शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

माणसाचा प्राण जातो, तेव्हा नेमके काय होते?

By shrimant mane | Published: June 24, 2023 8:46 AM

जगभरातल्या संशोधकांना मृत्यूचे कुतूहल सततच राहिले आहे. ‘निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस’ अर्थात ‘एनडीई’चा अभ्यास काय सांगतो?

- श्रीमंत माने(कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)

मृत्यू म्हणजे काय, तो होतो म्हणजे नेमके काय होते, आपले धर्मग्रंथ व मिथके सांगतात तसे आत्मा शरीर बदलत राहतो का, प्रवचनकार सांगतात किंवा सिनेमात दाखवतात तसे खरेच दिव्याच्या स्वरूपात कुडीतून निघून जाणारा प्राण स्वत:चा चेहरा, निचेष्ट पडलेले शरीर पाहत आकाशाकडे जातो का? 

- माणसाला जन्मापेक्षा मरणाचे कुतूहल जास्त आहे हे खरेच. कारण, मृत्यूनंतर जिवाचे काय होते किंवा स्वर्ग, नरक खरेच अस्तित्वात आहेत का हे सांगायला कुणी परत येत नाही. अमूक एक असे असे होते म्हणजे नुसत्या कल्पनाच. त्यामुळेच विज्ञानापुढे हे मृत्यूचे गूढ उकलविण्याचे आव्हान मानले गेले. जे जे अज्ञात, गूढ त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न विज्ञान करते. म्हणून मृत्यूचे गूढ जाणून घेण्यासाठी होणारे प्रयोगही खूप. संशोधकांना मृत्यूचे कुतूहल, तर सामान्यांना अमरत्वाचे आकर्षण. अमर व्हायचे असेल तर मृत्यूची प्रक्रिया समजायला हवी. तरच ती थांबविण्यासाठी प्रयत्न करता येतील ना!  मेसोपोटेमियातील उरूकचा राजा गिल्गामेशच्या अनेक दंतकथांपैकी जगप्रसिद्ध कथा मृत्यूवर विजय मिळविण्यात आलेल्या अपयशाची आहे. आपण चक्रवर्ती सम्राट असूनही जीवलग मित्राचे प्राण वाचवू शकलो नाही, अमरत्व मिळाले नाही, ही त्याची निराशा. हिंदू संस्कृतीत अमरत्वासाठी केलेल्या तपश्चर्येच्या कितीतरी कथा आहेतच.

सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रेस्यूसिटेशनचा शोध लागेपर्यंत म्हणजे १९५९ पर्यंत असे मानले जायचे की हृदय बंद पडले म्हणजे मृत्यू झाला. सीपीआरमुळे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करण्याचे तंत्र गवसले. अनेकांचे जीव वाचू लागले. अगदी वीस मिनिटांपर्यंत बंद हृदय सुरू झाल्याच्या नोंदी आहेत. हृदय बंद पडणे म्हणजे मृत्यू नसल्याने असा पुनर्जन्म झालेल्यांचे अनुभव मृत्यूचे गूढ जाणून घेताना कामी येऊ लागले. त्या अवधीत काय झाले हे ते सांगू लागले. मेंदूतील काही पेशी मृत्यूनंतरही बराच वेळ कार्यरत राहतात, ते वेगळेच. 

त्याशिवाय अल्झायमर, डिमेन्शिया, स्क्रिझोफ्रेनिया यांसारख्या मेंदूशी संबंधित आजाराच्या रुग्णांचे अनुभव याबाबत लक्ष्यवेधी आहेत. न्यूयॉर्क लँगोन हेल्थचे फिजिशियन सॅम पर्निया, तसेच सेंटर फॉर हॉस्पाइन अँड पॅलियाटिव्ह केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तोफर केर यांनी केलेल्या स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांच्या अंतिम क्षणांच्या अभ्यासात आढळून आले, की मृत्यूच्या दारात पाेहोचल्यानंतर या रुग्णांची स्मरणशक्ती अचानक उसळी मारते. आप्तस्वकीय व मित्रमंडळींची नावेच नव्हे, तर अगदी लहानपणीच्या गोष्टी, नावे-गावे सारे काही चमत्कार वाटावे असे आठवायला लागते. ते चांगले बोलायला, खायला-प्यायला लागतात. हे मृत्यूच्या काही तासच नव्हे तर काही दिवस, काही महिनेही आधी होते. अवतीभोवती जमलेल्या नातेवाइकांच्या आशा पल्लवित होतात. त्यांना वाटते, की रुग्ण बरा झाला. प्रत्यक्षात तसे नसते. म्हणतात ना दिवा विझताना मोठा होतो. तसे हृदय कमकुवत होताच त्यांच्या मेंदूने दिलेला तो प्रतिसाद असतो. मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी झाला की तो मिळविण्यासाठी मेंदू अधिक कार्यशील होतो. वैद्यक विज्ञान त्याला होमिओस्टॅटिक मेकॅनिझम म्हणते. हा ‘लास्ट डिच एफर्ट’ असतो. हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास वाढतो. रुग्ण मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करीत असताे.

यासोबतच स्मृतिभ्रंशाचा आजार नसलेल्यांच्या अंतिम क्षणी मेंदूतील क्रियांविषयीचे काही अभ्यास अमेरिकेतील प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने केले आहेत. त्यांचे निष्कर्ष गेल्या मे महिन्यात जाहीर करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी याच संस्थेने उंदरांच्या मेंदूची सक्रियता मोजली होती. या दोन्ही अभ्यासांमध्ये सहभागी, मिशिगन विद्यापीठातील श्रीमती जिमो बोर्जिगिन यांच्या मते, या सगळ्यांच्या मुळाशी हृदयाची स्पंदने आहेत. हृदयविकारानंतर काही मिनिटांत मेंदूतील गॅमा लहरींची सक्रियता वाढते. त्यामुळे मेंदू अधिक ताजातवाना, अधिक सचेतन होतो. सारे काही आठवायला लागते. या अकस्मात सक्रियतेचे केंद्र कवटीच्या मागच्या बाजूला, पोस्टेरिअर कॉर्टिकल हॉटझोनमध्ये असते. आपण त्याला लहान मेंदू म्हणतो व शरीराचा सगळा तोल त्यावर अवलंबून आहे, असे मानतो. नाना पाटेकरांच्या भाषेत छोटा दिमाग!

याविषयीचे धार्मिक समज, श्रद्धा बाजूला ठेवून अभ्यासक वर्षानुवर्षे निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस अर्थात एनडीईचे संकलन करीत आले आहेत. अलीकडे अशा ६२५ जणांचे अनुभव नोंदले गेले. अर्थातच, ते भन्नाट आहेत. शरीर सोडून जात असतानाच्या संवेदना कोणत्या असतात, तर स्वत:चा चेहरा व अचेतन शरीर पाहत आपण दूर निघून जात असल्याचे, अगदी आनंदाने अंधारलेल्या बोगद्यातून चालत प्रकाशाकडे निघाल्याचे जाणवते. म्हणजे जीव स्वत:च प्रकाश बनतो किंवा तो प्रकाशाकडे चालू लागतो. पण, हे स्वप्न अथवा भ्रम नसतो. वास्तवातच तसे घडल्याचा अनुभव येतो. - पण, याबाबत थोडे सावध राहायला हवे. कारण, मादक द्रव्यांचे सेवन करणाऱ्यांचेही अनुभवही असेच आहेत. नैसर्गिकरीत्या मृत्यू समीप आलेल्यांच्या अनुभवांशी त्याचे कमालीचे साधर्म्य आहे. विविध प्रकारच्या १६५ मादक द्रव्यांच्या परिणामांचा अभ्यास केला असता, विशेषत: केटामाइन हे मादक द्रव्य सेवन करणाऱ्यास मृत्यूला स्पर्श केल्याची अवस्था प्राप्त होते. स्वत:चे अचेतन शरीर, शांत चेहरा पाहत आपण अनंताच्या प्रवासाला निघालो आहोत, ही ती अवस्था असते. 

टॅग्स :Deathमृत्यू