शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

By यदू जोशी | Updated: May 16, 2022 13:12 IST

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं.

>> यदु जोशी

देवेंद्र फडणवीस खरेच राममंदिर आंदोलनाच्या वेळी अयोध्येला गेले होते की नाही यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत संशय व्यक्त केला आहे. तेव्हा तुमचं वय किती होतं?, ती काय शाळेची सहल होती का?, या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना डिवचले. फडणवीस राम मंदिर आंदोलनाच्या वेळी शाळकरी होते, असा तर्क एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांची खिल्ली उडविली होती. १९९२ मध्ये बाबरी पडली तेव्हा फडणवीस केवळ तेरा वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस खरेच अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांच्यावर तेरा वर्षांच्या बालकाला अयोध्येस नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली होती. 

आता प्रश्न निर्माण झाला आहे तो हा की, फडणवीस खरेच अयोध्येला आंदोलनासाठी गेले होते का? उत्तर आहे होय! फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. पहिल्यांदा गेले तेव्हा ते  २० वर्षांचे होते आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा २२ वर्षांचे होते. सर्वात आधी ते ऑक्टोबर १९९० रोजी गेले होते पण प्रत्यक्ष अयोध्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून ते गेले होते. कार्यकर्ते, मित्रांसोबत ते रेल्वेगाडीने अलाहाबादला (आजचे प्रयागराज) गेले. तेथील सीताराम मंदिरात ते पाच दिवस राहिले. नंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वात अयोध्येकडे निघालेल्या शेकडो कारसेवकांसोबत ते अयोध्येच्या दिशेने निघाले आणि काही किलोमीटर पायी चालल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदायूच्या जेलमध्ये बंदिस्त केले. तेथे ते १७ दिवस राहिले. फडणवीस यांच्यासोबत त्यावेळी असलेले संजय बंगाले, उदय डबली, शशि शुक्ला या मित्रांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी तिथे मुलायमसिंह यांचे समाजवादी पार्टीचे सरकार होते. मात्र, बदायूचे जेलर रामभक्त होते. त्यांची पत्नी आणि दोन मुले राममंदिर आंदोलनात अटक करून प्रतापगडच्या तुरुंगात ठेवलेले होते अशी आठवण अ‍ॅड.उदय डबले यांनी सांगितली. 

६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. ते बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना ढाच्याजवळ आंदोलक म्हणून होते. त्यांच्यासोबतचा थापा नावाचा नागपूरहून आलेला कार्यकर्ता घुमटावर चढला होता. मी देखील ढाचाजवळ घोषणा देत पुढेपुढे सरकत होतो, असे फडणवीस यांचे मित्र आणि आता नागपुरात नगरसेवक असलेले संजय बंगाले यांनी सांगितले. '२ डिसेंबरलाच आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो आणि आमचा नागपूरचा मित्र  महेश रामडोवकर याचे नातेवाईक पुजारी असलेल्या काळा राम मंदिरात मुक्कामी होतो. ६ डिसेंबरला सकाळपासूनच अयोध्येतील वास्तूसमोर जाहीर सभा सुरू झाली होती. त्या ठिकाणी आम्ही होतो', असे फडणवीस यांचे बालमित्र हर्षल आर्विकर यांनी सांगितले. 

आधी फडणवीस पोहोचले अन् नंतर पोहोचले पत्र

तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईस पत्र पाठविले आणि जेलमध्ये आहे, पण जिवाला काही धोका नाही असे कळविले. आश्चर्याची बाब म्हणजे बदायूच्या जेलमधून सुटका होऊन फडणवीस ज्या दिवशी नागपूरला घरी परतले. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र त्यांच्या घरी आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा