शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गारठा

By admin | Published: January 16, 2017 12:09 AM

बापरे बाप! काय ही थंडी? गारठलो मी! असे उद्गार सध्या सर्वत्रच ऐकू येतात.

बापरे बाप! काय ही थंडी? गारठलो मी! असे उद्गार सध्या सर्वत्रच ऐकू येतात. मग कुणी स्वत: कडेकोट बंदोबस्तात राहून समोरच्याला प्रश्न करतात; बघा एवढ्याशा थंडीने गारठलात. ते आपले जवान बघा! केवढ्या थंडीत, बर्फात काम करतात ते ! याला उत्तर नाहीच! तिची ऊब अफाट ! आपले आजी-आजोबा गोधडीच वापरायचे. त्यांना कुठले ब्लँकेट आणि विंडचिटर? मुळात पूर्वीचे लोक चिटर कमी आणि भाबडे किंवा देवभोळे जास्त होते. त्यामुळे शेतावर काम करताना कुठली आली थंडी आणि गारठा ! गारठा तसा दोन प्रकारचा. एक निसर्गदत्त, तपमान उतरल्यानंतर जाणवणारा. तो आपण हवेवर, निसर्गावर सोपवला. दुसरा गारठा आपला, मानसिकतेचा ! एखादी बातमी ऐकून, घटना बघून, माणूस थंड पडतो. गोठून जातो. या अवस्था समाजातही कायम बघायला मिळतात. एकतर नुकतेच कॅशलेस, नोटाबंदीच्या सर्जिकल स्ट्राइकने देशातले एरवी एसीत राहून कारभार करणारे गारठून गेले, त्यांचे पैसे गोठले. आता हा गारठा नाही जाणवला. त्यातून थोडी ऊब निर्माण होते तर निवडणुका ! तिकिटासाठी धावाधाव, मारामार, कुरघोडी, कोलांटीउडी, नाही मी तर माझी बायको, मुलगा, मुलगी, भाऊ पण माझाच ! म्हणजे पद मला नसले तर माझ्या घरातच पाहिजे ! एवढे करून उमेदवारी पदरात पडली नाही तर संक्रांत कडू ! पतंग कटला, एकदम गारठणे सुरू ! ज्याला घाम गाळून उमेदवारी मिळाली त्याला गारठा नाही तर गारवा. बघा ना, गार शब्द एकच, पण त्याचा कधी गारठा होईल सांगता येत नाही. आपल्याला ‘वा’ची सवय त्यामुळे ठा नको. ध चा मा होतो हे ऐतिहासिक सत्य आहे. पण वा चा ठा झाला की दु:खच दु:ख. कुणीच आपल्याला विचारीत नाही. एरवी कोटीमध्ये लोळणारे कैदेत जातात. हा आर्थिक गारठा वाईटच. माणूस एका अक्षरात धुळीस मिळतो, तर असे गारठे खूप! आर्थिक, सामाजिक, बौद्धीक, राजकीय, कौटुंबिक अशा कितीतरी गारठ्यांमधून आपल्याला प्रवास करावा लागतो. सध्या महापालिका शेकोटी पेटवून बसलीय. तुम्ही जवळ गेलात तर चटका बसेल. दूर गेलात तर काकडून जाल. एकदा निकाल लागू द्या. काही गारठतील, काही शेकतील. बरं या नोटाबंदीमुळेही पैशांची ऊब किती देणार? ‘सेवक’ व्हायचंय ना? मग तीर्थाटनं घडवा, पर्यटन करा, साड्या-चोळ्या, भांडीकुंडी आता प्रेशरकुकर जुना झाला ओव्हन हवा, टीव्ही आहेच ! बोटांचा गारठा कमी करा ऊब वाढवा मग बटन दाबायलाही सोपं. नुस्तच गोडबोला म्हणू नका, जीव तीळ तीळ तुटतो हो ! चला केलेल्या कामांची यादी करा, पुस्तिका द्या ! अहो, निसर्गाचा गारठा काही दिवसांत कमी होईल. मग गरम होऊ लागेल. निसर्ग प्रेमळ आहे हो, गारठाही देतो त्याचा गारवाही करतो. पण सर्वसामान्य माणसाचे काय? त्याला किमान गरजा भागविण्याचा, त्याचे दैनंदिन जीवन सुखी समाधानी करण्याचा गारवा त्याला मिळाला तर इतरांचा गारठाही कमी होईल. नुस्त्या आश्वासनांच्या शेकोट्या पेटवू नका, त्या विझतील, कार्याची ऊब द्या ! आज माणसाला त्याची गरज आहे.-किशोर पाठक