शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

विशेष लेख : या अमृतपाल सिंगचे काय करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 8:46 AM

‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख अमृतपाल सिंगबद्दल बोलायला ना केंद्र सरकार तयार आहे, ना अरविंद केजरीवाल! असे का ?

हरीष गुप्ता,नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षात नव्याने आलेली आक्रमकता आता सर्वपरिचित झाली आहे. २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पक्षाने अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्याची नीती अवलंबली आणि त्याचा पक्षाला चांगला फायदाही झाला. काही राज्यांमध्ये तर निवडणुकांमागून निवडणुका जिंकता आल्या. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेखही जागतिक पटलावर वाढतोच आहे. मात्र, या तटबंदीला पंजाबमधील अलीकडच्या घटनांनी थोडे खिंडार पडलेले दिसते. 

‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख अमृतपाल सिंग याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट धमकी दिल्यानंतर सगळीकडे स्मशानशांतता पसरली आहे. त्याच्या संघटनेचा समर्थक लवप्रीतसिंग ऊर्फ तुफान याला सोडवण्यासाठी अजनाला पोलिस ठाण्यावर काही सहकाऱ्यांनी हल्ला चढवला. गेल्या महिन्यात ही घटना घडल्यावर अमृतपाल सिंग प्रकाशझोतात आला. तुफानविरुद्धचा प्रथम माहिती अहवाल पंजाब पोलिसांनी रद्दबातल केला ही दुसरी वाईट घटना.

उशीर होण्याच्या आत अमृतपाल सिंगवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपामधील काहींनी वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे. याला प्रतिसाद म्हणून की काय भाजपने अनौपचारिकरीत्या सर्व नेत्यांना या विषयावर न बोलण्याचा सल्ला दिला असून भाजपचा कोणताही प्रवक्ता चकार शब्द काढत नाही. अगदी गृहमंत्रीसुद्धा गप्प आहेत. त्यातच अमित शाह यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांचे म्हणणे लगबगीने ऐकून घेऊन राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती राखण्यासाठी अतिरिक्त दले मंजूर केली. राज्यातील यंत्रणा कोलमडून पडली असल्याने राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी काँग्रेस नेते करत असले तरीही भाजप गप्प आहे. नेत्यांविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध एफआयआर दाखल करून त्याला गजाआड करण्याचा सिलसिला भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यांमध्ये चालला आहे; पण अमृतपाल सिंगचा विषय निघतो तेव्हा ओठ शिवून टाकले जातात. 

पंजाबमधला नवा नेता म्हणून उदयाला आलेल्या या २९ वर्षीय धर्मोपदेशकाचे काय करायचे, याविषयी पक्ष चाचपडत आहे. अमृतपाल स्वतःला भिंद्रनवालेंचा शिष्य म्हणवतो. शस्त्रधारी पाठीराख्यांच्या गराड्यात फिरतो. दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये त्याचे समर्थक गुरुद्वारावर ताबा मिळवत आहेत. या घटनांनी गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणाही चिंतित झाल्या आहेत. भाजपने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आता आली आहे.

केजरीवालसुद्धा ‘मौनात’ ‘आप’चे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेसुद्धा पंजाबमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर मौनात गेले आहेत. त्यांनीही अजनाला घटनेनंतर चकार शब्द काढलेला नाही. पंजाबमधील आप  सरकारने दोषींविरुद्धचा एफआयआर रद्द केला; परंतु पंजाबमधील या घटना बारकाईने पाहणाऱ्यांचे म्हणणे असे आहे की, जानेवारी २०१७ मध्ये निवडणूक काळात केजरीवाल खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा कार्यकर्ता गुरविंदर सिंह याच्या घरी राहिले होते, तेव्हा ‘आप’चे या मंडळींशी असलेले धागेदोरे उघड झाले होते. गुरविंदर हा खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा पूर्वीचा प्रमुख आहे. पंजाबमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचलेला होता त्या काळात हिंदू- शीख दंगली भडकवण्याचा आरोप त्याच्यावर आहे. खुनाच्या आरोपावरून त्याला तुरुंगवासही  झालेला आहे. अशा सगळ्या खटल्यातून गुरविंदर निर्दोष सुटला असला तरीही या वादंगामुळे २०१७ साली आपला मोठी किंमत मोजावी लागली होती. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’साठी या मंडळींनी खुलेआम प्रचार केला असे म्हटले जाते. याच कारणाने बहुधा आता केजरीवाल यांचीही वाचा गेली आहे.

संघर्षाच्या पवित्र्यात वसुंधराकर्नाटकमधील नेते येडियुरप्पा यांना केंद्रीय संसदीय मंडळ आणि राज्याच्या निवडणूक समितीत समाविष्ट करून घेऊन भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्याविषयीचा वाद मिटवला असे दिसते आहे. लालकृष्ण अडवाणी आणि इतरांप्रमाणे त्यांना वानप्रस्थात पाठवण्याचा भाजप श्रेष्टींचा निर्णय या ८० वर्षांच्या नेत्याने बदलायला लावला; परंतु सत्तरीत पोहोचलेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे मात्र नमते घ्यायला तयार नसल्यामुळे त्यांना सरळ कसे करायचे, असा प्रश्न आता भाजप नेतृत्वापुढे  आहे. वसुंधरा राजे यांनी शस्त्रे खाली ठेवावीत असे श्रेष्ठींना वाटते आहे; परंतु जन्माने राजपूत आणि जाट कुटुंबात विवाह झालेल्या तसेच गुजर समाजातील सून असलेल्या माजी मुख्यमंत्री झुकायला अजिबात तयार नाहीत. राजस्थानचे प्रभारी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग यांची त्यामुळे तारांबळ उडत आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत गजेंद्रसिंह शेखावत यांना पक्षाचा चेहरा म्हणून समोर ठेवण्याचा भाजपचा मानस आहे. परंतु वसुंधरा राजे मागे हटायला तयार नाहीत. त्या लढण्याच्या पवित्र्यात आहेत. पक्षश्रेष्ठी पुन्हा ‘मौनात’ गेले आहेत.

टॅग्स :PunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवालGovernmentसरकार