शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

अनुपम्य सुखसोहळा

By admin | Published: June 15, 2017 4:24 AM

पालखी सोहळा उद्यापासून देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा भरणार असून, भक्तीचा मळा फुलणार आहे.

- विजय बाविस्करपालखी सोहळा उद्यापासून देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा भरणार असून, भक्तीचा मळा फुलणार आहे. दरवर्षी पावसाबरोबरच मराठी मनाला वेध लागतात ते वारीचे. ग्यानबा-तुकोबांच्या गजरात चालणाऱ्या या वारीने भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली आहे. संत ज्ञानेश्वर-तुकारामांसह अनेक संतांनी भागवतधर्माचा प्रचार आणि प्रसार केला. संत नामदेवांनी तर पंजाबपर्यंत जाऊन ही पताका रोवली. वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. ही वारीपरंपरा आपल्या सर्व संतांनी तब्बल सात शतकांपासून जतन केली आहे. तिची धुरा आता सामान्य वारकऱ्यांनी खांद्यावर घेतली आहे. इतकी वर्षे अखंडपणे चालणारी वारी हा एक चमत्कारच आहे. ही सामाजिक अभिसरणाची श्रेष्ठ प्रक्रिया आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ओढीने चालणाऱ्या आषाढी एकादशीच्या या वारीत विठ्ठलनामाचा गजर असतो, भक्तिरसाचा अलौकिक बहर असतो. या भावगंगेत संतांनी लिहिलेले अभंग जसे असतात तसे लोकसहभागातून जन्माला आलेली कवने, ओव्याही असतात. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदायाच्या भक्तगणांसाठी आषाढीची वारी म्हणजे विठ्ठलभक्तीचा परमोच्च बिंंदू असतो. लाखो वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरीकडे धाव घेतात. खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात वैष्णवांची पाउले पडू लागतात. भागवतधर्माच्या एकात्मतेची पताका खांद्यावर मिरवली जाते. सदाचाराचा संगम होतो. भक्तीची पेठ उभी राहते आणि पंढरीच्या वाळवंटात एकचि टाळी होते. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा, संत तुकोबारायाच्या भक्तिभावाचा, नामदेवरायांच्या आर्ततेचा, एकनाथ, जनाबाई, निळोबा, चोखोबा, सावतामाळी, बहिणाई, कान्होपात्रा, सेना, नरहरी आदी संतांचा आत्मानुभव अभिव्यक्त होतो. वारी हा एक उत्कट अनुभव आहे. वारीत नुसते चालायचे नाही तर नामसाधना आहे, अभ्यास आहे, संवाद आहे, सत्संग आहे. या सगळ्यांची मिळून वारी होते. वारीने समाज एकसंध केला, जगण्याला आत्मबळ दिले. या नव्या सामर्थ्यातून महाराष्ट्र घडला. अठरापगड जातीतील संत भागवतधर्माच्या पताकेखाली एकत्र आले आणि ‘स्व’ला विसरून हरिनामाचा गजर करू लागले. हा वैष्णवांचा मेळा आहे. तो जातीकुलादिकांच्या वृथा अभिमानापलीकडे गेलेला आहे. या साऱ्यांना परमात्म्याची ओढ असते. त्यापुढे त्यांना इतर कसलीही आठवण नसते. परमानंद द्यावा आणि घ्यावा असा त्यांचा शुद्ध भाव असतो. विठ्ठलभक्ती या एकाच श्वासात प्रत्येकजण रंगलेला असतो. संतांनी दिलेले हे विचारबीज वारकऱ्यांच्या मनात रुजलेले आहे. श्रेष्ठता जातीवर नसून प्रामाणिक कर्मभक्तीत आहे, हे संतांनी पटवून दिले. समाजाला डोळस बनविले. कीर्तन-प्रवचनांतून लोकमनात रुजवले. ज्या गावाला जायचे तो परमात्मा आनंदस्वरूप आहे. ज्या वाटेने जायचे आहे त्या वाटेवरही आनंदच पेरलेला आहे. म्हणूनच पंढरीच्या वारीला आनंदसोहळा मानले जाते. त्या वाटेने चालणारा प्रत्येक वारकरी जणू आनंदाची ओवी असतो.‘आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे॥ असे म्हणणारे तुकोबाराय याला अनुपम्य सुखसोहळा मानतात तर ज्ञानोबा माउली भक्तिवैराग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांगयोगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना अमृततत्त्वाचा स्पर्र्श घडवून जातात. असा हा पालखी सोहळा १६ व १७ जूनला देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा पुन्हा एकदा जमणार आहे. त्यांच्याविषयी तुकोबाराय म्हणतात, गोपीचंदन उटी तुळशीच्यामाळा, हार मिरविती गळा। टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे।।नामाचा गजर करीत जेव्हा वारकरी रस्त्यावरून चालतो तेव्हा प्रसन्नता, सात्त्विकता, भक्तिरसाचा तो मूर्तिमंत आदर्श असतो. वारी आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे. शतकानुशतके चालत आलेली वारी आजच्या पिढीसाठीही कुतूहलाचा विषय आहे. वारीतून मिळणारी आत्मिक ऊर्जा काय असते हे अनुभवावेसे वाटते. त्यामुळे तरुणाईही उत्स्फूर्तपणे वारीशी जोडली जात आहे. दरवर्षी ‘पाउले चालती पंढरीची वाट’ म्हणत टाळ, मृदुंग, दिंड्या, पताका यांच्या सहवासात वारकरी भक्तिरसानंदात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे. आपणही होऊयात !