शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात अनिल विज, विनेश फोगट पिछाडीवर; हुड्डा आघाडीवर
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक
4
वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले
5
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
6
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
7
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
8
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
9
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
10
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
11
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
12
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
13
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
14
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
15
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
16
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
17
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
18
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
19
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
20
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

धर्म नष्ट झाल्याशिवाय हिंसा थांबणार नाही

By admin | Published: September 06, 2015 4:39 AM

‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देताना त्याचा जीवच घेण्याची ही अजब तऱ्हा एकूणच वैचारिक प्रगतीला किती मोठ्या प्रमाणात खीळ घालते आहे याचे भान आज कुणालाही नाही. त्यामुळे आता माणसांना

- राजन खान‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देताना त्याचा जीवच घेण्याची ही अजब तऱ्हा एकूणच वैचारिक प्रगतीला किती मोठ्या प्रमाणात खीळ घालते आहे याचे भान आज कुणालाही नाही. त्यामुळे आता माणसांना जगायला धर्माची आवश्यकता राहिलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्माच्या जिवावर जगणारे जे कोणी फुकटे आहेत, ज्यांना स्वत:च्या कष्टावर जगायची इच्छा नाही अशाच लोकांनी धर्म नावाची गोष्ट लावून धरली आहे. तर या सगळ्या फुकट्या धर्ममार्तंडांना सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळी कामात जुंपले पाहिजे; आणि लोकांनो, तुमच्या घामावर तुम्ही जगा, असे सांगितले पाहिजे. तेव्हाच या जगातून धर्मांचा नायनाट होईल आणि जग हिंसामुक्त होईल.विचारांच्या विरोधात शस्त्र वापरण्याची परंपरा मानवी समाजाला नवी नाही. समाज आपल्या ताब्यात राहिला पाहिजे असे वाटणाऱ्या लोकांना केवळ हिंसेचा वापर करणेच माहीत असते. ज्यांच्यामुळे समाज कणाकणाने पुढे जाण्याची शक्यता असते, त्यांना अशा रीतीने मृत्यूला सामोरे जावे लागणे हा किती पराकोटीचा पराभव आहे, अशी आजची स्थिती आहे. आता आपण आधुनिक समाजात जगतो आहोत. जो समाज विज्ञानाधिष्ठित आहे. यात विचार मारणे ही विकृती आहे. आणि भारतासारख्या देशात विचार स्वातंत्र्याची तरतूद करूनसुद्धा अशी कृत्ये घडतात, हे अपमानास्पद आहे. घटनाकारांनी जात, धर्म आणि श्रद्धा स्वातंत्र्याचा समावेश घटनेत केला आहे. हे त्यांचे उदात्त उपकार आहेत, असे आपल्याला म्हणायला हरकत नाही. हे उदात्त विचार समजण्याच्या लायकीचा समाज आहे, असे मला वाटत नाही. हे उपकार कसे वापरायचे याची धड अक्कलही आपल्या समाजाला नाही. किंबहुना, या उपकारांचा गैरवापर करणे आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक करणे अशी परिस्थिती सध्या समाजात आहे. समाजाला घटनेचे सोयर - सुतक वाटत नाही. आपल्याकडे असणारी घटना दुरुस्तीची तरतूद वापरून त्यातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे तत्त्व कायम ठेवून बाकी धर्म, जात आणि श्रद्धा स्वातंत्र्य काढून घेण्याची वेळ आली आहे.समाजात, शांततेसाठी धर्माची स्थापना झाली आहे, असे म्हटले जाते. मात्र हे लोक दुसऱ्यांच्या विचारांचा नायनाट करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. ज्या दिवशी ही धर्म नावाची काल्पनिक आणि थोतांड गोष्ट नष्ट होईल त्याचवेळी या जगातील विकृत हिंसा थांबेल. पुढील काळ भयावह...हे वातावरण अधिकाधिक तीव्र होणे काठी मूठभरांना आवश्यक वाटते. तरीही बहुसंख्येने त्याविरोधात असलेले सगळे जण गप्प बसणार असतील तर यापुढील काळ किती भयावह असेल, याची कल्पना येऊ शकते.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)- शब्दांकन : स्नेहा मोरे