शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
2
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
3
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
4
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
5
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
6
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
7
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
8
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
9
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
10
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
11
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
12
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
13
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
14
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
15
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
16
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
17
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
18
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
19
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
20
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'

आजचा अग्रलेख - रक्तरंजित प्रयागराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:51 AM

Atiq Ahmad News: बाहुबली कायदा हातात घेणार असतील तर 'मिट्टी में मिला देंगे,' असा दम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आणि उमेश पाल नावाचा वकील व त्याच्या दोन अंगरक्षकांच्या हत्येच्या तपासादरम्यान चौघे जण पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले गेले.

बाहुबली कायदा हातात घेणार असतील तर 'मिट्टी में मिला देंगे,' असा दम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आणि उमेश पाल नावाचा वकील व त्याच्या दोन अंगरक्षकांच्या हत्येच्या तपासादरम्यान चौघे जण पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले गेले. माजी आमदार, खासदार राहिलेला गैंगस्टर अतिक अहमद हा त्यांचा प्रमुख. तोदेखील भाऊ अशरफसह प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री इस्पितळाच्या आवारात पोलिस बंदोबस्तात वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर मारला गेला. आता हे राज्य बुलडोझर संस्कृतीच्याही पुढे गेले, असे म्हणावे लागेल. अर्थात, अतिक अहमद किंवा त्याचा भाऊ, मुलगा यांच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही. तलवारीच्या जिवावर जे राज्य करतात त्यांचा अंत तलवारीनेच होतो' या उक्तीनुसारच हे घडले आहे. पं. जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित, विश्वनाथ प्रताप सिंग अशा दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलेल्या फुलपूरमधून हा गैंगस्टर लोकसभेवर निवडून जाईल, याची त्या थोर मंडळींनी कल्पनाही केली नसेल. परंतु, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाने ते दिवसही दाखवले. शिवाय अतिक पाचवेळा आमदार, भाऊ अशरफ हादेखील एकदा आमदार हे राजकीय वैभव अलौकिक समाजसेवा करून त्यांनी नक्कीच मिळविले नव्हते.

उमर अली, असद, आझम, अबन ही अतिकची पाच मुले, पत्नी शाहिस्ता परवीन, बहीण आयेशा, भाऊ अशरफ या सगळ्यांना दहशतीमधून मिळालेल्या वर्चस्वाची नशा चढली होती.. अवघ्या १९ वर्षाच्या असदला इतका संताप कशाचा तर उमेश पाल हा यः कश्चित वकील आपल्या पित्याच्या साम्राज्याला आव्हान देतो, याचा! बसप आमदार राजू पाल हत्येचा उमेश पाल हा महत्त्वाचा साक्षीदार होता. म्हणून असदने साथीदारांसह भर बाजारात वकिलाची व त्याच्या दोन पोलिस अंगरक्षकांची २४ फेब्रुवारीला पिस्तुलाच्या गोळ्यांनी चाळण केली. त्यानंतर गेल्या ५२ दिवसांत असदसह चौघांचा पोलिसांशी कथित चकमकीत मृत्यू झाला. अतिक व अशरफ हे दोघेही काल मारले गेले. उत्तर प्रदेशात चाललेली ही खुनांची मालिका कधी थांबेल सांगता येत नाही. प्रश्न हा आहे की, शंभरावर गंभीर गुन्हे दाखल असलेला हा राक्षस मोठा कुणी केला? आता उत्तर प्रदेशातील कायदा, सुव्यवस्था कोलमडल्याचा गळा काढणारे, तिथे रामराज्य नव्हे तर जंगलराज आल्याचा आक्रोश करणारे त्यासाठी जबाबदार नाहीत का? मतदारांना भीती दाखवून तो निवडणूक जिंकू शकतो म्हणून उमेदवारी देणारे, त्याच्या पापावर लोकप्रतिनिधित्वाचे पांघरुण घालणारे आता कुठल्या तोंडाने बोलत आहेत? लोकलाजेस्तवच त्यानी अतिकला नंतर दूर केले, मग आता नक्राश्रू कशासाठी?

त्याचप्रमाणे अतिक अहमद साम्राज्य मोडीत निघाल्याने ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत, तेदेखील स्वत:ची फसवणूकच करत आहेत ज्या तीन- किशोरवयीन हल्लेखोरांनी अतिक व अशरफतर बेछूट गोळीबार केला त्यांचा अतिकच्या कार्याशी थेट संबंध होताच असे नाही. गुन्हेगारी जगात नाव होईल एवढा तिने तिघांनी गोळ्या झाडल्याचे पुढे येत आहे. कप्रकारे हा उन्मादातून दिला जाणारा न्याय आहे. त्यावर टाळ्या जविणारेही कमी नसतात. हैदराबादच्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी चकमकीत मारले किंवा भोपाळच्या तुरुंगातून कथितरित्या सुटलेल्या सिमीच्या सदस्यांना कंठस्नान घातले गेले तेव्हा ल-ताशे वाजवत मिठाई वाटणाऱ्या झुंडीला भान नसते की, मुंबईवरील हशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडला गेलेला अतिरेकी अजमल कसाबला न्यायालयात बचावाची पूर्ण संधी देणारा, त्याच्यावरील आरोपांवर सुनावणी घेऊन नंतर शिक्षा करणारा हा देश आहे.

स्पृहतेबद्दल आपल्या न्यायव्यवस्थेचा जगात आगळा लौकिक आहे. तो कक्षात न घेता धर्म व राजकारणासाठी अपराध्यांना मोकळे रान दिले जात असेल तर उद्भवणाऱ्या समस्या गंभीर व किचकट असतात. पोलिस तपास, यायालयात सुनावणी आरोपींना बचावाची संधी व त्यानंतर निकाल त्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागण्याची संधी अशा एका व्यवस्थेला गुंगारा दिल्याने न्यायव्यवस्थेला गालबोट लागते. अपराध्यांना न्याय ही बाब धार्मिक उन्माद व सुडाच्या राजकारणाचे बाहुले बनले की, मिट्टी में मिला देंगे' ही कर्तव्यकठोर प्रशासकाने कायदा मोडणाऱ्यांना दिलेली तंबी राहत नाही. हत्येच्या बदल्यात हत्या या मालिकेला कधी अंत उरत नाही. न्यायनिवाडा झुंडीच्या हाती गेला की, न्यायव्यवस्थेची मुलतत्त्वेही धुळीस मिळतात.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण