शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

अनाठायी उत्साह

By admin | Published: October 06, 2016 5:14 AM

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (व्यापारी बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर) कपात केली की सर्वसामान्य जनतेला गृह कर्जे, वाहन कर्जे आणि व्यक्तिगत कर्जे यावरील व्याजाच्या दरात सूट

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (व्यापारी बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर) कपात केली की सर्वसामान्य जनतेला गृह कर्जे, वाहन कर्जे आणि व्यक्तिगत कर्जे यावरील व्याजाच्या दरात सूट मिळणार किंवा ही कर्जे स्वस्त होणार असे नेहमीच सांगितले जाते आणि उत्साहाचे वातावरण पैदा केले जाते. पण प्रत्यक्षात तसे होतेच असे नाही. किंबहुना बहुतेक वेळा तसे होतच नाही. कारण व्यापारी बँकांना जी व्याज सवलत मिळते, ती ग्राहकांपर्यंत पोचती करण्याचा चांगुलपणा त्या दाखवतातच असे नाही. व्याज सवलत हवी असेल तर विशिष्ट तारखेपर्यंतचे सारे हप्ते अदा करा, सवलतीसाठी अर्ज करा व त्यानंतर विचार केला जाईल असे सांगितले जाते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी मंगळवारी जे द्विमासिक पतधोरण जाहीर केले, त्याद्वारे रेपो दरात जी कपात केली त्यामुळे निर्माण झालेला वा केला गेलेला उत्साह अनाठायीच ठरण्याची शक्यता आहे. बँकेने केलेली कपात जेमतेम पाव टक्का असली तरी बँका जी रक्कम रिझर्व्ह बँकेकडून उचलतात ती एव्हढी अवाढव्य असते की या पाव टक्क््यांनी पडणारा फरकदेखील लक्षणीय असतो. तरीही मंगळवारी जाहीर झालेले पतधोरण दोन कारणांमुळे महत्वाचे ठरते. उर्जित पटेल यांचे पूर्वसूरी रघुराम राजन व्याजदर कपात सातत्याने टाळीत आले. अर्थात पावसाने सलग दिलेला फटका व त्यापायी महागाईत होत गेलेली वाढ आणि अपेक्षेबरहुकुम चलन फुगवट्याला आळा घालण्यात सरकारला येत असलेले अपयश लक्षात घेऊनच त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांचा व्याजदर कपातीचा आग्रह त्यांनी निकराने मोडून काढल्याने राजन यांनी सरकारची नाराजीही ओढवून घेतली होती. कदाचित त्यामुळेच त्यांना सरकारने दोन वर्षांची मुदतवाढदेखील नाकारली. जोवर राजन गव्हर्नर पदावर होते, तोपर्यंत पतधोरण निश्चित करण्याचे काम गव्हर्नर एकटाच करीत असे. आता त्यात बदल करण्यात आला असून ते यावेळच्या पतधोरण निश्चितीचे दुसरे वैशिष्ट्य. या कामासाठी आता एक सहा सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. त्यातील गव्हर्नर धरुन तिघे बँकेचे तर बाकीचे तिघे बाहेरचे पण अर्थशास्त्रातील तज्ज्ञ अशी नवी रचना आहे. या सहा जाणांच्या समितीने विचार विनिमय करायचा आणि बहुमत जो निर्णय घेईल तो जाहीर करायचा. त्यानुसार यंदा दीड दिवस समितीने चर्चा केली आणि व्याजदर कपातीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यंदा पावसाने केलेली मेहरबानी लक्षात घेता शेतीचा हंगाम चांगला राहण्याची अपेक्षा असल्याने व चलनवाढ रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जाणार असल्याने समितीत एकमत झाले असावे असा तज्ज्ञांचा होरा आहे.