शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
3
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
4
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
5
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
6
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
7
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
8
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
9
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
10
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
11
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
12
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
13
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
14
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
15
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
16
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
17
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
18
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
19
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
20
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

आजचा अग्रलेख : अधिवेशनाच्या प्रथम दिवसें...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 6:58 AM

मंगळवारपासून आणीबाणीची पन्नाशी सुरू होत आहे.

अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनापुढे पत्रकारांना सांगितले की, आम्ही सर्वांना सोबत घेऊन सहमतीने निर्णय घेत, राज्यघटनेच्या सर्व संकेतांचे पालन करीत पुढे जाऊ इच्छितो. या वाक्याच्या पुढे काहीतरी पण, परंतु असावे हे नक्की. कारण, हे समंजसपणाचे शब्द वापरतानाच पंतप्रधानांनी मंगळवारच्या म्हणजे २५ जूनच्या दिनविशेषाचा उल्लेख काँग्रेसला टोला लगावण्यासाठी केला. मंगळवारपासून आणीबाणीची पन्नाशी सुरू होत आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. भारतीय लोकशाहीचा तो काळा दिवस होता आणि आजच्या सत्ताधाऱ्यांच्या पूर्वसुरींनी त्याविरोधात देशव्यापी विरोध करून तुरुंगवास भोगलेला असल्याने ही संधी पंतप्रधान सोडणार नव्हतेच, पंतप्रधानांच्या या टिप्प्णीचा राग काँग्रेस पक्षाला येणे स्वाभाविक आहे. त्यावरून मग टोले- प्रतिटोले सुरू झाले. एकीकडे पंतप्रधान राज्यघटनेतील संकेतांचे पालन करण्याची हमी देतात, तर त्यांना सतत राज्यघटनेचे स्मरण राहावे, यासाठी विरोधी पक्षांचे सगळे खासदार राज्यघटनेची छोटी लाल रंगाची प्रत घेऊन संसद परिसरात येतात. 

विशेषतः लोकसभेतील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे सर्व खासदार राज्यघटनेच्या प्रतींसह जुन्या संसद भवनात म्हणजे आताच्या संविधान सदनात एकत्र येतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व श्रीमती सोनिया गांधी त्यांच्या भेटीला जातात. लोकसभेत पंतप्रधान खासदारकीची शपथ घेत असताना राहुल गांधी, अखिलेश यादव यांसारखे प्रमुख विरोधी नेते ती प्रत मुद्दाम उंचावून धरतात. सोबतच, ज्या रामजन्मभूमी अयोध्येतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे, तेथील समाजवादी पार्टीचे खासदार अवधेश प्रसाद यांना राहुल व अखिलेश या दोघांच्या मध्ये स्थान दिले जाते. हे सगळे पाहता एकच प्रतिक्रिया मनात येते की, कुरघोडीचे अधिवेशन सुरू झाले. सत्ताधारी व विरोधक दोघेही पक्षीय व वैचारिक अभिनिवेश बाजूला ठेवून व्यापक देशहितासाठी सहमती व सौहार्द आणि एकमत अथवा चर्चेअंती बहुमताची भाषा वापरत असले तरी दोघांच्याही उक्ती व कृतीत एकवाक्यता कधीच नसते, असा अनुभव आहे. आताही एकीकडे पंतप्रधान व संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू सुसंवादाबद्दल बोलत असले तरी लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदावरून आधीच विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. 

आठवेळा निवडून आलेले काँग्रेसचे के. सुरेश यांच्याऐवजी सातवेळा खासदार बनलेले भर्तृहरी महताब यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये पहिली ठिणगी पडली. के. सुरेश सलग आठवेळा लोकसभेवर निवडून आलेले नाहीत आणि महताब मात्र सलग सातवेळा विजयी झाले, हे त्यांच्या निवडीचे कारण असले तरी त्यावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांशी चर्चा करायला हवी होती. याबाबत सत्ताधाऱ्यांनीच एक पाऊल पुढे टाकायला हवे होते. कारण, आता लोकसभेतील संख्याबळाचे संदर्भ बदलले आहेत. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले असले तरी त्यांच्या भारतीय जनता पक्षाकडे लोकसभेत स्पष्ट बहुमत नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांच्या साथीने त्यांनी बहुमताचा उंबरठा ओलांडला आहे. विरोधकांची ताकद वाढली आहे. 

सरकारची कोंडी करणारे मुद्दे नव्या लोकसभेच्या अगदी पहिल्या दिवशी विरोधकांच्या हातात आहेत. वैद्यक प्रवेशाच्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचा प्रकार, पदव्युत्तर प्रवेशाची नीट परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की, विद्यापीठ अनुदान आयोगाची झालेली नेट परीक्षा रद्द करण्याची घोषणा, आदींमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीची छीः थू, तिच्या महासंचालकांची उचलबांगडी, दार्जिलिंगजवळचा रेल्वे अपघात, काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ले असे अनेक मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जातील. त्या सर्व मुद्दधांवर मौन बाळगण्याचे, परंतु तामिळनाडूमधील विषारी दारूकांडातील पन्नासवर बळींविषयी आक्रोश करण्याचा प्रयत्न सत्ताधारी बाकांवरून होईल. अर्थातच, विरोधक दारुकांडावर बोलणार नाहीत. म्हणजेच, व्यापक लोकहिताचे मुद्दे देखील राजकीय सोयीनेच उचलले जातील आणि हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. अठराव्या लोकसभेचा कार्यकाळ सुरू होताना, देशात पुन्हा एकदा आघाड्यांचे राजकारण सुरू झाले असताना निवडणुकीत अत्यंत समतोल कौल देणाऱ्या देशवासीयांची अपेक्षा इतकीच आहे की, परस्पर संवादाची व सहमतीची केवळ भाषा राहू नये. निवडणुकीच्या प्रचारात दिसलेली परस्परांविषयी टोकाची कटुता आता तरी कमी व्हावी, जनहिताच्या मुद्द्यांवर पक्षीय राजकारणाचा, शह-काटशहाचा मोह टाळायला हवा. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस