शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

‘पाणी म्हणजे भाऊ’

By admin | Published: March 22, 2016 2:58 AM

धरण, बंधारे, तलाव यात साठविलेले पाणी लोकांना वाटण्याबाबत अनेकांनी मार्गदर्शन केले, संघर्ष पुकारले, लढे दिले. पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे अशी निघतील

धरण, बंधारे, तलाव यात साठविलेले पाणी लोकांना वाटण्याबाबत अनेकांनी मार्गदर्शन केले, संघर्ष पुकारले, लढे दिले. पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे अशी निघतील की ज्यांनी अगोदर निसर्गाने दिलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब न् थेंब अडवून व जिरवून, त्याचा रिसायकलिंगद्वारे वापर करून व ते शुद्ध करून उत्पादक कामासाठी त्याचा वापर केला. इतकेच नव्हे तर त्यातून लाखो लोकांना रोजगार देऊन त्यांचे प्रपंच उभे करतानाच देशाच्या तिजोरीतही कोट्यवधींची भर घालून शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात स्थिरता आणली आहे. हे काम करणारे भवरलालजी हे देशातील मोजक्या नामवंत व्यक्तींत व उद्योगपतींमध्ये गणले जातील. अलीकडेच २७ फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले आणि युनोने २२ मार्च हा जलदिन ‘पाणी आणि रोजगार’ या विषयासाठी अर्पण केला. त्यांच्या निधनानंतर हाच विषय चर्चेला यावा हा दुर्मिळ योग आहे.पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम आपण प्रभावीपणे ‘माथा ते पायथा’ या शास्त्रीय तत्त्वानुसार राबविला पाहिजे, असा नुसता आग्रह धरून मोठेभाऊ थांबले नाहीत. त्यांनी जळगावातील जैन हिल्सवरील हजारो एकरात, कोईमतूर, उदमलपेठ येथील तीन हजार एकरावर पाणलोट क्षेत्र विकासाचे सर्व उपचार शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करून स्वत:चे कोट्यवधी लिटर पाणी निर्माण केले. डोंगरावरील मातीची धूप होता कामा नये यावर भाऊंचा जेवढा कटाक्ष असे तितकीच बारीक नजर नदी, नाले, ओढ्यात वाहून येणाऱ्या पाण्यावरतीही असे कारण शक्यतो सगळे पाणी भूगर्भातच मुरले पाहिजे. त्यांनी केलेले सर्व हिरवेगार डोंगर व खालचे पाण्याचे भरलेले तुडुंब नाले पाहिले की पाणलोट क्षेत्र विकासाचे एक अतिशय उत्तम, दर्जेदार व शास्त्रशुद्ध मॉडेल म्हणून जैन हिल्सचा उल्लेख करावा लागेल व या क्षेत्रातले नि:पक्षपाती जाणकार तो करतातही.एवढे करून भाऊ थांबले नाहीत. पाण्याच्या प्रत्येक थेंबागणिक उत्पादन व उत्पादकता वाढली पाहिजे हे सूत्र समोर ठेवून ते काम करीत गेले. त्यातून डोंगरावर आंबा, व्ही-बारा जातीच्या कांद्याच्या बियाण्यांची निर्मिती, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्रा यांच्या नवीन वाणांची लागण केली. उत्पादित होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी जिथे कच्च्या मालाचे उत्पादन होते, तिथेच उभी करणे आणि स्थानिक मनुष्य रोजगारात सामावून घेणे हे पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाचे जे अंतिम ध्येय होते ते भवरलालजींनी देशात आणि परदेशात जवळपास २७ कारखाने (प्रकल्प) उभे करून प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखविले.ठिबकचे तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान १९८७ मध्ये पहिल्यांदा भवरलालजींनीच भारतात आणले. एका अर्थाने भारतातल्या ठिबक सिंचनतंत्राचे ते प्रणेते व प्रवर्तक आहेत. पण केवळ तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी तंत्रज्ञान व साहित्यात देशाच्या गरजेनुसार सुधारणा करून जगातले पहिल्या क्रमांकाचे ठिबक-तुषार संचाचे उत्पादक, पाईपचे निर्माते असा नावलौकिक प्राप्त केला. शेती, फळबागांची उभारणी, जनावरांचे संगोपन, त्यांच्यासाठी चारानिर्मिती, टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती, ग्रीनहाऊस उभारणी, सोलरपंप, फळ प्रक्रिया कारखानदारी उभी करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करतानाच शेतकऱ्यांकडून रास्त दराने शेतीत उत्पादित झालेल्या कच्च्या मालाची खरेदीही केली. त्यामुळे शेतकऱ्यांची दलाल-अडत्यांकडून होणारी फसवणूक व पिळवणूक थांबली.मोठ्या धरणांना त्यांनी कधीही प्राधान्य दिले नाही. ते पाणलोटाच्या कार्यक्रमासाठी सतत आग्रही असायचे. दुसऱ्यांना सांगणे सोपे असते, पण भाऊंनी दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी स्वत: हे सगळे केले. म्हणून त्यांच्या शब्दांना अनुभवांची झालर आणि धार होती. त्यामुळे ‘पाणी म्हटले की भाऊ’ हेच समीकरण डोळ्यांसमोर येते.- डॉ. सुधीर भोंगळे