शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

अनियंत्रित दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:37 AM

लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते

लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते हे त्यानंतरच्या काळात खो-यात वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानातून दहशतवाद्यांची वाढती घुसखोरी, बुरहान वाणीसारखे स्थानिक दहशतवादी, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे तेथील सामान्यजन, हुरियतच्या काही फुटीरवाद्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या गुप्त कारवाया आणि या सर्वांवर नियंत्रण आणताना सुरक्षा दलाची होत असलेली दमछाक ही संपूर्ण परिस्थितीच अतिशय भयावह आणि राज्याला आणीबाणीच्या दिशेने नेणारी आहे. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला लक्ष्य करून हे हल्ले केले जात असून यामध्ये शहीद जवानांची वाढती संख्या हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. काश्मीर खोºयात गेल्यावर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये ६८ जवान शहीद झाले होते. यावर्षी पहिल्या तीन महिन्यातच ही संख्या १३ वर पोहोचली होती. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे पोलीस वसाहतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ताज्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार २०१६ साली १५ लष्करी तळ आणि आस्थापनांना दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य केले होते. मागील दोन वर्षात सीमेवर घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेत असताना जम्मू-काश्मिरातील जनजीवन सामान्य होऊ शकलेले नाही हे तेथील भाजपा-पीडीपी सरकारचे फार मोठे अपयश आणि त्यांना निवडून देणाºया लोकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. असे असले तरी लष्कराने मात्र राज्यातील दहशतवादावर नियंत्रणाचे आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. विशेषत: आॅपरेशन आॅल आऊट सुरू झाल्यापासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या मोहिमेअंतर्गत २५८ दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून गेल्या १३ महिन्यात विविध दहशतवादी संघटनांच्या ५ म्होरक्यांसह ११९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यशही मिळाले आहे. परंतु या संघर्षात आपल्या जवानांना आणखी किती वर्ष असे बलिदान द्यावे लागणार आहे? काश्मीरचा प्रश्न हा राजकीय असल्याचे वेळोवेळी सांगितले जाते. मग तो सोडविण्यासाठी नेमके आणि ठोस प्रयत्न का होत नाहीत? शासनाने यामागील वास्तव आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलायला हवीत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला