शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जिल्हा नियोजन समितीत निधीवरून नेते हातघाईवर, संघर्ष विकासासाठी की टक्क्यांसाठी?

By नंदकिशोर पाटील | Updated: August 14, 2023 20:05 IST

जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकते माप देतात, हा आजवरचा अनुभव आहे.

जवळपास वर्षभरावर येऊन ठेपलेली लोकसभा आणि त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कमी अवधी शिल्लक असल्याने अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत विकास कामे उरकण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. पूर्णत्वास आलेल्या, प्रगतिपथावर असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या अशा सगळ्या प्रकल्पांचे, विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजनाचे कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू आहेत. या सगळ्या सभा-समारंभांना सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींची गर्दी जमवून पटावरील श्राद्ध उरकावे तसे कार्यक्रम पार पाडले जात आहेत. राज्यातील राजकीय सत्तांतरामुळे रखडलेल्या जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठका तर विलक्षण वादळी ठरत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते चक्क हमरीतुमरीवर आले. विकास निधी ही पालकमंत्र्यांची जहागिरी नाही, इथपासून ते थेट कोण-किती टक्केवारी घेतो, इथपर्यंत आरोप-प्रत्यारोप झाले! इतर जिल्ह्यातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. स्थानिक विकास निधीसाठी लोकप्रतिनिधींची चाललेली ही धडपड पाहू जाता या ‘कार्यसम्राटां’मुळे आपल्या गावचा, परिसराचा कायापालट होईल, अशी अपेक्षा कोणी बाळगली असेल तर ती भाबडी ठरण्याचीच शक्यता अधिक!

स्थानिक निधी म्हणजे काय रे भाऊ ?राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल-पगार, भत्ते आणि निवृती वेतन वजा जाता जो शिल्लक राहतो, त्याचे समन्यायी वाटप करण्याचे सूत्र ठरविण्यात आले आहे. याच सूत्रानुसार विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या राजकीय पक्षांच्या आधारे भेदभाव न करता महाराष्ट्र स्थानिक विकास (एमएलडी) निधीचे समान वाटप करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होत नाही. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकते माप देतात, हा आजवरचा अनुभव आहे. राज्यात गेल्या चार वर्षात तर दोनदा सत्तांतर झाले. २०१९ साली तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकार पायउतार होऊन महाविकास आघाडी सरकार आले. या सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीसवर आमदार सरकारमधून बाहेर पडले. भाजपने त्यांना सोबत घेऊन पुन्हा सत्ता हस्तगत केली. शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा तोच कित्ता गिरवला आणि आधीच्या सरकारने मंजूर केलेल्या स्थानिक विकास कामांना स्थगिती दिली! प्रकरण कोर्टात गेले. न्यायालयाने कान टोचल्यानंतर पूर्वीच्या मंजूर कामांवरील स्थगिती उठविण्यात आली.

हे तर गुत्तेदारांचे चांगभले !मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला निधी उपलब्ध केला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा, भाजी बाजाराची दुरुस्ती अशी कामे करता येतात. आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजुरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अमलात आणली जातात. ही कामे आमदारांनी स्वत: किंवा नातलग गुत्तेदारांच्या मार्फत करू नयेत. तसे आढळले तर संबंधित लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूूद आहे. मात्र काही अपवाद वगळता सर्रास या तरतुदीचा भंग होताना दिसतो.

कामांचे ऑडिट कोण करणार?आमदार फंड अथवा स्थानिक विकास निधीतून केलेल्या कामांचे ऑडिट होत नसल्याने या कामाचा दर्जा राखला जात नाही. आमदारांनी कामे सुचविल्याप्रमाणे नियोजन विभागाकडून ती मंजूर केली जातात. कामे कोणाला द्यायची हे आमदारच ठरवितात. यातूनच गैरव्यवहार होतात, अशा तक्रारी असतात. अनेकदा तर तीच ती कामे दाखवून निधी लाटला जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शाळांना पुस्तके वाटप करताना त्याच त्या शाळा आणि पुस्तकांची तीच ती यादी! असेही प्रकार घडले आहेत. कामाचा दर्जा आणि त्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ‘कॅग’सारख्या सक्षम स्वायत्त संस्थेकडून ऑडिट केले पाहिजे.

आमदार-खासदार फंडाचे काय?१९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव सरकारने खासदारांना मतदारसंघातील कामांसाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रात आमदार निधीची प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी १९८५च्या सुमारास स्थानिक निधी दिला जात असे. राज्यात विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ६६ (राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त) अशा ३५४ आमदारांना वार्षिक पाच कोटी रुपये मतदारसंघांतील कामांसाठी उपलब्ध होतात. ती रक्कम १७७० कोटी रुपये होते. तर लोकसभेचे ४८ आणि राज्यसभेचे १९ असे एकूण ६७ खासदार राज्यात आहेत. खासदार निधीचे ३३५ कोटी रुपये उपलब्ध होतात. परंतु काही खासदार वा आमदार हा निधी पुरेसा खर्च करीत नाहीत.

टॅग्स :fundsनिधीPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेSandipan Bhumreसंदीपान भुमरे