शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

‘विराट’ नेतृत्व

By admin | Published: January 25, 2017 1:07 AM

कसोटी मालिकेत इंग्लंडला एकतर्फी धूळ चारल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने क्रिकेटच्या या जन्मदात्याला नमवून निर्विवाद वर्चस्व मिळवले.

कसोटी मालिकेत इंग्लंडला एकतर्फी धूळ चारल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने क्रिकेटच्या या जन्मदात्याला नमवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुळात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४-० अशी बाजी मारल्यानंतर एकदिवसीय मालिकेत २-० अशा आघाडीनंतर भारताला इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याची संधी मिळाली होती. मात्र अखेरच्या थरारक सामन्यात मोक्याच्या वेळी चुका झाल्याने इंग्लंडला यंदाच्या भारत दौऱ्यात पहिला विजय मिळवण्यात यश आले. सध्या या मालिकेत भारताची युवा नेतृत्वाखाली ‘विराट’ घोडदौड सुरू आहे. आपल्या अनपेक्षित निर्णयाने क्रि केटविश्वाला नेहमी चकीत करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या काही दिवसआधीच त्याने मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. यामुळे कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या गळ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाचे कर्णधारपदाची माळ पडली. कर्णधार जेव्हा आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवतो तेव्हा निश्चित त्या संघाची कामगिरी वरचढ होते. विशेष म्हणजे, हेच गुण धोनी आणि कोहली यांच्यामध्ये आहेत. कोहलीच्या आक्रमक नेतृत्वामुळे संघातील खेळाडूंमध्येही आत्मविश्वास मिळाला आणि हेच केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीतून दिसून येते. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाची आक्र मकता इंग्लंडवर जबरदस्त भारी पडली. अंतिम सामन्यातही भारताने बेडरपणे खेळ करताना इंग्लंडला जेरीस आणले. परंतु, डेथ ओव्हरमधील माफक चुका भारतीयांना महागात पडली. नाहीतर, एकदिवसीय मालिकेत साहेबांचा क्लीन स्वीप निश्चित होता. आता, हीच चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना भारताची ‘विराट सेना’ सज्ज झाली आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघ टी-२० स्पेशालिस्ट असल्याने पुन्हा एकदा काटे की टक्कर पाहायला मिळेल, हे नक्की.