शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

‘पेन्शन’चे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:08 IST

उतारवयात पेन्शन हा निवृत्त कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असतो.

उतारवयात पेन्शन हा निवृत्त कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असतो. ज्याची पेन्शन सुरू त्याला कशाचेही टेन्शन नसते. काही पेन्शनधारकही गर्वाने ही बाब सांगतात. मात्र सध्या डिजिटलायझेशनच्या नावावर पेन्शनधारकांची फरपट सुरू आहे. शासकीय यंत्रणेत डिजिटलायझेशनवर सरकारचा भर आहे. त्याला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र डिजिटलायझेशनच्या नावावर वृद्धांचा आधार हिरावून घेणे, ही निश्चित चिंतेची बाब आहे. संसदेत थोडी वर्षे सेवा देणाºया खासदारांना पेन्शन नियमित मिळते. मात्र ३० ते ३५ वर्षे सेवा करणाºयांना सध्या पेन्शनसाठी संघर्ष करावा लागतो आहे. अशासकीय कर्मचाºयांना केवळ हजार रुपये पेन्शन मिळते. आधीच कमी पेन्शन, वरून डिजिटलायझेशनच्या नावाखाली वृद्ध पेन्शनर्सना प्रकृती साथ देत नसताना जीवन प्रमाणपत्र, आधार लिंक आदींसाठी स्वत:च्या खर्चाने ईपीएफओ कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागतात. तरीही काम होत नाही. वारंवार बोलावले जाते. म्हातारपणात सुद्धा संघर्ष करावा लागतो आहे. वृद्धांना सहानुभूती देण्याऐवजी अधिकाधिक कसा त्रास होईल, याचाच प्रयत्न शासन-प्रशासन करीत असल्याचा आरोप सध्या होतो आहे. कर्मचारी भविष्य निधी नागपूर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १ लाख २४ हजार ५७९ पेन्शनर्स येतात. यापैकी ११ हजार १६५ पेन्शनर्सची गेल्या काही महिन्यांपासून पेन्शन रोखण्यात आली आहे. कारण काय तर भविष्यनिधी कार्यालयाशी टायअप करणाºया बँकांनी जीवन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली. ही स्थिती राज्यातील इतर भागातही आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधीचे काम डिजिटल केले आहे. त्यामुळे भविष्य निधी कार्यालयाचा बँकांशी होणारा व्यवहार आता आॅनलाईन झाला आहे. कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाशी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व सेंट्रल बँक आॅफ इंडिया या बँका जुळल्या आहेत. गावाखेड्यातील सेवानिवृत्त कर्मचारी या बँकेच्या त्या-त्या जिल्ह्यातील शाखेतून पेन्शन प्राप्त करतात. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाºयांच्या जीवन प्रमाणपत्रासाठी आधार लिंक केले आहे. कर्मचाºयांचा आधार नंबर लिंक झाल्यावर कर्मचाºयांना जीवनप्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्रासाठी भविष्य निधीच्या केंद्रीय कार्यालयाने प्रत्येक बँकेला त्यासाठी सेटअप तयार करण्याचे सांगितले होते. परंतु यासाठी बहुतांश बँकांनी हात वर केले. एकीकडे सरकारी बँका तोट्यात जात असताना त्या नफ्यात कशा येतील यावर मंथन होण्याऐवजी पेन्शनधारकांना मात्र सतराशेसाठ नियम सांगितले जातात. ही निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले असताना हजार रुपये पेन्शन मिळविण्यासाठी वृद्ध पेन्शनधारकांना ईपीएफओ कार्यालयाच्या या चक्रातून मुक्ती देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का ?

टॅग्स :MONEYपैसा