शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदर्भवाद्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:00 IST

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते.

राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकºयांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे अखेर ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आज सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून विदर्भाच्या वाट्याला उपेक्षितांचे जिणे आले आहे, अशी सबळ कारणे देऊन विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाचा लढा अखंड सुरू ठेवला आहे. परंतु काँग्रेस असो वा भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भाचा केवळ निवडणुकीपुरता उपयोग करून नंतर यापासून फारकत घेत असल्याने व सातत्याने प्रयत्न करूनही स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला स्थानिकांचा जनाधार लाभत नसल्याने स्वतंत्र विदर्भाचे समर्थक थोडे निराश झाले आहेत. परवा नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांनी ही निराशा थेट मंचावरून अनुभवली. विशेष म्हणजे, ज्यांच्या बोलण्यातून ही निराशा व्यक्त झाली ती काही साधी नावे नव्हती. यातले एक नाव अ‍ॅड. श्रीहरी अणे तर दुसरे नाव अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे होते. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव आला नाही तर पुढे तो येणे शक्य नाही, असे विधान अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. ज्या भाजपाने एकेकाळी स्वतंत्र विदर्भासाठी रान उठवले होते ती भाजपा आता मात्र कशी मूग गिळून बसलीय याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यातला टीकेचा भाग सोडला तर पुढे काय याचे उत्तर अणे आपल्या भाषणातून देऊ शकले नाहीत. स्वतंत्र विदर्भासाठी लढणाºया संघटनांनी आता राजकीय व्हावे व त्यांचे नेतृत्व कल्पनेतल्या संयुक्त रिपब्लिकन पक्षाने करावे, इतका एक सोयीचा संदेश देऊन त्यांनी आपले भाषण आटोपले. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर तर अणेंपेक्षाही जास्त निराश दिसले. वेगळा विदर्भ कसा फायद्याचा आहे, या विषयावर मी लेख लिहिणेच बंद करून टाकले आहे. कारण, वेगळा विदर्भ येथील जनतेलाच हवा की नको याबाबत मी साशंक आहे, अशा शब्दात त्यांनी आपली निराशा जाहीर केली आणि पुढचे सर्व भाषण मुंबईच्या इन्फास्ट्रक्चरला समर्पित करून टाकले. विदर्भवाद्यांची ही निराशा फारच बोलकी आहे. त्यामुळे या नेत्यांकडे नेतृत्वाच्यादृष्टीने आशाळभूत नजरेने पाहणाºया वैदर्भीयांना विदर्भ वेगळा हवा या जुन्या मागणीसाठी नव्याने चैतन्य निर्माण करण्याकरिता पुन्हा नवा पर्याय शोधावा लागेल, असेच चित्र दिसत आहे.

टॅग्स :newsबातम्या