शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

लोकसभेचा ढोल वाजतोय, पण आवाज कुणाचा?

By किरण अग्रवाल | Updated: February 11, 2024 16:51 IST

Loksabha Election : तोंडावर आल्या निवडणुका, पण नक्की कोण लढणार याबाबत संभ्रमच

 - किरण अग्रवाल 

आगामी लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांची तयारी झाली आहे, पण उमेदवार उघडपणे पुढे येताना अद्याप दिसलेले नाहीत. महायुती व आघाडी अंतर्गतच्या पक्षीय पातळीवरील जागावाटपांचे फार्म्युले नक्की झाल्यावरच यात गतिमानता येईल, तोपर्यंत आडाखेच बांधत राहायचे.

लोकसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आहे, राष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत; पण स्थानिक पातळीवर कमालीची संभ्रमावस्था आहे. मतदारांमध्ये ती नसावीही, पण नेमका कोणता पक्ष लढणार व त्याचा उमेदवार कोण असेल याबाबतची ही अविश्वसनीयता ऐनवेळी उमेदवारांचीच दमछाक करणारी ठरली तर आश्चर्य वाटू नये.

निवडणुकीच्या तारखा घोषित होऊन आचारसंहिता कधीही लागू शकते अशी एकूण स्थिती असल्याने, विकासकामे उरकण्याचा सपाटा लागला आहे. एकेका कामाचे भूमिपूजन वा लोकार्पणासाठी जिथे ताटकळत राहावे लागले होते तेथे एका दिवसात वा दौऱ्यात अनेक नारळ फुटत आहेत. आठ-आठ दिवसांत परिसराचे रूप पालटत आहे हे चांगलेच म्हणायचे. निवडणुकीच्या चाहूलमुळे साऱ्या राजकीय पक्षात सक्रियताही आली आहे. मुद्दा हाती लागण्याचा अवकाश, की आंदोलने होऊ लागली आहेत. नेत्यांचे दौरे वाढले असून, पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना ''भाव'' आला आहे. निवडणुकीचा ढोल वाजतो आहे, परंतु हे सारे होत असताना लोकसभेच्याच दृष्टीने बोलायचे तर उमेदवार कोण? यावर मात्र कोणत्याही पक्षात वा पक्षाबाहेरही कुठे एकवाक्यता आढळत नाही.

पश्चिम वऱ्हाडापुरते बोलायचे तर, खासदार संजय धोत्रे यांनी तब्बल वीस वर्षांपासून अकोल्याची जागा एकहाती राखली आहे, पण त्यांच्या वैद्यकीय अडचणी पाहता भाजपचा यंदाचा उमेदवार अद्याप समोर आलेला नाही. ऐनवेळी कोणाचे नाव पुढे करायचे हे पक्षाच्या मनात नक्की असेलही, पण स्थानिकात केवळ चर्चाच झडत आहेत. समोर महाआघाडीमध्ये कोणता पक्ष लढणार याचीच घुळघुळ सुरू आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे खरी, परंतु त्यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीचा महाआघाडी आणि ''इंडिया'' यात कुठे व कसा समावेश होतो हेच अजून निश्चित होताना दिसत नाही. त्यामुळे ''असे'' झाले तर ''कसे''? याच भोवती सारे आडाखे बांधले जात आहेत. काँग्रेसमध्ये ऐनवेळी चर्चेत नसणारे नाव येण्याची परंपरा असूनही काहीजण कंबर कसून तयारीला लागलेले दिसत आहेत, पण मुळात पक्षालाच येथून जागा सुटते का, याचीच संभ्रमावस्था आहे.

बुलढाण्याचीही परिस्थिती अकोल्यासारखीच आहे, फक्त पक्ष वेगळा आहे एवढेच. तेथे आजवर शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी तीन वेळा जागा राखली. ते शिंदे गटात गेलेले असल्याने यंदा त्यांच्याही उमेदवारीबाबत चर्चा झडत आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे तेथे वरचेवर दौरे होत असतात. जिल्ह्यातील काही आमदारांची खासदारकीसाठी चाचपणी करून पाहिली गेली म्हणे, पण खुद्द त्यांनीच अनिच्छा दर्शविल्याची वदंता आहे. महाआघाडीतून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी नक्की झाल्याचे बोलले जात असले तरी अधिकृत घोषणा नाही. आजवर विरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादीचे काय? हेदेखील गुलदस्त्यात आहे. अन्य संभाव्य इच्छुकही आहेत, पण सध्या त्यांचा खेळ ''व्हाॅट्सॲप''वरच सुरू आहे. पक्षाच्या पातळीवर कुणी कुणाचे नाव एकमताने घेताना दिसत नाही.

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ भावना गवळी यांनी तब्बल पाच वेळा राखला आहे. त्याही शिवसेना शिंदे गटात गेलेल्या असल्याने शिवसेना ठाकरे गट तेथे जोरात तयारीला लागला आहे, पण स्वतः गवळी यांनी ''मेरी झासी नही दुंगी'' अशी गर्जना जाहीरपणे केल्याने अन्य पर्यायी इच्छुकांचे मनसुबे उघड होऊ शकलेले नाहीत. गवळी यांच्या शिंदे गटाची महायुती असलेला भाजपही तेथे मैदानात गर्जना करताना दिसून येत आहे. पण कोणता पक्ष लढणार हेच नक्की नसल्याने अन्य उमेदवार उघडपणे दावेदारी करताना दिसत नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीवर तूर्त शांतता असली तरी यवतमाळमधील काही नावे पुढे केली जात आहेत.

सारांशात, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सारेच पक्ष लागले असले तरी महायुती व महाआघाडी अंतर्गत कोणत्या जागा कोणी लढायच्या हेच नक्की नसल्याने उमेदवारीबाबतच्या नावांची केवळ चर्चाच होताना दिसत आहेत. सुस्पष्टता कुणाच्याही नावाबाबत नसल्याने स्थानिक पातळीवरचा माहोल नेमके उमेदवार पुढे आल्यावरच बदलण्याची चिन्हे आहेत, त्याचीच वाट बघायची...