शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Gujarat Assembly elections: गुजरातमध्ये भाजप नाही, ‘आप’च सत्तेवर येणार! CM पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 09:34 IST

गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निवडणूक रणनीतीविषयी इसुदान गढवी यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचित.

पत्रकारिता सोडून आपण राजकारणात कसे आणि का आलात?मी मुळात शेतकरी कुटुंबातला, देवी मातेला वाटले म्हणून पत्रकार झालो. जे वाईट आहे ते मी लोकांसमोर आणत होतो, पण गरजूंना मदत करू शकत नव्हतो. म्हणून देवी मातेच्या प्रेरणेनेच मी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.आम आदमी पक्षच का? काँग्रेस किंवा भाजप का नाही?या दोन पक्षांमुळेच तर गुजरातची आजची हलाखीची परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनामुळे लोक मरत असताना लक्ष देणारे कोणी नव्हते. संपूर्ण देशात जे गुजरात मॉडेल विकले जात आहे, त्याचे वास्तव गुजराती लोकांना ठाऊक आहे. बेरोजगारी वाढत आहे. काँग्रेसने तर भाजपपुढे गुडघेच टेकले आहेत. हळूहळू आम आदमी पक्षच देशातला मुख्य विरोधी पक्ष होत चालला आहे.

आपल्या पक्षाचे गुजरातमध्ये काय भविष्य दिसते? मागच्या निवडणुकीनंतर भाजप मोठ्या मुश्किलीने सरकार स्थापन करू शकले. काँग्रेसची इच्छा असती तर मागच्या वेळीच सरकार स्थापन झाले असते. पण आता काँग्रेस पक्ष इतका कमजोर झाला आहे की गेल्या वर्षी जिल्हा पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत ३१ पैकी एकही जागा या पक्षाला मिळविता आली नाही. आता हे दोन्ही पक्ष लोकप्रियतेपासून खूप लांब गेले असल्याने लोक आम आदमी पक्षाकडे आशेने पाहत आहेत. 

निवडणूक सर्वेक्षणांचे निकाल तसे सांगत नाहीत..मी स्वतः माध्यमांमध्ये होतो.. सर्वेक्षणे कशी केली जातात हे मला ठाऊक आहे. गुजरातच्या शहरी भागातील ६६ जागांपैकी किमान अर्ध्या जागांवर भाजप अडचणीत आहे. आम्हाला फक्त सुरतमधल्याच आठ किंवा नऊ जागा मिळतील. ग्रामीण भागातल्या २५ ते ३०  जागांवर भाजपला अतिशय कठीण लढत द्यावी लागत आहे. आत्ता लोक भाजपच्या भीतीने गप्प आहेत, पण मतदान करताना ते नक्कीच घाबरणार नाहीत.

आपले मुद्दे काय आहेत?  ‘महामंथन’ या नावाने चालणारा माझा एक तासाचा कार्यक्रम टीव्हीवर फार प्रसिद्ध होता. त्यात प्रत्येक गावातले प्रश्न मी मांडलेले आहेत. लोकांच्या प्रश्नांचे मला जेवढे आकलन आहे तेवढे गुजरातेत कोणाला असेल असे मला वाटत नाही. राज्यात ५० लाख बेकार युवक आहेत. ६७ लाख शेतकरी आहेत. सगळे हैराण आहेत. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे इथेही आम्हाला लोकांना मोफत वीज आणि पाणी द्यायचे आहे. राजकारणात आपल्याला अनुभव नाही, त्याचे काय?मी सोळा वर्षे राजकीय पत्रकारिता केली. अनेक राजकीय पक्ष धोरण ठरवण्यासाठी माझ्या संपर्कात असत. कोणते मुद्दे उपस्थित करावेत, निवडणूक कशी जिंकावी आणि सरकार कसे चालविले पाहिजे हे सगळे मी सांगत असे. तेव्हा या सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव माझ्याकडेच आहे.

गुजरातमध्ये यावेळी भाजप नव्हे तर मोदीजी निवडणूक लढत आहेत. आपण त्यांचा सामना कसा करणार?उलटे आहे, यावेळी मोदीजी नव्हे भाजप निवडणूक लढवत आहे. हळूहळू भाजपला हे समजून चुकले आहे की आपल्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. भ्रष्टाचार प्रशासनामध्ये खोलवर रुजला आहे. विषारी दारूने ७५ लोकांचा जीव जातो. कोणालाही शिक्षा होत नाही. पूल तुटून कित्येक लोक मरण पावतात, पण कोणालाही दोषी ठरवले जात नाही. जनता खूप शहाणी असते. गुजरातमध्ये लोकसभेसाठी मोदींना मते पडतील आणि विधानसभेसाठी ‘आप’ला !मागच्या निवडणुकीत अल्पेश ठाकूर,  हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण नेते काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपत आहेत. काँग्रेस भाजपची बी टीम झाली आहे, हेच तर मी म्हणतोय.­ मागच्या आठ वर्षांत काँग्रेसचे ६५ मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले. मागच्या पाच वर्षांत काँग्रेसचे १५ आमदार भाजपत गेले. आज काँग्रेसजवळ नेता नाही. कार्यकर्ते नाहीत आणि मुद्देही नाहीत. जर भाजप इतका बळकट आहे, तर पाच वर्षांत त्यांना तीन मुख्यमंत्री का बदलावे लागले? आपल्या एका उमेदवाराने अर्ज मागे का घेतला? दुसऱ्या पक्षाच्या लोकांना धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावणे हे भाजपनेच केले आहे.. एका जागेवर त्यांनी केले; परंतु उरलेल्या १८१ जागांवर काय करणार?

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Aam Admi partyआम आदमी पार्टीElectionनिवडणूक