला लोकप्रतिनिधी सर्व-सत्ताधीश होतो, भ्रष्टाचारात आकंठ बुडून जातो, तरुणांना छळतो, जनतेचा विश्वासघात करतो आणि तिला भुकेने कासावीस व्हायला लावतो, तेव्हा जनता विद्रोह करून उठते. श्रीलंकेत यावेळी हेच होत आहे. तिथे केवळ राजकीय सत्तापालट नाही, तर संघर्ष पेटला आहे. हा चिमुकला देश पोटातील भुकेमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या आगीत जळतो आहे. आपण रशियातल्या महानायकांच्या मूर्ती भुईसपाट होताना पाहिल्या, इराकमध्ये सद्दाम हुसेन यांचे भव्य पुतळे धराशायी होताना पाहिले; पण  श्रीलंकेत घडले तसे दुसरे उदाहरण दिसणार नाही.

या सगळ्याला  राजपक्षे कुटुंब जबाबदार आहे.  या कुटुंबाने श्रीलंकेला मन भरेपर्यंत लुटले. लोकांना गाडीत भरायला एक लिटर पेट्रोल नसताना यांची मुले चालवत असलेल्या गाड्या मात्र एका लिटरमध्ये फक्त चार किलोमीटर जात होत्या. लोकांना प्यायला पाणी नसताना हे लोक दारूच्या अंघोळी करीत होते. लोकांजवळ दोन वेळा खायला अन्न नसताना हे भरपेट खाऊन उलट्या करीत होते. अशी परिस्थिती असेल तर जनता काय करील? पोटाची आग विझली नाही तर राजवटी जळणारच! एरवी शांत प्रकृतीच्या बौद्ध भिक्षूंनीही श्रीलंकेतील राजवटीविरुद्ध मशाल हाती घेतली, यावरून इथली परिस्थिती किती बिघडली होती हे लक्षात येईल. हे बौद्ध भिक्षू जनतेबरोबर उभे राहिले आहेत.

राजपक्षे कुटुंबाने श्रीलंकेची लूट कशी केली याची उदाहरणे चकित करणारी आहेत. २००५ ते २०१५ या काळात राष्ट्रपती म्हणून सत्तेवर राहिलेल्या महिंदा राजपक्षे यांनी विदेशातील बँकांत १८ अब्ज डॉलर्सची संपत्ती जमा केली. देशात विद्रोहाची स्थिती निर्माण झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. महिंदा यांचे छोटे भाऊ गोटबाया राजपक्षे यांनी लोक राष्ट्रपती भवनात घुसल्यावर राजीनामा दिला. गोट बाया फरार झाले नसते तर लोकांनी त्यांचे तुकडे-तुकडे केले असते. २०१५ साली ते संरक्षण सचिव असताना सैन्याच्या खरेदीत दहा दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा झाला होता. महिंदा राजपक्षे यांचे छोटे भाऊ बासील राजपक्षे अर्थमंत्री होते आणि त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. त्यांच्या भ्रष्टाचारी उद्योगामुळेच त्यांना ‘मिस्टर टेन पर्सेंट’ म्हटले जायचे. २०१६ मध्ये श्रीलंकेतील एका कोर्टाने  १६ एकरांत वसलेल्या बासिल यांच्या आरामदायी महालाचा लिलाव करण्यास फर्मावले होते. तामिळींच्या समस्येमुळे श्रीलंका जळत असतानाही हे सत्ताधीश चैनीची बासरी वाजवत होते आणि पैसा लुटत होते. 

चीनकडून विनाकारण कर्ज घेऊ नका, असे सगळे तज्ज्ञ सांगत असतानाही राजपक्षे परिवार चीनबरोबर व्यवहार करीत राहिला. या कुटुंबाने चीनकडूनही बरीच धनदौलत कमावल्याचा आरोप आहे. तूर्तास श्रीलंका भिकेला लागल्यात जमा आहे. तिथले पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी राजीनामा दिला आहे. दुर्दैवाने अशीच परिस्थिती पाकिस्तानातही दिसते. आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानही कंगाल झाला आहे. एखाद्या दिवशी श्रीलंकेसारखा विद्रोह पाकिस्तानातही उसळला,  तर आश्चर्य वाटायला नको.vijaydarda@lokmat.com

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था