शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

मुक्तीच्या आंदोलनाची अजूनही गरज

By admin | Published: August 09, 2015 3:19 AM

मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य.

- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (निवृत्त)मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य. ते अजून स्थापन झालेलं नाही. धार्मिक, आर्थिक, सामाजिक असल्या कुठल्याच गुलामगिरीतून आपण खऱ्या अर्थाने अजूनही मुक्त झालेलो नाही. या सर्व क्षेत्रांत अजून मुक्तीच्या आंदोलनाची गरज आहे.सत्तेचं विकेंद्रीकरण झालं नाही, उलट केंद्रीकरण झालं. ‘बुनियादी शिक्षण’ ही गांधीजींची भावना होती, ती शिक्षण क्षेत्रात आली नाही. आम्ही मुंबईच्या ज्या भागात राहतो तेथील कुठल्याही घरामध्ये मातृभाषा मराठी राहिलेली नाही. म्हणजे कुठल्याच घरामध्ये असा नातू नाही, जो आजी-आजोबाला मराठी भाषेतून पत्र लिहू शकेल. म्हणून इंग्रज गेले अंग्रेजियत कायम आहे. आम्ही दोनच प्रकारचे स्वातंत्र्य मानत होतो, एक त्यागावर आधारित दुसरे भोगावर आधारित. त्यागावर आधारित संस्कृती जोपर्यंत प्रस्थापित होत नाही आणि गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पना जोपर्यंत सार्थक होत नाही, तोपर्यंत स्वराज्य आलं असं आम्हाला वाटत नाही. स्त्रियांबद्दलचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न असो वा शेतकऱ्यांचा प्रश्न असो सर्व क्षेत्रांत अजूनही मुक्तीच्या चळवळींची गरज आहे. श्रमाला प्रतिष्ठा नाही म्हणून कोणीही शेती करू इच्छित नाही. प्रतिष्ठेचं जगणं याला आम्ही स्वातंत्र्य म्हणतो, स्वराज्य म्हणतो; जे अजून मिळायचं आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत आज मुक्तीच्या चळवळीची गरज आहे.

(लेखकांनी छोडो भारत चळवळीत सहभाग घेतला होता.)