शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस; BCCI देणार 125 कोटी रुपये, जय शाहंची घोषणा...
2
"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला
3
लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु
4
माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष
5
वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान
6
Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन
7
रोहित-विराटच्या वाटेवर...'सर' रवींद्र जडेजाने T-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
8
IND vs SA: रोहित शर्मानं का खाल्लं मैदानावरचं गवत? झाला खुलासा! 13 वर्षांपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूनंही असंच केलं होतं
9
५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा
10
राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी; सुजाता सौनिक यांची नियुक्ती, आणखी एक विक्रम...
11
मुकेश अंबानींपेक्षाही मोठं घर, ₹20000 कोटींची संपत्ती; या माजी क्रिकेटरचा 'थाट' अन् 'रईसी'समोर धोनी-कोहलीही फेल!
12
भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा
13
केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन; भाविकांच्या हृदयाचा ठोका चुकला, पाहा Video...
14
हा कुठला जज, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य; राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका
15
जगज्जेत्या संघावर बीसीसीआय खजिना रिता करणार? 2011 ला दुपटीने वाढवलेली रक्कम, यंदा किती देणार
16
TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण
17
शरद पवार पायी वारीत चालणार?; चर्चांवर स्वत:च केला खुलासा, म्हणाले...
18
विराटची निवृत्तीची घोषणा झाकोळली जाऊ नये; रोहितने मैदानावर निवृत्ती का टाळली?
19
'जे लोक मला एक टक्काही...', हार्दिक पंड्याने विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या
20
Bigg Boss OTT 3 मध्ये आज शॉकिंग एलिमिनेशन! अरमान मलिकची एक पत्नी घराबाहेर जाणार?

वीरश्रीची इतिश्री!

By admin | Published: January 06, 2016 11:18 PM

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांच्यातील या वीरश्रीची (अरेरे) अवघ्या काही तासातच इतिश्री झाल्याने साऱ्या सारस्वतपुत्रांना मोठा धक्का बसला असण्याची शक्यता आहे. आपल्याती वीरश्रीचा लोप पावल्यामुळेच की काय सबनीसांनी पुणे पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आणि पोलिसांनीही ती मोठ्या उदार अंत:करणाने मान्य केली. तसे करताना पोलिसांनी सुरÞक्षा व्यवस्थेचा कोणता दर्जा सबनीसांना देऊ केला हे मात्र कळावयास मार्ग नसल्याने पिंपरी-चिंचवडातील साहित्य संमेलनप्रसंगी संमेलनाध्यक्षांच्या पाठीमागे भिरभिरत्या नजरेचे ‘कॅलिश्नोव्ह’धारी उभे राहातात की कार्बाईनधारी उभे राहातात की चुरगळलेल्या ‘युनिफार्मात’ले मरगळलेले साधे छडीधारी उभे राहातात याचे दर्शन योग्य वेळ येईल तेव्हांच होईल. नरेन्द्र मोदी आज भले देशाचे पंतप्रधान असले तरी कोणे एकेकाळी ते आणि श्रीपाल सबनीस गोट्या, विटीदांडू, आट्यापाट्या आणि तत्सम खेळ खेळत असत याची भाजपावाल्यांना कल्पना नसल्याने श्रीपालांनी नरेन्द्राविषयी एकेरीतले जे उद्गार काढले त्यामागे अनादराची नव्हे तर मित्रत्वाची आणि याच मित्रत्वातून उपजलेल्या आपल्या सवंगड्याच्या प्राण रक्षणाच्या चिंतेची भावना होती हे तरी त्या बिचाऱ्यांना काय ठाऊक असणार? त्यामुळे त्यांना सबनीसांचा बरीक झणका आला आणि त्यांनी त्यांचे चरण कलम करण्याची धमकी दिली. खरे तर त्यात या चरणांचा काय दोष? आक्षेप नरेन्द्रभाईंबद्दल काढलेल्या लागट उद्गारांना होता ना, मग हे उद्गार ज्या जिव्हेतून बाहेर पडले ती जीभ हासडण्याची वगैरे धमकी दिली असती तर जरा मित्रपक्षालाही बरे वाटून गेले असते. पण येताजाता ‘पाय लागू’ संस्कृतीचा भाजपात प्रादुर्भाव झालेला असल्याने लक्ष जिभेकडे न जाता ते पायांकडे गेले असावे. तसेही त्या ऱ्हाळातले भाजपाचे नवजात खासदार अमर साबळे यांच्या मनीध्यानी नसताना त्यांच्या हाती पक्षाने खासदारकीचे घबाड ठेवल्याने अचानकपणे व अनपेक्षितपणे केल्या गेलेल्या या उपकाराची परतफेड करण्यासाठी किंवा गेला बाजार तसे करतो आहोत असे दाखविण्यासाठी अमरभाऊंना ज्या संधीचा शोध होता ती अनायसेच सापडून गेली. पण त्यांच्या या संधीवर आता त्यांच्याच पक्षाचे सरकार विरजण टाकील असा रंग आहे. तथापि सबनीसांचे एकूण रंग बघितल्यानंतर पाव शतकांपूर्वी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी जे म्हणून ठेवले, त्याची सय येते. पोषाखी साहित्य संमेलने नष्ट होतील वा व्हावीत असे ते म्हणाले होते. रोख त्यांचा उधळपट्टीवर होता. पण सालागणिक अध्यक्षपदाची रया संपत जाईल व त्या पदाचे पोतेरे करणारे लोक उदयास येतील असेही काही तर त्यांना अभिप्रेत नव्हते?