शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

बोलाचीच कढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:44 IST

चुकांची जाणीव करून देत सत्ताधाºयांना खडे बोल सुनावणे ही साधी गोष्ट नाही; पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते सुनावले, त्यावेळी सांगलीच्या संमेलनातील दुर्गा भागवत आठवल्या

चुकांची जाणीव करून देत सत्ताधाºयांना खडे बोल सुनावणे ही साधी गोष्ट नाही; पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते सुनावले, त्यावेळी सांगलीच्या संमेलनातील दुर्गा भागवत आठवल्या. दुर्गा भागवतांचा काळ वेगळा होता, तो खºया अर्थाने पुरोगामी विचार करणाºयांचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारा होता, दुस-याचे विरोधी विचार समजून घेण्याचा होता. दुर्दैवाने आज ही परिस्थिती नाही आणि केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी वैचारिक लढा देणारा कोणी साहित्यिक मराठी सारस्वतांमध्ये दिसत नाही. हा काळाचा महिमा म्हणावा का? अशावेळी देशमुखांनी सडेतोड भूमिका घ्यावी हा आश्चर्याचा धक्का. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांनी समाज ढवळून निघाला आहे. गोहत्या बंदी कायदा, मराठा आरक्षण आंदोलन, कोपर्डी बलात्कार प्रकरण, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे या दोन पुरोगामी लढवय्यांच्या हत्या, शेतकºयांचे आत्महत्या सत्र असे अनेक प्रश्न उद्भवले. ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला. गोहत्या बंदी कायद्यानंतर तर काही निरपराध लोकांना जीव गमवावा लागला. या घटनांचे तरंग साहित्यिक आणि साहित्य विश्वात उमटले नाहीत हे वास्तव आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चांनी तर सामाजिक घुसळण झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या पंधरा वर्षांत शेतकºयांच्या आत्महत्या ही नैमित्तिक घटनाच होऊन बसली. यावर साहित्यात काही ठोस लिहिले गेले. ज्यांची नाळ ग्रामीण जीवनाशी अजून बांधलेली आहे, अशा बोटावर मोजता येतील एवढ्याच साहित्यिकांनी त्याला वाचा फोडली. नाही तरी आपल्यांकडे शहरी-ग्रामीण अशी साहित्याची विभागणी आहेच ती एवढ्यावर थांबली नाही, तर समाज घटकांपर्यंत ही उतरंड वाढली; अशा कोणत्याच घटनांवर साहित्यिकांनी ठोस भूमिका म्हणण्यापेक्षा कोणतीच भूमिका घेतली नाही हे वास्तव कसे विसरता येईल. तिकडे तामिळनाडूत पेरूमल मुरुगन ज्यावेळी आपले मर्तिक आटोपतो तेव्हा पुरोगामी साहित्यिकांची फळीच रस्त्यावर उतरते. आंदोलन उभे राहते ते केवळ साहित्यिकांचे आंदोलन न राहता समाज आंदोलन घडते, असे एखादे वानगीदाखल उदाहरण मराठी साहित्यात आहे का? साहित्यिकच साहित्यिकांच्या मदतीला जाण्याचे हे उदाहरण असले तरी मराठी साहित्य विश्वात या भाईचा-याचा दुष्काळच आहे. आनंद यादव यांना जे भोगावे लागले त्याची एक वेगळीच कादंबरी होऊ शकली असती. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निर्वाचित अध्यक्षावर अध्यक्षपद न भूषविण्याची नामुष्की आली. अध्यक्षपदावर दरवर्षी होणारे साहित्यिकांमधील संकुचित राजकारणाचे ओंगळवाणे चित्र मराठीत दिसते, त्याचे बळी आनंद यादव ठरले. हे काही एकमेव उदाहरण नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांचा उल्लेख बैल असा केला. त्याचा साधा निषेध करण्याचे धाडस कोणी दाखविले नव्हते. २००४ साली भांडारकर संशोधन केंद्रावर हल्ला झाला. त्याच्याविरुद्ध कोणी बोलले नाही. कोणत्याही ज्वलंत आणि वादग्रस्त विषयावर भूमिका न घेण्याची साहित्यिकांमधील प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत गेली आणि देशमुखांच्या वक्तव्याने हे सारे आठवले. गेल्या पाव शतकात साहित्यिकांचे कंपूकरण झाले. प्रत्येकाचा गट-तट वेगळा. जी काही मंडळी गंभीर लिखाण करणारी आहे ती शांतपणे आपले काम करताना दिसते. त्यांचे योगदान तर मराठीला समृद्ध करीत आहे; पण हौशा, गवशांचीच एवढी गर्दी झाली की, यात ही माणके सापडत नाहीत. हौशी मंडळी राजकीय नेत्यांच्या कच्छपी लागल्याचे चित्र दिसते, अशा एक ना अनेक अपप्रवृत्तींनी साहित्यक्षेत्र गढूळ झाले आहे, अशा वेळी कोण कोणाला खडे बोल सुनावणार. राजाला सुनावणे सोपे आहे वास्तविक साहित्यिकांनाच खडे बोल कोण देशमुख ऐकवणार?

टॅग्स :Laxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुख