शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पेरलेले समाजातील अभ्यासकच मराठा आरक्षणाचे मारेकरी, मनोज जरांगे यांची टीका
2
Bajaj Freedom 125 CNG Bike: शॉकिंग मायलेज! बजाजच्या जगातील पहिल्या CNG Bike ची किंमत जाहीर; पहा फिचर्स, फर्स्ट लूक...
3
Video: माँ की ममता! 'जग जिंकून आलेल्या' रोहित शर्माला जेव्हा माऊली जवळ घेते तेव्हा...
4
"प्यार करोगे तो…", शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
5
'मेक इन इंडिया'ची कमाल! देशाच्या संरक्षण उत्पादनात 16% वाढ; राजनाथ सिंह यांची माहिती...
6
मंगळ गोचराने गुरुशी युती योग: ७ राशी लकी, अचानक मोठे लाभ; नोकरीत पदोन्नती; सुखाचा काळ!
7
अजित पवार लवकरच अमित शाहांची भेट घेणार; काय असेल कारण?
8
तेलंगणामध्ये काँग्रेसकडून चंद्रशेखर राव यांच्या BRSला सुरुंग, खासदारानंतर ६ आमदारही फोडले
9
जयंत पाटील म्हणाले, आज काय वेगळा मूड दिसतो, अजितदादा म्हणाले, "जबाबदारी वाढल्यावर.." सभागृहात टोलेबाजी
10
Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू
11
Virat Kohli Rohit Sharma: "रोहित रडत होता, मी रडतो होतो अन् मग.."; विराटने सांगितली 'त्या' खास क्षणाची आठवण
12
Microsoft मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, 'या' विभागातील सर्वाधिक लोकांना बसला फटका
13
जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार?
14
टीम इंडियातील मुंबईकर शिलेदारांवरून काँग्रेसचं ‘उत्तर भारतीय कार्ड’, मराठी आणि परप्रांतीय भेद करणाऱ्यांना लगावला टोला  
15
Raymond Share Price: Raymond चा शेअर बनला रॉकेट; कामकाजादरम्यान १८ टक्क्यांची वाढ, पोहोचली विक्रमी पातळीवर
16
"सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय", लाडकी बहीण योजनेवरही विजय वडेट्टीवारांची टीका 
17
'अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर तुमच्यासोबत'; नितेश राणेंचा गुजरात बसवरुन रोहित पवारांना टोला
18
जनतेचा त्रास पाहवेना; ५० लाखांचं कर्ज काढून घेतलेली जमीन आमदाराने रुग्णालयासाठी केली दान
19
ऑक्टोबरमध्ये मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार? भारताच्या 'शेजाऱ्या'कडे शांघाय परिषदेचे यजमानपद
20
"मुंबईकर कधीच निराश करत नाहीत...", भव्य-दिव्य स्वागत सोहळ्याने रोहित शर्मा झाला भावुक

दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 7:54 AM

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का?

डॉ. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव

दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी जिवाच्या आकांताने लढत आहेत. नियमितपणे चार-सहा महिन्यांनी दुधाचे दर पडतात. सरकार त्यावर किरकोळ डागडुजी करते. नंतर पुन्हा भाव कोसळतात. ही ‘संकट आवर्तने’ मूलभूत उपाय न केल्याने वारंवार येत राहतात.

‘किमान स्थिरता’ ही कोणत्याही क्षेत्राच्या प्रगतीची महत्त्वाची पूर्वअट असते. दूध क्षेत्रात अशी स्थिरता नाही. अशी किमान स्थिरता पाऊच पॅक दुधाबाबत निर्माण झाली आहे. मात्र, दूध पावडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित असल्याने त्या चढउतारानुसार दुधाचे खरेदीदर चढतात किंवा पडतात. शिवाय ‘फ्लश’ सीजनमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात दुधाचा पुरवठा वाढल्यामुळेही दुधाचे दर पडतात. महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात १ कोटी ३० लाख लिटर दूध संकलित होते. पैकी ९० लाख लिटर दूध पाऊच पॅकद्वारे घरगुती गरजेसाठी वापरले जाते. उरलेल्या किंवा सरप्लस ठरलेल्या ४० लाख लिटर दुधाची पावडर व बटर बनते. महाराष्ट्रात हे ‘रूपांतरित’ होणारे ४० लाख ‘सरप्लस’ दूधच भावातील चढ-उताराचे मुख्य कारण आहे. कारण, त्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर ठरतो.

दुधाला किमान किफायतशीर दर मिळावा ही मागणी आहे. राज्य सरकारने दूध संघ, दूध कंपन्या व सरकारी अधिकारी यांची समिती बनविली. दर तीन महिन्यांचे दूध खरेदी दर जाहीर करण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली. पशुखाद्याचे दर नियंत्रित करण्याची घोषणाही सरकारने केली. समितीने दुधाला ३४ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. सरकारने तसा आदेशही काढला. मात्र, आदेश लागू होताच दूध संघांनी दुधाच्या ‘रिव्हर्स रेट’चा सहारा घेत दर पाडले. नंतर तर आदेश झुगारून देत बेस रेटच ३४ वरून २७पर्यंत खाली आणला. खाद्याचे भाव कमी करा, असे सांगितल्याने नफ्याला चटावलेल्या कंपन्या पशुखाद्याचे भाव कमी करीत नसतात, असे आदेश पाळले जावेत यासाठी ‘कायदा व पर्यायी व्यवस्था’ सरकारकडे हवी. पण, सहकाराचे वाटोळे केल्यामुळे व सरकारी दूधखरेदी, प्रक्रिया व वितरणाची व्यवस्था संपविण्यात आल्यामुळे व ‘महानंद’सारख्या ब्रँडची वाट लावल्यामुळे अशी पुरेशी पर्यायी व्यवस्थाच सरकारकडे आज नाही.

राज्यातील २६ टक्के दूध संकलित करणाऱ्या सहकारी दूध संघांचे काही प्रमाणात ‘नियमन’ करण्याचे कायदेशीर अधिकार सहकार कायद्यांतर्गत सरकारकडे आहेत. मात्र, राज्यातील ७४ टक्के दुधाचे संकलन करणाऱ्या खासगी उद्योगातील नफेखोरीला लगाम लावणारी व्यवस्था सरकारकडे नाही.  वास्तविकत: खासगी दूध उद्योगालाही सरकारी अनुदाने व विकास योजनांचा लाभ झाला असल्याने सरकारी निर्बंध या उद्योगांवर लावणे योग्यच ठरणार आहे. साखर उद्योगाप्रमाणे सहकारी व खासगी दूध उद्योगाचे ‘नियमन’ करणारा कायदा करावा, ही शेतकरी संघर्ष समितीची मागणी आहे. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने साखरेचा एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगची तरतूद असणारा कायदा दुधाला लागू करता येणार नाही, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हे बरोबर नाही. कारण दूध पावडर हा टिकाऊ पदार्थ आहे. शिवाय पाऊच पॅकद्वारे विक्री होणाऱ्या ९० लाख लिटर दुधाची विक्री किंमत वर्षभर साधारणपणे स्थिर किंवा वाढती असते. पदार्थ नाशवंत असला तरी पदार्थाची विक्री किंमत स्थिर असल्याने अर्थशास्त्रीय परिभाषेत तरल दुधाचे नाशवंतत्व संपून जाते.

दुधाचा महापूर आल्याने दर पाडावे लागले असे आपण नेहमी ऐकतो. मात्र, महाराष्ट्रात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. दुग्धविकास मंत्र्यांनीही महाराष्ट्रात ३० टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची दूध संकलन केंद्रांवर वजनकाट्यात लूटमार होते. दुधाचे दर फॅट व एसएनएफनुसार ठरतात. मात्र, या बाबी मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर तपासण्याची व्यवस्था राज्यात नाही. कंपन्या वाट्टेल तसे फेरफार करून वजनकाटे व मिल्कोमीटर वापरतात. दूध क्षेत्रातील संकट आवर्तने थांबविण्यासाठी ही लूटमार थांबविण्याची, दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची व यासाठी मूलभूत दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :milkदूध