शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

दृष्टिकोन- महाराजा सयाजीराव गायकवाड : एक चौमुखी दातृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 04:38 IST

धारा भांड मालुंजकर । साहित्यिका नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कवळाणा गावातील गोपाळ काशिराव गायकवाड एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. बडोद्याच्या राजघराण्यात ...

धारा भांड मालुंजकर । साहित्यिकानाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कवळाणा गावातील गोपाळ काशिराव गायकवाड एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक घेतला जातो. अक्षर ओळख नसलेला कवळाण्याचा बारा वर्षांचा गोपाळ दैवयोगाने बडोद्याचा राजा बनतो. गोपाळचा दत्तकविधी होऊन ‘सयाजीराव तिसरे’ असे नामकरण होते. आपल्या अथांग महान कार्यांनी, दूरदृष्टीने महाराजा सयाजीराव गायकवाडांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.

११ मार्च, १८६३ हा महाराजांचा जन्मदिवस. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र गुण्यागोविंदाने नांदणे ही गोष्ट महाराजा सयाजीराव गायकवाड या विद्याव्यासंगी राजांच्या बाबतीत घडली. वयाच्या बाराव्या वर्षी महाराजांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. शिक्षणामुळे परकाया प्रवेश होतो याचा अनुभव घेत, शिक्षणाचे महत्त्व जाणत महाराज मोठे झाले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना खूप लहान वयातच कळून चुकले होते. याच तळमळीतून महाराजांनी बडोदा संस्थानात केलेल्या सुधारणांमुळे संस्थान नावारूपास आले. या सुधारणांबरोबर संस्थानाबाहेरच्याही लोकांच्या उत्कर्षासाठी प्रचंड आर्थिक मदत केली. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महाराजांचे योगदान अद्वैत आहे.

सयाजीराव प्रज्ञावंत, विचारवंत आणि सुशासक होते. दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद शिकागो, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संमेलनांचे ते अध्यक्ष होते. शिकागो अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, ‘धर्म हे मानवी जीवनाचे एक अंग आहे. ते निर्दोष आणि सत्यमय असावे.’ ईश्वराची नेमकी व्याख्या काय करावी, परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान काय, याविषयी शिकागो धर्म परिषदेतील त्यांचे चिंतन आजची गरज आहे. धर्मसंस्था व राजसत्ता यातील भेदरेषा ओळखून सयाजीरावांनी विवेकाने बडोद्यात धर्मखाते सुरू केले. यातून धर्ममूल्ये व नागरी मूल्यांची सांगड घातली.

ज्ञानासारखे पवित्र शक्तिमान दुसरे काही नाही. राजाचा मोक्ष जनकल्याणात असतो, तसेच धर्माने गरिबांचा कैवारी बनावे. हेच परिवर्तनशील जगात धर्माचे स्थान आहे. हे सयाजीरावांचे धर्मविचार. त्यांना उत्तम माणसांची पारख होती. यामुळे देशभरातील उत्तमप्रशासक, शिक्षण तज्ज्ञ, कलावंत, साहित्यिक, शिल्पकार, गायक, नाटककार, भाषातज्ज्ञ, क्रांतिकारक बडोद्यात जमा झाले होते. यातून बालगंधर्व, चिंतामणराव वैद्य, कांटावाला, पितामह दादाभाई नैरोजी, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे, कवी चंद्रशेखर यांना वर्षासन अर्थात पेन्शन स्वरूपात मदत करण्याचे कामही सयाजीरावांनी दूरदृष्टी ठेवून केले.

महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लाला लजपतराय, श्यामजी कृष्ण वर्मा, जमशेटजी टाटा, राजा रवि वर्मा, कर्मवीर भाऊराव, अब्दुल करीम खाँ, पं. मालवीय, न्यायमूर्ती रानडे, पंडित शिवकर तळपदे, योगी अरविंद घोष, बॅ. केशवराव देशपांडे, खासेराव जाधव, शिल्पकार कोल्हटकर या व अनेक युगपुरुष आणि क्रांतिकारकांना मदत करणाºया सयाजीरावांचा हा वैचारिक अनमोल वारसा आजच्या वातावरणात सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देणारा आहे.शिक्षण ही काळाची गरज ओळखून महाराजांनी बडोद्यात राज्यकारभाराच्या पूर्वकाळातच बडोदा संस्थानातील सर्वात दुर्लक्षित आणि शिक्षणापासून कोसो दूर असणाºया समाजातील घटकांना मोफत शिक्षणाची सोय केली. ज्या काळात सरकारी खर्चाने शिक्षण देण्याची हिंदुस्थानात नव्हे, तर जगात सोय नव्हती, त्या काळात महाराजांनी सोनगड भागातील अस्पृश्य आणि आदिवासींच्या मुलांसाठी सर्वप्रथम मोफत शिक्षणाची सोय केली. त्यानंतर, त्यांनी इ.स. १८९२ साली अमरेली प्रांतात सक्तीचे आणि मोफत शिक्षण सुरू केले, तर पूर्ण संस्थानात त्यांनी इ.स.१९0६ला सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.

महाराज फक्त आर्थिक मदत करत नव्हते, तर स्वत: प्रगल्भ विचारांचे, दूरदृष्टी असणारे असल्याने संभाव्य धोक्याची आणि समस्यांची त्यांना कल्पना येत असे. त्यावर समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तींना तर मदत केलीच, त्याचबरोबर जे नातेवाईक परदेशात शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी पाठवले होते, त्यांनाही पत्रांतून वडिलकीच्या नात्याने शिक्षणातील राजमार्ग दाखविला. म्हणूनच लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ‘बडोदे हे भारतातील महान व्यक्ती तयार करण्याचे ट्रेनिंग स्कूल व भावी स्वतंत्र भारताची प्रयोगशाळाच आहे. स्वतंत्र भारताची शासनव्यवस्था कशी असावी, याचे प्रयोग सयाजीराव महाराज करत आहेत.’ यामुळे ते आधुनिक भारताचे युगदृष्टे शिल्पकार ठरतात.