शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

सारांश विशेष लेख: 'विधिमंडळाचा लाडका सदस्य' अशी योजना आता सुरू करा!

By अतुल कुलकर्णी | Updated: March 23, 2025 07:56 IST

सुधीरभाऊ हल्ली आपल्याच सरकारला खडे बोल सुनावतात, हे या अधिवेशनात दिसून आले आहे

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय राहुल नार्वेकरजी,

विधानसभेचे कामकाज ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने सुरू आहे त्याला तोड नाही. कोण काय बोलतो याकडे आपण फार लक्ष देऊ नका. लक्ष दिले तर काम करणे मुश्किल होईल. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या प्रथा, परंपरा आणि कामकाजाचा हवाला देत एकाच दिवशी ३० ते ३५ लक्षवेधी लागल्याबद्दल हे विधानभवन आहे की लक्षवेधी भवन आहे असा सवाल विचारला खरा मात्र, त्यांनी लक्षवेधीच्या निमित्ताने स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता अशी कुजबुज विधिमंडळात होती. सुधीरभाऊ हल्ली आपल्याच सरकारला खडे बोल सुनावतात, हे या अधिवेशनात दिसून आले आहे.

तुमच्या दालनात एकदा सुधीरभाऊ आणि देवेंद्रभाऊ यांना जेवायला बोलवा. सुधीरभाऊंच्या आवडीची रानमेव्याची भाजी मागवा. म्हणजे पुढचे सगळे निवांत पार पडेल. लोकप्रतिनिधी काम करतात, प्रश्न मांडतात, त्यांच्या लक्षवेधीच्या निमित्ताने त्यांच्या विभागातल्या प्रश्नांना न्याय मिळतो. त्यामुळे असे प्रश्न मांडायचे नाहीत का? खरे तर आपण एक दिवस लक्षवेधीचा, एक दिवस प्रश्नोत्तराचा, एक दिवस औचित्याच्या मुद्द्यांचा, तर एक दिवस वादावादीचा अशी विभागणी करायला हरकत नाही. यातून दिवस आणि वेळ उरलाच तर त्यावेळी विधिमंडळाचे कामकाज होईल असे जाहीर केले पाहिजे. शेवटी प्रथा परंपरा आपणच तर निर्माण केल्या पाहिजेत ना...

आपणच मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहोत, असे तरुण तडफदार मंत्री नितेश राणे म्हणाल्याची चर्चा विधानभवनात होती. मुख्यमंत्र्यांनी ‘लाडका मंत्री’ योजना घोषित केली आहे. त्या योजनेचे निकष ते लवकरच सांगणार आहेत. तुम्ही देखील ‘विधिमंडळाचा लाडका सदस्य’ अशी घोषणा करायला हरकत नाही. सरकार कोणाचे आहे, याचा विचार न करता जे सदस्य सडेतोडपणे बोलतील, वेळप्रसंगी सरकारवर टीका करतील, जे मंत्री मंत्रिपदाची शपथ विसरून समाजासाठी वाटेल ते बोलायला मागेपुढे बघणार नाहीत. अशांची आपण सर्वोत्कृष्ट सदस्य म्हणून निवड करू शकतो का? असे निकष ठेवले तर सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे यांची आपण पुरस्कारासाठी निवड करू शकाल..! आम्ही आपलं सुचविण्याचं काम करतो... आपला तेवढाच वेळ वाचावा ही त्या मागची प्रामाणिक भावना... आपल्यालाच सगळे कळते, इतरांना काही कळत नाही, असे अधिकाऱ्यांनी वाटून घेण्याची गरज नाही... आम्हीच चांगले आहोत या मानसिकतेत राहाल तर तुम्ही काही करू शकणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी तमाम अधिकाऱ्यांना नुकताच दिला आहे. आपणही असाच इशारा सदस्यांना देऊ शकता. जे सदस्य आपल्यालाच जास्त कळते या हिरीरीने सभागृहात बोलतात, त्यांनी तसे वाटून घेण्याची गरज नाही, असे आपण एकदा खडसावून सांगायला हवे...त्याचवेळी सर्वोत्कृष्ट सदस्य निवडीचे निकषही जाहीर केले तर त्याचा फायदा पुढच्या अधिवेशनाला नक्की होईल. 

या अधिवेशनात सभागृहात गोंधळ, गदारोळ होता. सभागृहाचे कामकाजच पूर्णवेळ होऊ शकले नाही. मंत्री सभागृहापेक्षा बाहेर व्यस्त होते त्यामुळे सभागृह बंद ठेवण्याचीही आपल्यावर वेळ आली... रोज नवनवे विषय सदस्यांपुढे येत होते. त्यामुळे ते तरी काय करणार..? त्यांच्या भाषणांमुळे सभागृहाच्या कामकाजाची ‘दिशा’ बदलून गेली त्यात त्यांचा दोष नाही... एक मात्र वाईट झाले. या गदारोळ गोंधळामुळे आर्थिक पाहणी अहवालावर चर्चा झाली नाही. राज्याची नेमकी अवस्था काय आहे? शाळा, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शेती याबाबतीत महाराष्ट्र कुठे आहे? याचा शोध घेण्याची संधी बिचाऱ्या सदस्यांना मिळालीच नाही... अनेक सदस्यांची अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण करण्यासाठी केलेली तयारी वाया गेली...त्यामुळे त्यांना फार वाईट वाटले असेल. अधिवेशन संपताना आपण सगळ्या सदस्यांची समजूत काढा... या विषयांवर तुम्हाला बोलायला मिळाले नाही त्याचे मलाच दुःख वाटले असे सांगा. ज्या सदस्यांना आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्पावर बोलायचे असेल त्यांना आपण रोज आपल्या दालनात भेटीसाठी बोलवा आणि मनसोक्त बोलायला सांगा... तेवढेच त्यांचे दुःख हलके होईल. आपल्याला कुठेतरी बोलता आले याचे समाधान मिळेल...शेवटी तुम्ही या सगळ्या आमदारांचे पालक आहात. त्यांनी तुमच्याकडे भावना व्यक्त करायच्या नाहीत तर कोणाकडे...काहींनी आम्हाला या भावना सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचविल्या... बाकी आपण योग्य तो निर्णय घ्याल...

- आपलाच बाबूराव

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार