शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कायदे बदलता आहात, ते कशासाठी? कुणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 07:15 IST

वसाहतकाळातले गुन्हेगारी कायदे नवे करायचे, तर तपास अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करता येईल, अशी व्यवस्था आधी निर्माण करावी लागेल!

- कपिल सिबल

देशातील फौजदारी गुन्ह्यांचा न्याय करणारी व्यवस्था बदलण्याची इच्छा बाळगणे हे स्वागतार्ह पाऊल होय. परंतु सरकारने त्यासाठी अपारदर्शी आणि गुप्त  मार्ग  का निवडला हे मात्र कळत नाही. फौजदारी गुन्ह्यांच्या बाबतीत न्याय करणारी व्यवस्था बदलण्यासाठी केंद्राच्या गृह खात्याने मे २०२० मध्ये १५ सदस्यांची समिती नेमली. इंग्रजांच्या काळातील फौजदारी कायद्यांना देशी अंगरखा चढवण्याच्या दृष्टीने या समितीने या विषयातल्या विविध पैलूंचे तपशीलवार विश्लेषण केले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे असा काही प्रयत्न केला जात आहे हे भाजपव्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा जनतेला ठाऊकच नव्हते. या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या कायद्याच्या प्रांतातही याची गंधवार्ता नव्हती. त्यामुळे संबंधित समितीने काय शिफारशी केल्या, त्यातल्या कोणत्या सरकारने स्वीकारल्या याची कुणालाच कल्पना नाही.अशाप्रकारे गुपचूप विधेयक आणणे हा लोकशाही मूल्यांवर आघात  असून १४० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या या सरकारला हे मुळीच शोभत नाही. राजकीय सत्तेशी हातमिळवणी करण्याऐवजी स्वतंत्रपणे तपास करणारी व्यवस्था आधी निर्माण करून सरकारला फौजदारी कायद्यांमध्ये नवे करण्याची सुरुवात करता आली असती.  

लोकशाही कार्यकक्षेनुसार  एखाद्या व्यक्तीविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा असेल तरच ती व्यक्ती तिचे स्वातंत्र्य गमावून बसेल. संबंधिताला अटक केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने  २४ तासांच्या आत न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले पाहिजे. या प्रक्रियेला लागणारा वेळ या २४ तासात मोजू नये. संशयितांसाठी याच वेळी न्याय दंडाधिकारी यांच्याकडे पोलिस कोठडीची मागणी केली जाते. तांत्रिकदृष्ट्या दंडाधिकारी काही दिवसांसाठी  पोलिसांची मागणी मंजूर करतात. यामागची वसाहतकालीन ‘मानसिकता’ बदलायची, तर प्रक्रियेची सुरुवात बदलली पाहिजे. केवळ संशयावरून नव्हे तर संबंधित व्यक्ती दोषी असल्याचा प्रथमदर्शी पुरावा हाती आल्यानंतरच संबंधित व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार देणारी तरतूद सुधारित कायद्यात केली पाहिजे. पुरावा नाहीच, पण संशयही नसताना पोलिस अधिकारी आणि ठाणे अंमलदारसुद्धा अटक करतात, असे आपण आज अनुभवतो. हे तर वसाहतवादी मानसिकतेपेक्षाही भयंकर झाले. फौजदारी न्याय व्यवस्थेत हे अकल्पनीय आहे. न्याय व्यवस्थेवर नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. परंतु तेथेही अशाप्रकारे झालेल्या अटका वैध ठरवल्या जातात.

२०२३ ची भारतीय न्याय संहिता वसाहतकाळाच्या खुणा असलेल्या ‘‘अशा’’ गोष्टींकडे दुर्लक्ष करते. सरकारी नोकरांनी केलेल्या गुन्ह्यासंबंधी भारतीय न्याय संहितेत असलेली तरतूद अत्यंत प्रतिगामी आहे. या संहितेच्या कलम २५४ प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्याने जाणूनबुजून चुकीचा दस्तऐवज तयार केल्याने लोकहितास बाधा पोहोचली किंवा नुकसान झाले किंवा अशा दस्तऐवजामुळे एखादी मालमत्ता जप्त होण्यापासून वाचवली गेली तर त्या कर्मचाऱ्याला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. कलम २५५ तर यापेक्षाही भयंकर आहे. लोकसेवक म्हणून ते न्यायाधीशांना लागू आहे. त्यामुळे चालू खटल्याच्या कोणत्याही टप्प्यावर न्यायाधीशांनी जाणते अजाणतेपणाने दिलेला आदेश कायद्याला धरून नसेल तर न्यायाधीश महोदयांना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

न्यायाधीश देत असलेला निकाल कायद्याला धरून आहे असे मानून दिला जात असतो, अशी माझी धारणा आहे. यापुढे असा निकाल कायद्याला धरून आहे किंवा नाही हे नोकरशहा ठरवतील आणि न्यायाधीशांना भ्रष्ट जाहीर करतील, अशी शंका मला येते. असे होत असेल तर कोणता न्यायाधीश सरकारच्या विरोधात निकाल द्यायला धजावेल? कोणत्याही न्यायाधीशावर असा ठपका ठेवला जाणार असेल तर अगदी उच्च पातळीवरील न्याययंत्रणाही यापासून दूर राहील. ‘आमच्याबरोबर राहा’ असा संदेशच यातून न्याय व्यवस्थेला दिलेला दिसतो.एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने कुणाला बेकायदा पकडले तर त्यालाही शिक्षा होऊ शकते. सत्तारूढांच्या इच्छेप्रमाणे पोलिस वागतील असे यातून पाहिले गेलेले दिसते.. या तरतुदी अमलात आल्या तर आपली न्यायव्यवस्था राजकीय वर्गाची बटीक होऊन जाईल.

हे सरकार वसाहतकाळातील न्याय व्यवस्थेपासून सुटका करून  घेऊ पाहते, हा दावा सत्यापलापी असून देशाचा कायदा राबवण्याचे जरा जास्तच अधिकार पोलिसांना देणारा आहे. दंड संहितेमधून राजद्रोह वगळण्यात आला, असे गृहमंत्री म्हणत असले तरी हाच विषय नव्या अवतारात अधिक भयंकर स्वरूपात समोर येण्याची शक्यता आहे.भारत सरकारविरुद्ध द्रोहाची व्याख्या अधिक व्यापक केली जाण्याची शक्यता आहे. संहितेच्या १५० व्या कलमाने वाणी किंवा लिखित शब्दाने देशाच्या सार्वभौमत्वास ऐक्याला बाधा पोहोचेल, असे काही केल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास प्रतिबंध तसेच निदर्शनास मदत करणाऱ्यास या कायद्याने शिक्षा होऊ शकते. सध्याचे राज्यकर्ते आपण कायम सत्तेत राहणार आहोत असे गृहित धरणारी नवी जमात होय, असेच नवे कायदे सुचवतात. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा