शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 08:03 IST

लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष, गट, जात किंवा नेत्याचा पराभव झाल्याने निराश झालेल्या काही तरुणांनी आत्महत्या केल्या. याला ‘जबाबदार’ कोण?

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, छ. संभाजीनगर |

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा, गटाचा, जातीच्या नेत्याचा पराभव असह्य झाल्याने नैराश्येत गेलेल्या काही तरुणांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. निवडणुकीत हार-जीत होत असते. आजवर अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एखाद्या निवडणुकीतील पराभवाने एखाद्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येतेच, असे नाही. जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेल्या अनेक राजकीय नेत्यांचा पुढे उत्कर्ष झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

निवडणुकीतील अपयशाने एखाद्या उमेदवाराला नैराश्य येणे ही नैसर्गिक बाब आहे; परंतु पराभव जिव्हारी लावून समर्थकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलावे? नेत्यांप्रति एवढी निष्ठा, प्रतिष्ठा आणि आत्मसमर्पणाची भावना येतेच कुठून? राजकीय नेत्यांमध्ये अशी कोणती दैवी शक्ती, आकर्षण अथवा चुंबकीय तत्त्व असते, म्हणून शेकडो तरुण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.

आपल्याकडे राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट हे अत्यंत जिव्हाळ्याचे, आकर्षणाचे आणि तितकेच इर्षेचे विषय असतात. समर्थकांच्या गटांमध्ये अत्यंत टोकाचे मतभेद दिसून येतात. प्रसंगी हमरीतुमरीवर येण्याचे प्रसंग उद्भवतात. दक्षिणेकडील राज्यात तर नेते आणि अभिनेत्यांचे किती देव्हारे सजवले जातात हे सर्वश्रुत आहे. या समर्थकांकडून राजकीय नेत्यांचे, अभिनेत्यांचे पुतळे उभारले जातात, त्यांच्या प्रतिमेची मंदिरात प्रतिष्ठापना होते, घरावर, वाहनावर प्रतिमा लावल्या जातात. या फॉलोअर्सच्या जीवावर त्यांचे राजकारण, सिनेमाचा गल्ला आणि क्रिकेटपटू जाहिरातींच्या माध्यमातून बक्कळ कमाई करतात. या फॉलोअर्समुळेच एखाद्या अभिनेत्याचा टुकार सिनेमादेखील हिट होऊन जातो! यालाच इंग्रजीत ‘सेलिब्रिटी ऑबसेशन सिंड्रोम’ म्हणतात. असा सिंड्रोम आता राजकीय समर्थकांमध्येही दिसून येऊ लागला आहे.

एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये एका सेलिब्रिटीच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘द सॉरो ऑफ यंग वर्दर’ या कादंबरीने खळबळ माजली होती. त्या सेलिब्रिटीच्या शेकडो समर्थकांनी आत्महत्या केल्या. त्यातूनच ‘वर्दर इफेक्ट’ ही थिअरी पुढे आली.

सामाजिक, वैचारिक भूमिकेतून एखाद्या राजकीय नेत्याचे, पक्षाचे समर्थन करणे अथवा अभिनय क्षमता पाहून अभिनेत्यांना फॉलो करणे ही बाब एकवेळ समजू शकते. परंतु, हल्ली सर्वच क्षेत्रांत अंधभक्ती फोफावली आहे. जातीय अस्मिता, अहंकार टोकदार बनल्याने किंबहुना त्याला खतपाणी मिळत असल्याने अंधभक्तांच्या संख्येत कमालीची वृद्धी झाल्याचे दिसतेच आहे. आपल्याकडच्या राजकारणात तर जात हा अविभाज्य घटक असल्याने निवडणुकांना जातीय रंग चढू लागला आहे. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक हे ताजे उदाहरण. महाराष्ट्रात जवळपास सर्वच मतदारसंघांत अतिशय टोकाचा जातीयवाद पाहायला मिळाला. आजवर गुण्या-गोविंदाने नांदणाऱ्या गावखेड्यातदेखील उभ्या-आडव्या सामाजिक फटी पडल्या असून, जाती-जातींमधील संवादाच्या, सौहार्दाच्या आणि सहजीवनाच्या गल्ल्या अरुंद बनल्या आहेत. दुसऱ्या समाजातील व्यावसायिकच नव्हे, तर अगदी कीर्तनकारांवरही बहिष्कार टाकल्याच्या घटना समोर येत आहेत. राजकारणाने निर्माण केलेला हा सामाजिक दुभंग पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणारा आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेले तरुण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील होते. चौघांपैकी एक तरुण तर संबंधित नेत्याच्या सोशल मीडियासाठी काम करत होता. मतदारसंघात टोकाचा जातीयवाद सुरू असल्याची जाणीवही त्याला असावी. निवडणुकीत केवळ आपला नेताच नव्हे तर जातदेखील हरली हे  शल्य आणि कदाचित यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्येसारखे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. या केवळ आत्महत्या नसून जातीय राजकारणाने घेतलेले  बळी आहेत. जातीचे राजकारण करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना यासाठी जबाबदार धरले पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून अशाप्रकारे जातीयवाद उफाळून येणार असेल, तर उद्या अनेकांना घराबाहेर पडणेदेखील मुश्किल होऊ शकते !

( nandu.patil@lokmat.com )

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024beed-pcबीड