शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

देशाचे द्रोही व प्रेमी

By admin | Published: January 11, 2016 2:58 AM

भारत सरकारने अदनान सामी या पाकिस्तानी नागरिकास देशाचे नागरिकत्व बहाल केल्यानंतर लगेचच त्याला देशात कोठेही असहिष्णुता दिसली नाही,

भारत सरकारने अदनान सामी या पाकिस्तानी नागरिकास देशाचे नागरिकत्व बहाल केल्यानंतर लगेचच त्याला देशात कोठेही असहिष्णुता दिसली नाही, पण जन्माने भारतीय नागरिक असलेल्या आमीर खानला मात्र ती जाणवली, परिणामी आमीर खान देशद्रोही ठरत असेल तर सामी देशाचा परमप्रेमी देशभक्त ठरायला हरकत नाही. केन्द्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ या जाहिरात मोहिमेचा आमीर खान इतके दिवस प्रतिमादूत होता. त्याला आता तेथून हटविण्यात आले आहे. पण हटविले की त्याची मुदत संपली यावरून पर्यटन मंत्रालयात असलेला गोंधळ आधीच उघड झाला होता. हाच विषय संबंधित मंत्रालयाच्या संसदीय समितीत उपस्थित झाला तेव्हा आमीरच्या उच्चाटनाला इतके महत्त्व देण्याची गरज नाही कारण तो देशद्रोही आहे अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी उधळली. हे महोदय भोजपुरी सिनेमातले सुपरस्टार समजले जातात. म्हणजे त्यांचा आणि आमीरचा कुणबा एकच. एक बरे झाले, आमीरला जाणवलेल्या असहिष्णुतेचे प्रत्यक्ष दर्शन तिवारी यांनी घडविले. तिकडे तो वाद सुरू असताना इकडे मुंबईत आमीर आणि शाहरुख यांना मिळत असलेली मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यावरून माध्यमांंमधून मोठा गोंधळ सुरू आहे. या दोघांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात व्यक्त केलेली नापसंती सरकारला आवडली नाही म्हणून त्यांना ही शिक्षा असा माध्यमांचा सूर आहे. मुळात केवळ मुंबईतच नव्हे तर अन्यत्रही बड्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कामी येत असल्याने कायदा सुव्यवस्था अधिक धोक्यात येत चालली आहे व त्यामुळे ती कमी करावी अशी टीका माध्यमेच करीत असतात. त्यातून सिनेमा व्यवसायातील सर्व तारे-तारका त्यांच्या पदरी खासगी बाऊन्सर्सचा ताफा बाळगत असतात व त्यांच्या पुढ्यात आपले पोलीस बिचारे फारच किरकोळ भासत असतात. अशा स्थितीत केली सुरक्षा कमी तर त्यातून एवढा गहजब माजण्याचे किंवा माजवला जाण्याचे काही कारणच नाही.