शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 07:54 IST

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का?

डॉ. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव

दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी जिवाच्या आकांताने लढत आहेत. नियमितपणे चार-सहा महिन्यांनी दुधाचे दर पडतात. सरकार त्यावर किरकोळ डागडुजी करते. नंतर पुन्हा भाव कोसळतात. ही ‘संकट आवर्तने’ मूलभूत उपाय न केल्याने वारंवार येत राहतात.

‘किमान स्थिरता’ ही कोणत्याही क्षेत्राच्या प्रगतीची महत्त्वाची पूर्वअट असते. दूध क्षेत्रात अशी स्थिरता नाही. अशी किमान स्थिरता पाऊच पॅक दुधाबाबत निर्माण झाली आहे. मात्र, दूध पावडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित असल्याने त्या चढउतारानुसार दुधाचे खरेदीदर चढतात किंवा पडतात. शिवाय ‘फ्लश’ सीजनमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात दुधाचा पुरवठा वाढल्यामुळेही दुधाचे दर पडतात. महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात १ कोटी ३० लाख लिटर दूध संकलित होते. पैकी ९० लाख लिटर दूध पाऊच पॅकद्वारे घरगुती गरजेसाठी वापरले जाते. उरलेल्या किंवा सरप्लस ठरलेल्या ४० लाख लिटर दुधाची पावडर व बटर बनते. महाराष्ट्रात हे ‘रूपांतरित’ होणारे ४० लाख ‘सरप्लस’ दूधच भावातील चढ-उताराचे मुख्य कारण आहे. कारण, त्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर ठरतो.

दुधाला किमान किफायतशीर दर मिळावा ही मागणी आहे. राज्य सरकारने दूध संघ, दूध कंपन्या व सरकारी अधिकारी यांची समिती बनविली. दर तीन महिन्यांचे दूध खरेदी दर जाहीर करण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली. पशुखाद्याचे दर नियंत्रित करण्याची घोषणाही सरकारने केली. समितीने दुधाला ३४ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. सरकारने तसा आदेशही काढला. मात्र, आदेश लागू होताच दूध संघांनी दुधाच्या ‘रिव्हर्स रेट’चा सहारा घेत दर पाडले. नंतर तर आदेश झुगारून देत बेस रेटच ३४ वरून २७पर्यंत खाली आणला. खाद्याचे भाव कमी करा, असे सांगितल्याने नफ्याला चटावलेल्या कंपन्या पशुखाद्याचे भाव कमी करीत नसतात, असे आदेश पाळले जावेत यासाठी ‘कायदा व पर्यायी व्यवस्था’ सरकारकडे हवी. पण, सहकाराचे वाटोळे केल्यामुळे व सरकारी दूधखरेदी, प्रक्रिया व वितरणाची व्यवस्था संपविण्यात आल्यामुळे व ‘महानंद’सारख्या ब्रँडची वाट लावल्यामुळे अशी पुरेशी पर्यायी व्यवस्थाच सरकारकडे आज नाही.

राज्यातील २६ टक्के दूध संकलित करणाऱ्या सहकारी दूध संघांचे काही प्रमाणात ‘नियमन’ करण्याचे कायदेशीर अधिकार सहकार कायद्यांतर्गत सरकारकडे आहेत. मात्र, राज्यातील ७४ टक्के दुधाचे संकलन करणाऱ्या खासगी उद्योगातील नफेखोरीला लगाम लावणारी व्यवस्था सरकारकडे नाही.  वास्तविकत: खासगी दूध उद्योगालाही सरकारी अनुदाने व विकास योजनांचा लाभ झाला असल्याने सरकारी निर्बंध या उद्योगांवर लावणे योग्यच ठरणार आहे. साखर उद्योगाप्रमाणे सहकारी व खासगी दूध उद्योगाचे ‘नियमन’ करणारा कायदा करावा, ही शेतकरी संघर्ष समितीची मागणी आहे. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने साखरेचा एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगची तरतूद असणारा कायदा दुधाला लागू करता येणार नाही, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हे बरोबर नाही. कारण दूध पावडर हा टिकाऊ पदार्थ आहे. शिवाय पाऊच पॅकद्वारे विक्री होणाऱ्या ९० लाख लिटर दुधाची विक्री किंमत वर्षभर साधारणपणे स्थिर किंवा वाढती असते. पदार्थ नाशवंत असला तरी पदार्थाची विक्री किंमत स्थिर असल्याने अर्थशास्त्रीय परिभाषेत तरल दुधाचे नाशवंतत्व संपून जाते.

दुधाचा महापूर आल्याने दर पाडावे लागले असे आपण नेहमी ऐकतो. मात्र, महाराष्ट्रात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. दुग्धविकास मंत्र्यांनीही महाराष्ट्रात ३० टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची दूध संकलन केंद्रांवर वजनकाट्यात लूटमार होते. दुधाचे दर फॅट व एसएनएफनुसार ठरतात. मात्र, या बाबी मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर तपासण्याची व्यवस्था राज्यात नाही. कंपन्या वाट्टेल तसे फेरफार करून वजनकाटे व मिल्कोमीटर वापरतात. दूध क्षेत्रातील संकट आवर्तने थांबविण्यासाठी ही लूटमार थांबविण्याची, दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची व यासाठी मूलभूत दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :milkदूध