शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
3
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
4
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
5
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
6
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
7
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
8
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
9
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
10
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
11
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
12
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
14
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
15
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
16
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
17
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
18
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
19
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
20
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

कुरुप वास्तव

By admin | Published: January 19, 2017 11:55 PM

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात.

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. स्वातंत्र्य मिळून सत्तर तर देश प्रजासत्ताक होऊन जवळपास तेवढीच वर्षे झाली आहेत. नवे सहस्त्रक उदयाला आले, त्याचेही सतरावे वर्ष आता सुरू आहे. या कालखंडाने सर्वसामान्य माणसाला काय दिले, किंवा सर्वसामान्य माणसाने या कालखंडात काय मिळवले असा एक प्रश्न आहे.या प्रश्नाची अनेक उत्तरे येतील. नकारार्थी बोलायचे नाही अशी आपल्याला लहानपणापासून शिकवण असल्याने कोणकोणत्या क्षेत्रात आपण काय काय प्रगती केली याची एक यादी तयार करून आपण स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेऊ. त्यासाठीच अशा प्रसंगी सार्वजनिक समारंभ आयोजित करण्याची, तेथे भाषणे करण्याची व भाषणात स्वत:ची वारेमाप स्तुती करण्याची पद्धत आहे. पण जर थोडे खोलात जायचे ठरले, परिस्थितीचा कठोर आढावा घ्यायचे ठरले तर काय हाती लागेल?तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगण्याला गती आली, हे खरे असले तरी त्या गतीमुळे भोवंडून गेलेल्या माणसाची जगण्याची दिशा चुकली, त्याचे काय? विज्ञानाने माणसाचे जगणे सुसह्य केले हे खरे आहे, पण त्याने त्याला विलासी बनवले त्याचे काय? भौतिक साधनांचा प्रचंड विकास झाला हे खरे आहे, पण माणसाच्या आत्मिक प्रगतीचे काय? भौतिक प्रगतीला महत्व दिले पाहिजेच, पण आत्मिक प्रगतीचे मोल नाकारून चालणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली आहे तीत माणसाच्या शरीराबरोबरच त्याची मानसिक स्थिती, त्याची आध्यात्मिक जाण आणि त्याच्या सामाजिक स्थानाचाही विचार केला आहे. मग आपण दावा करत असलेल्या तथाकथित प्रगतीचा आनंद घेण्यासाठी माणूस जर सुदृढ मन:स्थितीत नसेल तर त्या प्रगतीला काय अर्थ आहे?जगणे सुंदर आहे असे अनेकजण सांगतात. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, त्याची प्रतिष्ठा वाढावी असे काही तरी काम आपण केले पाहिजे, असेही साऱ्यांना वाटते. पण मग हे सुंदर आणि संस्मरणीय जगणे प्रत्यक्षात आपण कुरूप आणि दु:खमय करण्याच्या मागे का लागलो आहोत? भौतिक प्रगतीच्या नावाने होत असलेला बाहेरील कचरा आणि जातपात, धर्म, वर्ण, पंथ, वंशाच्या नावाने मनात साचत असलेला कचरा, व त्याच्या ढिगाऱ्यात माणसाच्या जगण्यातले सौंदर्य हरवून गेले आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे? -प्रल्हाद जाधव