शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

असंवेदनशीलतेचे बळी; स्वराज्य मिळाले तरी सुराज्यापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 7:47 AM

भारताचा स्वातंत्र्य दिन आज देशभर दिमाखात साजरा केला जाईल. देश स्वतंत्र होऊन सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही मुंबई ...

भारताचा स्वातंत्र्य दिन आज देशभर दिमाखात साजरा केला जाईल. देश स्वतंत्र होऊन सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला खेटून असलेल्या ठाणे शहराच्या कळव्यातील महापालिका रुग्णालयात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत १८ गोरगरीब रुग्णांचे किरकोळ आजारांमुळे मृत्यू झाले, यामुळे खरेतर आपली मान शरमेने खाली जायला हवी. आपल्याला स्वराज्य मिळाले; पण, सुराज्यापासून आपण अजून कोसो दूर आहोत, हेच जळजळीत वास्तव आहे. आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज आहे. परंतु, तीही पूर्ण होत नसेल आणि फोर्ब्सच्या यादीत किती भारतीय अब्जाधीशांचा समावेश झाला याकरिता जर आपण आपली पाठ थोपटून घेत असलो तर आपण आत्मवंचना करून घेत आहोत. 

ब्रिटिश सत्ताधारी जुलमी होते. त्यांनी भारतीयांचा छळ केला. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या आरोग्याकरिता जे. जे. हॉस्पिटल अथवा केईएम हॉस्पिटल अशी आरोग्य सेवा मुंबईत उभारून स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या भारतीयांच्या अनेक पिढ्यांवर उपकार केले. स्वतंत्र भारतामधील आपल्या सरकारांनी उभ्या केलेल्या इस्पितळांची काही ठिकाणची अवस्था ही छळछावण्यांपेक्षा वेगळी नाही. अनेक इस्पितळांत जाणाऱ्या रुग्णांची पावले दिसतात, परतीची पावले दिसत नाहीत, असे उघडपणे बोलले जाते. ठाण्यातील सरकारी इस्पितळाची नव्याने उभारणी सुरू असून, सध्या हे हॉस्पिटल मनोरुग्णालयाच्या इमारतीत हलवले आहे. मध्यवर्ती भागातील ते इस्पितळ उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्णांनी कळव्यातील महापालिका रुग्णालयाचा पर्याय निवडल्याने या रुग्णालयावर प्रचंड ताण आल्याचा दावा महापालिका करीत आहे. 

परिणामी, आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने मृत्यू झाले, असा बचाव केला जात आहे. ठाण्यासारख्या २८ ते ३० लाख लोकवस्तीच्या शहरातील सरकारी इस्पितळ अन्यत्र हलविल्यामुळे नेमकी कोणती परिस्थिती उद्भवू शकते, याचे आकलन जर सरकार व महापालिकेतील अधिकाऱ्यांना होत नसेल तर त्यांनी लागलीच पदांचे राजीनामे देऊन आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारायला हवी. ठाणे शहरातील इस्पितळांत केवळ याच परिसरातील नव्हे, तर अगदी शेजारील आदिवासीबहुल पालघर, शहापूर येथून किंवा नाशिक, रायगड जिल्ह्यातून रुग्ण येतात. ठाण्यातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने या मृत्यूच्या तांडवाचे राजकारण होणे स्वाभाविक आहे. अर्थात अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे हा जरी दोष असला तरी ठाणे शहरातील सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या यंत्रणेने आरोग्याच्या मूलभूत सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष कसे केले, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. 

१९४३ साली आरोग्य व्यवस्थेबाबत नियुक्त केलेल्या जोसेफ विल्यम भोर समितीने केलेल्या शिफारशी १९५२ साली सरकारने स्वीकारल्या. भोर समितीनुसार, ४० हजार लोकसंख्येकरिता एक प्राथमिक आरोग्य केंद्र हवे. त्यामध्ये दोन डॉक्टर, एक नर्स, चार आया, दोन आरोग्य सहायक, दोन सॅनिटरी इन्स्पेक्टर एवढा कर्मचारी वर्ग हवा, असे म्हटले होते. भोर समितीच्या शिफारशींना ८० वर्षे उलटली. आता एका आरोग्य केंद्रात वरील कर्मचारी वर्गाच्या किमान चौपट कर्मचारी वर्ग असायला हवा. २० हजार लोकसंख्येकरिता ७५ खाटांचे इस्पितळ हवे तर सर्व जिल्हा रुग्णालये २५०० खाटांची हवीत, असे भोर समितीने त्यावेळी म्हटले होते. राज्यातील किती जिल्ह्यांत भोर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली आहे, असा प्रश्न केला तरी आपले आपल्यालाच उत्तर मिळेल. कोरोनाने आरोग्य सेवेचे महत्त्व आपल्याला पटवून दिले. 

आपली आरोग्य व्यवस्था किती तोकडी आहे हे त्यावेळीही मृत्यूच्या घनघोर तांडवाने आपल्याला कळून चुकले. परंतु भारतीय राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेलाच अल्झायमर झाला असल्याने कोरोनाचे साथ संकट टळल्यावर आपल्याला सोयीस्कर विसर पडला. अनेक ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली. पावसाळ्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्यावर पुन्हा आरोग्य व्यवस्थेमधील उणिवा जाणवू लागल्या. कोरोनानंतरही आपण आरोग्यावर जीडीपीच्या केवळ २.१ टक्के रक्कम खर्च करीत आहोत. प्रत्यक्षात ती किमान सहा ते आठ टक्के असायला हवी. पण, तसे होत नाही आणि सरकारी यंत्रणेची अनास्था गोरगरिबांचे बळी घेतच राहते. ठाण्यात झाले, ते त्याहून वेगळे नाही, आपल्या अदूरदर्शी, असंवेदनशील, अमानुष राजकीय व्यवस्थेनेच हे बळी घेतले, हे नाकारता येणार नाही.

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल