शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार

By यदू जोशी | Updated: April 3, 2024 12:12 IST

Eknath Shinde: ठाकरेंची सद्दी संपविण्याचा तर्क देऊन मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या शिंदेंसमोर आता लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. शिंदेंकडे पक्ष गेला, धनुष्यबाण हे चिन्हही गेले पण शिवसेना खरेच गेली का याचा फैसला होण्याची घडी आता समीप येऊन ठेपली आहे.

- यदु जोशीमला उपमुख्यमंत्री केले तर मी उद्धव ठाकरेंची सद्दी संपवू शकणार नाही, दुसरे म्हणजे मी उपमुख्यमंत्री झालो तर राज्यभरातील शिवसैनिक म्हणतील, तुम्ही काय हशील केले? आपले (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री होते, त्यांना हटवून तुम्ही उपमुख्यमंत्री झालात मग तुम्ही मिळवले काय...? शिवसैनिकांच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसेल. म्हणूनच मला मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे असे दोन तर्क एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाताना दिल्लीतील भाजपच्या श्रेष्ठींना दिले होते म्हणतात आणि ते मान्य करण्यात आले. शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. 

ठाकरेंची सद्दी संपविण्याचा तर्क देऊन मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या शिंदेंसमोर आता लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. शिंदेंकडे पक्ष गेला, धनुष्यबाण हे चिन्हही गेले पण शिवसेना खरेच गेली का याचा फैसला होण्याची घडी आता समीप येऊन ठेपली आहे. महायुतीत आलेला तिसरा पक्ष म्हणजे अजित पवारांचा गट. शिंदेंच्या पक्षापेक्षा अजितदादांना निम्म्याही लोकसभा जागा लढायला मिळणार नाहीत हे खरे असले तरी भाजपला मित्रपक्ष म्हणून आमचा गट अजित पवारांपेक्षा कसा आणि किती उपयुक्त आहे हे शिंदेंना सिद्ध करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जागा निवडून आणाव्या लागतील. तसेच भाजपच्या जागा निवडून येण्यासाठी अजित पवारांपेक्षा मी कसा उपयुक्त ठरलो हेही सिद्ध करावे लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर जागावाटपाची चर्चा करताना शिंदेंचा खूप कस लागतो आहे. कारणही तसेच आहे. तत्कालीन शिवसेनेचे १८ पैकी १३ खासदार शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे सिटिंग-गेटिंग फॉर्म्युल्यानुसार या १३ जागा तर आपल्याला मिळायलाच हव्यात, आणखी दोन जागा द्या म्हणून शिंदेंचा आग्रह आहे. भाजप ते मान्य करायला तयार नाही. शिंदेंच्या पारड्यात जास्त जागा टाकल्या की अजित पवारांचा गट मागे लागतो अशी भाजपची अवस्था आहे. शिंदे दिसतात साधे पण मनाचे करवून घेतात, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतरांनाही हा अनुभव वेळोवेळी येतच असेल. यावेळी मनासारख्या जागा पदरात पाडून घेण्यात शिंदेंना कितपत यश येते ते आज, उद्या कळेलच. 

ही लोकसभा निवडणूक शिंदेंसाठी आणखी काही कारणांनीही महत्त्वाची आहे. २०२२ मध्ये ते भाजपच्या साथीने मुख्यमंत्री झाले, ती त्यावेळची भाजपचीही मजबुरी होती. अशी मजबुरी दरवेळी राहीलच असे नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीला दमदार यश मिळवून देणे आणि हे यश आपल्यामुळे कसे मिळाले याची मुद्देसूद मांडणी दिल्लीश्वरांकडे करणे हे शिंदेंच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असेल. उद्धव ठाकरे गटापेक्षा अधिक जागा किंवा त्यांच्यापेक्षा अधिकच्या सरासरीने जागा शिंदे यांना जिंकाव्या लागतील. तसे झाले तरच खरी शिवसेना माझीच या आपल्या दाव्यावर सर्वसामान्य मतदारांनीही मोहोर उमटविल्याचे शिंदे छातीठोकपणे सांगू शकतील. लोकसभा निवडणुकीतील त्यांची कामगिरी ही विधानसभेच्या यशाचे दार उघडणार की बंद होणार याचा फैसला करणारी असेल. लोकसभाच नव्हे तर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळीही शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे फडणवीस, बावनकुळे नेहमीच सांगतात. मात्र, विधानसभेनंतर काय होईल, शिंदेच मुख्यमंत्री राहतील की आणखी कोणी या प्रश्नाचे उत्तर लोकसभेच्या निकालात दडलेले असेल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४