शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
4
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
5
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
6
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
7
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
8
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
9
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
10
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
11
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
12
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
13
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
14
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
15
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
17
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
18
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
19
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
20
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप

असा गाढवपणा आम्ही पुन्हा पुन्हा करू !

By गजानन दिवाण | Updated: August 26, 2020 13:18 IST

परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण केलेले झाड खाऊन या गाढवाने पोलिसांच्या धाकालाच आव्हान दिले. व्हायचे तेच झाले. पोलिसांना घाबरायलाच हवे. त्यांना न घाबरण्याचा उद्दामपणा या गाढवाने केला. मग काय, सापळा लावून या गाढवाला पकडले गेले.

- गजानन दिवाण  ( उपवृत्त संपादक, लोकमत, औरंगाबाद )

शहाण्याने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये, असे म्हणतात. मी यात पोलीस ठाण्याची भर घालेन. म्हणजे सिग्नल तोडला नाही, असा वाद घालण्यापेक्षा माफी मागावी आणि सुटका करून घ्यावी. म्हणजे पोलिसांचा स्वाभिमान दुखावत नाही आणि आपल्यालाही फुकटचा मनस्ताप होत नाही. गाढवांना हे कसे कळणार? बीड जिल्ह्यात एका गाढवाने हीच चूक केली. गाढवच ते, कुठले काय खावे हे त्याला कसे कळणार? परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण केलेले झाड खाऊन या गाढवाने पोलिसांच्या धाकालाच आव्हान दिले. व्हायचे तेच झाले. पोलिसांना घाबरायलाच हवे. त्यांना न घाबरण्याचा उद्दामपणा या गाढवाने केला. मग काय, सापळा लावून या गाढवाला पकडले गेले. ठाण्याच्या आवारातच त्याला डांबण्यात आले. २४ तास अलर्ट असलेल्या सोशल मीडियाच्या नजरेतून हा गाढव कसा सुटेल? मग काय सोशल मीडियावर या गाढवाने चांगलाच गोंधळ घातला. काहींनी त्याच्या जमानतीचीदेखील तयारी सुरू केली. हा सारा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी शहाणपणा दाखवत गाढवाला सोडून दिले. असे काही घडलेच नाही, हे पोलिसांचे म्हणणे. खरे-खोटे पोलिसांना आणि त्या गाढवालाच ठाऊक!

झाड तोडणे हा गुन्हा आणि ते तोडणारा गुन्हेगार; पण झाडे तोडल्याच्या अशा किती प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत? वनविभागाचाच एक अहवाल पाहा. २०१३ ते २०१८ या पाच वर्षांत राज्यात ५ लाख ६१ हजार ४१० झाडांची बेकायदेशीर तोड झाली. २०१५ ते २०१९ या काळात देशभरातील ९४ लाख ९८ हजार ५१६ झाडे सरकारच्या परवानगीने तोडण्यात आली. झाडांची कत्तल करण्यात तेलंगणा (१५ लाख २६ हजार ६६३) नंतर आपल्याच राज्याचा नंबर लागला. महाराष्ट्राने १३ लाख ४२ हजार ७०३ झाडांवर सरकारच्या परवानगीने कुऱ्हाड चालविली. याच काळात राज्याने ५०२२ हेक्टर वनजमिनीवर नांगर फिरवून वेगवेगळे विकास प्रकल्प आणले. देशात असे जंगल तोडणारे राज्य म्हणून मध्यप्रदेश, ओडिशानंतर महाराष्ट्राने नाव केले. एकट्या मुंबईत विविध विकास प्रकल्पांसाठी २०१० ते २०१६ या काळात २५ हजार झाडे तोडल्याची तक्रार फडणवीस सरकारच्या काळात झाली. औरंगाबादेत गेल्या पाच वर्षांत जवळपास ३० टक्के झाडे तोडली गेली. समृद्धी महामार्गाने तर हजारो झाडांचा बळी घेतला. गेल्या काही वर्षांत रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालविली गेली. यातील किती प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले?

सरकारने एकीकडे अशी वृक्षतोड सुरू ठेवली असली तरी त्याचवेळी राज्यात २०२१ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही ठेवले. गेल्यावर्षी तर ३३ कोटी झाडे लावण्याची मोहीम जोरात पार पडली. त्याचे जबरदस्त ब्रॅण्डिंगही झाले. यातील ७७ टक्के झाडे जगली असल्याचा दावा राज्य सरकारने केला. विकासाच्या नावाखाली एकीकडे लाखो झाडांवर कुऱ्हाड चालविली हे खरे असले तरी  त्याचवेळी वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे देखील घेतली. त्यावर सरकारने कोट्यवधी रुपयांची उधळण केली म्हणून ओरड का करायची?  लाखो झाडे तोडली आणि कोटींमध्ये लावली. तुम्ही म्हणाल, एक झाड काय देते? एका व्यक्तीला साधारण ७४० किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड वर्षात १०० किलोपर्यंत ऑक्सिजन देते. एक झाड वर्षभरात २२ किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. एक झाड ६ टक्क्यांपर्यंत धूर-धुके कमी करते. एक झाड प्रदूषित हवेतून १०८ किलोपर्यंत लहान कण शोषून घेते.  

एका झाडाचे हे महत्त्व आमच्या राज्य सरकारलाही कळते आणि केंद्र सरकारला देखील. ते कसे?  समजा १० हेक्टरवरील झाडे तोडली गेली असतील तर एवढ्याच वनेतर जमिनीवर दुप्पट किंवा तिप्पट झाडे लावायची, हा सरकारी नियम. हे म्हणजे ‘आम के आम गुठलियोें के दाम’. तोडलेल्या झाडांच्या दुप्पट किंवा तिप्पट  झाडे लावली तर तोटा होतो कुठे? हे राज्य सरकारला कळते आणि केंद्रालाही कळते. म्हणून तर तोडलेल्या झाडांची अशी मोठी भरपाई केली जाते. भरपाईचे हे सरकारी गणित आमच्या परळी पोलिसांना कळले नाही. एका गाढवाने झाडाचे पत्ते काय खाल्ले, दिल्या बेड्या ठोकून. त्याला चक्क ठाण्याच्या आवारात आणून बांधले. सोशल मीडियावर या गाढवाने असा काही गोंधळ उडविला की पोलिसांना बेड्या काढणे भाग पडले. भरपाईच्या सरकारी नियमाप्रमाणे गाढवाने एक झाड खाल्ले म्हणून त्याच्या मालकाकडून पोलिसांनी दोन किंवा तीन झाडे लावून घेतली असती तर बिघडले थोडेच असते. 

टॅग्स :Policeपोलिसenvironmentपर्यावरणforestजंगल