शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अध्यात्म -हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:58 IST

जगात दिशाहीन माणसं किती आहेत? भरपूर. प्रत्येकाला वाटतं माझी दिशा बरोबर. अगदी लहानपणापासून हे दिशाप्रकरण प्रत्येकाची डोकेदुखीच असते. सध्या तर चांगली दिशा मिळणं म्हणजे शिक्षणाची हवी ती शाखा मिळणं हेच आहे.

- किशोर पाठकजगात दिशाहीन माणसं किती आहेत? भरपूर. प्रत्येकाला वाटतं माझी दिशा बरोबर. अगदी लहानपणापासून हे दिशाप्रकरण प्रत्येकाची डोकेदुखीच असते. सध्या तर चांगली दिशा मिळणं म्हणजे शिक्षणाची हवी ती शाखा मिळणं हेच आहे. माझ्या मुलाला इंजिनिअर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय पण त्याला हवी ती ब्रँच मिळालीच नाही किंवा मिळाली ह्यातच आपलं सुख-दु:ख सामावलं आहे. त्याहीपेक्षा एखाद्याचं पूर्वायुष्य खूपच सरळ, संथ, नेमाने चालू असतं. पुढे असा एखादा धक्का बसतो, वळण येतं की, जगण्याची दिशाच बदलते.एखादी शाळेत जाणारी मुलगी प्रचंड उलथापालथ होऊन शरीरविक्रय करू लागते. एखादा चांगला नोकरी असलेला माणूस धंद्याचे डोहाळे लागून रस्त्यावर येतो. भोंगळा होतो. एखादा घरदार साºयांपासून वंचित होतो. एखाद्याला नवीन आईबाबा भेटून तो परदेशात मजा मारतो.एखाद्याला आईच्या रूपात बाई भेटते, एखाद्याला असलेली आई गमवावी लागते. हे गमवणं फार वाईट. माणसाला मिळालेल्यापेक्षा गमवणं फार लागतं. म्हणूनच आयुष्यात किती माणसं जोडली ह्यापेक्षा किती गमावली हा हिशेब महत्त्वाचा असतो.संपूर्ण आयुष्यात किमान दोन चार वेळा हा हिशेब करावाच लागतो. प्रथम शिक्षण मग नोकरी व्यवसाय मग लग्न, मुलं, प्रतिष्ठा, स्टेटस हे सगळं बघता बघता सांभाळतांनाच म्हातारपण येतं आणि कळतं की आत्ता काय कमावलं आणि काय गमावलं. काहींना हा हिशेब करणं आवडत नाही. मिळालं ते आपलं, गेलं ते गेलं ह्या वृत्तीने माणसं राहतात. त्यांना देण्याघेण्याचे प्रश्न पडत नाहीत. पण पडतात तेव्हा ते मुळातून उखडतात किंवा ताठ उभे राहतात. माणसांच्या ह्या विविध रूपांना पाहताना मन थक्क होतं.अगदी एकाच वेळेस जन्माला आलेल्या मुलांची कुंडली, भविष्य वेगळंच असतं. ते कसं काय? आपण प्रश्न विचारायचे, उत्तरे शोधायची आणि ह्या जाळ्यात भिरभिरत राहायचं. कारण माणूस एक भुईचक्र आहे, ते जमिनीवरच घिरट्या घालत राहतं. ते विमानही आहे जे वर जाऊन राख होऊन खाली पडतं. हा हिशेब कठीण आहे. म्हणूनच नकळत केलेला आणि झालेला हिशेब फलदायी!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र