शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

यातून काय साधले?

By admin | Published: January 24, 2017 1:07 AM

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे रविवारी विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय चाचणी परीक्षा (नेट) घेण्यात आली. या परीक्षेला

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे रविवारी विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय चाचणी परीक्षा (नेट) घेण्यात आली. या परीक्षेला विविध राज्यांतील परीक्षार्थी सामोरे जातात, त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाणही मुबलक आहे. व्याख्याता आणि फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे आजवरच्या परीक्षेतील परीक्षार्थी संख्येवरून लक्षात येते. सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या या परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांची गैरसोय कशी टाळता येईल यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने परीक्षा केंद्रांची संख्या फारच अल्प आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि नागपूर या पाचच केंद्रांवर सध्या ही परीक्षा घेतली जाते. आरोग्य विज्ञान विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशी दोन विद्यापीठे असलेल्या नाशिकसारख्या शहरातदेखील या परीक्षेसाठी केंद्र नाही. उपरोक्त पाच केंद्रांवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना रात्री-अपरात्री निघावे लागते. त्यासाठी त्यांना खूपच गैरसोयीला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्याऐवजी विद्यापीठ अनुदान आयोग अथवा सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनच्या व्यवस्थापनाकडून त्यात भर घातली जाणे मुळीच उचित नाही. रविवारच्या परीक्षेसाठी जळगाव, लातूर व साताऱ्यातील पाचशे विद्यार्थी केवळ एक ते दहा मिनिटे उशिरा आल्याबद्दल त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यात अंध विद्यार्थ्यांचाही समावेश होता. एकीकडे अंधांसाठी राज्य आणि केंद्रातील शासनाकडून विशेष योजना राबविली जाते आणि त्यांना सवलतीही दिल्या जात असताना या परीक्षा केंद्रावरील प्रशासनाने इतके निष्ठुरपणे वागणे न्यायोचित वाटत नाही. कोणतेही नियम सोय अथवा शिस्त म्हणून बनविले जातात, परंतु त्यांचा असा अतिरेक होऊ नये, ते विद्यार्थ्यांच्या भविष्यात आडकाठी ठरायला नकोत आणि पात्रता चाचणी शिक्षात्मक परीक्षा ठरता कामा नये. पुण्यातील या प्रकारातून नेमके काय साध्य झाले?