शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 9:19 AM

योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे.

डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असो., महाराष्ट्र|

कोणताही दीर्घकालीन आणि प्राण गंभीर आजार सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवतो. त्यातही कर्करोग म्हटले की भल्याभल्यांचे हातपाय गळून जातात. पण कर्करोगावर उपचार होऊ शकतात आणि वैद्यकीय शास्त्रातील काही आधुनिक उपचार पद्धतींनी, काही कर्करोग बरेही होतात आणि बरेचसे नियंत्रणात येतात.

कर्करोगाच्या संदर्भात किचकट आजार आणि त्यावरील उपचारही बरेच महागडे, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना ‘आता काय करायचे?’ म्हणून धडकी भरते. पाश्चात्त्य देशात विविध आजारांवरील उपचार अतिशय महागडे आणि सधन कुटुंबातील लोकांनाही न परवडणारे असल्याने काही गंभीर आजार उद्भवले की ते भारतात धाव घेतात. योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी नाही.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या मान्यताप्राप्त भारतीय वैद्यकीय नियतकालिकात, नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात कर्करोगाचे अंदाजे १४,६१,४२७ रुग्ण होते. हे प्रमाण, दर १ लाख भारतीयांमध्ये सरासरी १०० जण कर्करोगग्रस्त असल्याचे दर्शवते. दर नऊ भारतीयांमधील एकाला आयुष्यभरात केव्हा तरी कर्करोग होण्याची शक्यता असते. पुरुषांमध्ये फुप्फुसांचा, स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि १४ वर्षांपेक्षा लहान मुलामुलींमध्ये रक्ताचा कर्करोग (लिम्फॉइड ल्युकेमिया) मोठ्या प्रमाणात आढळून आले. संशोधकांच्या अनुमानानुसार २०२५ पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये १२.८ टक्के वाढ होऊ शकते.

कर्करोगाच्या उपचारांसाठी पुढील काही महत्त्वाच्य पद्धती आज उपलब्ध आहेत.

१. शस्त्रक्रिया : यामध्ये कर्करोगाची गाठ आणि आसपासच्या उती काढून टाकल्या जातात. पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.२. केमोथेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी, कर्करोगाच्या गाठीचा आकार कमी करण्यासाठी, केमोथेरपीमध्ये काही विशेष औषधे शिरेवाटे दिली जातात. याचा वापर दुसऱ्या टप्प्यानंतर केला जातो.३. रेडिएशन थेरपी : कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी, त्यांची वाढ रोखण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यासाठी किरणोत्सर्गी पदार्थांचे उच्च डोस या पद्धतीत वापरतात. शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही अशा प्रमाणात कर्करोगाची वाढ झाली असेल, तर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात रेडिएशन दिले जाते. 

कर्करोग रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघत नाही. त्यामुळे गोरगरिबांनाच नव्हे, तर मध्यमवर्गीयांसाठीही हे उपचार आर्थिक कुवतेच्या पलीकडे असतात. पाश्चात्त्य नागरिकांची उपचारासाठी भारतात धाव घेण्यामागे केवळ आर्थिक बचत हे कारण नसून भरवशाचा उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी हेदेखील एक कारण आहे.  कर्करोग, हृदयाच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया, अवयवारोपण अशा अनेक वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून लाखो रुग्ण दरवर्षी भारतात येतात. रास्त दर, उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय सेवा, अल्पप्रतीक्षा कालावधी, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, वैविध्यपूर्ण उपचार पर्याय, भाषिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता.. या सर्व गोष्टींमुळे आपला देश लाखो परदेशी रुग्णांसाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे. परंतु आजमितीला काही ठरावीक खासगी हॉस्पिटल्स आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करत आहेत. मात्र या गोष्टींचे नियोजन मोठ्या प्रमाणात, सर्वसमावेशक दृष्टीने, अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक व्यावसायिक पद्धतीने जगभरात सादर केले गेल्यास भारतात आणखी रुग्ण येतील. परिणामी आपल्याला अधिक परकीय चलन तर मिळेलच; पण त्यामुळे या वैद्यकीय सेवांचा खर्च कमी होऊ शकेल. त्याचा फायदा निश्चितच परदेशी आणि गरीब भारतीय रुग्णांना मिळू शकेल.

(avinash.bhondwe@gmail.com)

टॅग्स :cancerकर्करोगMedicalवैद्यकीय