शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आजचा अग्रलेख: कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्यापकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:46 IST

scholarship scam: दहा वर्षांपूर्वी घडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची आठवण एका नवीन घटनाक्रमाने आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या दोन-चार नव्हे तर अडीचशे अधिकाऱ्यांना या प्रकरणात समाज कल्याण आयुक्तांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

दहा वर्षांपूर्वी घडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची आठवण एका नवीन घटनाक्रमाने आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या दोन-चार नव्हे तर अडीचशे अधिकाऱ्यांना या प्रकरणात समाज कल्याण आयुक्तांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. डॉ. के. वेंकटेशम या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील आणि दोन आयएएस अधिकारी सदस्य असलेल्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) ५६३ पानांचा अहवाल देऊन या घोटाळ्यावर लख्ख प्रकाश टाकला होता आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटपाची काळी बाजू समोर आणली होती. ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि व्हीजेएनटी या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे हे प्रकरण होते. शिष्यवृत्तीची रक्कम त्यावेळी थेट शिक्षण संस्थांच्या बँक खात्यात जमा व्हायची. त्याचा फायदा घेत अनेक संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून मोठमोठ्या रकमा गिळंकृत केल्या. वर्षानुवर्षे हे गैरव्यवहार सुरू राहिले. अनेक शिक्षणसम्राट हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पुढारी, लोकप्रतिनिधी आहेत. राजकारणाशी संबंधित असलेल्या आणि नसलेल्या संस्था, आदिवासी विकास खाते, सामाजिक न्याय खात्यातील अधिकारी यांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांचे अनौरस अपत्य म्हणजे असे घोटाळे. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीतील या लुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत होते.

सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्यात उडी घेत राज्यातील जवळपास साडेतीन हजार शैक्षणिक संस्थांकडे शिष्यवृत्तीची बँक खाती आणि लाभार्थी विद्यार्थ्यांबाबतचा तपशील नोटिसीद्वारे मागितला होता. यातील निम्म्याहून अधिक संस्थांनी ईडीला कोणतीही माहिती पुरवली नाही. मात्र कोणत्याही शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली गेली नाही. ज्यांनी तपशील दिला तो सत्य होता की असत्य, याचीदेखील शहानिशा झाली नाही. फक्त नोटीस बजावण्यापुरती ईडीची भूमिका मर्यादित का राहिली, हा प्रश्नच आहे. त्या-त्या वेळी सत्तापक्षात असलेल्या वा सत्तापक्षाशी संबंधित शिक्षणसम्राटांनी चौकशी आणि कारवाईत अनेकदा अनेक प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. बरेच शिक्षणसम्राट त्यावेळी फारच हवालदिल झाले होते आणि ‘आपण कसे निष्कलंक आहोत’ हे सांगण्याची धडपड करत होते. मात्र एसआयटी चौकशीने त्यांचा बुरखा टराटरा फाडला. ‘शिक्षण संस्थांना शिष्यवृत्तीची १८८२ कोटी रुपयांची जादाची रक्कम अदा केली गेली; ती वसूल करावी’, अशी स्पष्ट शिफारस एसआयटीने केली. मात्र, आतापर्यंत त्यातील ११७ कोटी ८५ लाख रुपयेच विविध शिक्षण संस्थांकडून वसूल करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाने मात्र, एसआयटीने शिष्यवृत्तीबाबत केंद्र व राज्य सरकारचे वेळोवेळचे निर्णय आणि निकष यांची गल्लत केली, असा तर्क देत वसुलीयोग्य रक्कम १८८२ कोटी रुपये नव्हे, तर १७८ कोटी रुपयेच असल्याची भूमिका घेतली आणि आता उर्वरित ६० कोटींच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरू केली आहे.

एकदा एसआयटीने अहवाल दिल्यानंतर त्या आधारे कारवाई करण्याऐवजी त्याला फाटे फोडण्याचे काम झारीतील शुक्राचार्यांनी केले.  घोटाळे झालेच नाहीत, असे सरकारला वाटले असते तर कारवाईऐवजी सरकार स्वत:च न्यायालयात गेले असते, पण सरकारने वसुली करत घोटाळ्याची एकप्रकारे पुष्टीच केली. अनुसूचित जातींच्या मुलांना शिष्यवृत्ती दिलेल्या शिक्षण संस्थांपैकी केवळ १३ टक्के आणि अनुसूचित जमातींच्या मुलांना शिष्यवृत्ती दिलेल्या केवळ १५ टक्के शिक्षण संस्थांची कागदपत्रे तपासून एसआयटीने १८८२ कोटी रुपयांच्या वसुलीची शिफारस केलेली होती. १०० टक्के संस्थांची तपासणी केली असती तर राज्याला हादरवून टाकणारा घोटाळा समोर आला असता; पण तिथेही शिक्षणसम्राटांचा बचाव काही दृष्य-अदृष्य शक्तींनी केला. रकमेच्या वसुलीसोबतच शिष्यवृत्ती वाटपातील सर्व शिक्षणसंस्थांचे लेखापरीक्षण करा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आणि सीआयडीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करा, केवळ कागदोपत्री असलेल्या शिक्षण संस्थांवर गुन्हे दाखल करा, अशा शिफारशी एसआयटीने केलेल्या होत्या; पण त्यावर आजपर्यंत अंमल झाला नाही. ना कोणाला अटक झाली, ना कोणावर गुन्हा दाखल झाला. स्टुडंट्स हेल्पिंग हँड या एनजीओने शेवटी गेल्यावर्षी उच्च न्यायालयात धाव घेत या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी याचिका दाखल केली आहे. राजकारणी, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने झालेल्या या घोटाळ्यात व्यापक कारवाईचे सरकारी दरवाजे जवळपास बंद झाले असताना, आता न्यायालयाचा दरवाजा तेवढा शिल्लक आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMantralayaमंत्रालय