शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

By किरण अग्रवाल | Published: August 04, 2024 12:08 PM

Politics : राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या तरुणवर्गाने उद्दिष्टप्राप्तीचे भान राखणे गरजेचे

-  किरण अग्रवाल

 

राजकीय आंदोलनातील सहभागानंतर एका तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, ही घटना विषण्ण करणारीच आहे. या घटनेचे कोणतेही राजकारण न करता तरुण पिढीला आपण कोणती वाट दाखवीत आहोत, याचा विचार व्हायला हवा.

खरे तर राजकारणाच्या व्याख्या व उद्दिष्टे अलीकडच्या काळात बदलून गेली आहेत, तरी अंतिमत: ते करायचे कशासाठी? तर समाजाच्या व गाव- शहराच्या विकासासाठी, हे विसरता येत नाही; परंतु याच राजकारणातून एखाद्या उमेदीच्या तरुणाला जीव गमावण्याची वेळ येते तेव्हा दृष्टीआडच्या बाबींकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक ठरते.

राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते न राहता आता सदा सर्वकाळ, बारमाही स्वरूपाचे झाले आहे. आता आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून लोक विकासासाठी मात्र हातात हात घेऊन काम करणारे नेते बघायला मिळत; मात्र असे राजकीय सामंजस्य आता दुर्मीळ होत चालले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांची, टीका-टिप्पणीची पातळी व्यक्तिगत स्तरापर्यंत घसरली आहे. त्यामुळे अनावश्यकपणे एकमेकांकडे जणू शत्रू असल्यासारखे बघितले जाऊ लागले आहे. यात नेत्यांमध्ये प्रसंगी समझोते होतातही; परंतु स्थानिक पातळीवर कार्यकर्ते जे आपसांत भिडून परस्परांशी वैर पत्करून बसतात; ते सहजासहजी संपुष्टात येत नाही.

महत्त्वाचे म्हणजे, राजकीय अस्तित्वासाठीची उपक्रमशीलता गैर नसतेच; त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ती प्रदर्शित होते तेव्हा भलेही सामान्यांचा त्यात सहभाग लाभो अगर न लाभो; परंतु ती टीकेची बाब ठरत नाही. अलीकडे मात्र सामान्यांच्या मुद्यांऐवजी पक्ष व नेत्यांबद्दलच्या निष्ठा व्यक्त करण्यासाठी आंदोलने होऊ लागली आहेत. ती करतानाही जेव्हा भान न बाळगता आक्रमकताच अंगीकारली जाते तेव्हा अनपेक्षित प्रकार घडून येतात जे नेत्यांसाठी भलेही सुखावह ठरत असतील; परंतु सामान्यांमध्ये मात्र प्रश्न निर्माण करणारेच ठरतात. राजकारण व राजकारण्यांबद्दलची ‘निगेटिव्हिटी’ वाढण्यासच त्यामुळे मदत होते. दृष्टीआडच्या या बाबी आहेत; पण त्याबद्दल गांभीर्याने कोणीही विचार करताना दिसत नाही.

आमदार अमोल मिटकरी यांनी ‘मनसे’चे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका करताना कथित आक्षेपार्ह शब्द वापरल्याने अकोल्यात त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. यात आरोपी ठरलेले सर्वच कार्यकर्ते काही पूर्णवेळ राजकारण करणारे नाहीत. आपला उदरनिर्वाह, चरितार्थ चालवून राजकारणाद्वारे काही चांगले करून दाखविण्याची धडपड करणारे कार्यकर्ते आहेत; पण आततायीपणा करून बसले. कोणाच्या सांगण्याला भरीस पडून त्यांच्याकडून हे कृत्य घडले व कारवाई वगैरे बाबी हा पोलिसांच्या तपासणीचा भाग आहे; पण अकोल्यासारख्या ठिकाणीही अशा पातळीपर्यंत राजकारण घसरते, हे शोचनीयच म्हणायला हवे.

याच आंदोलनात सहभागी एक तरुण, जो वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भविष्याची स्वप्ने रंगवण्याच्या वयात होता. त्याला घटना घडून गेल्यानंतर अचानक अस्वस्थता वाटू लागली व त्यातच पुढे हृदयविकाराने त्याचा जीव गेला, ही अतिशय दुःखद घटना! नेमके काय व कशामुळे झाले, हे तपासात पुढे येईलच; परंतु जे घडले ते दुर्दैवी आहे. राजकारण व अनुषंगिक बाबी ठेवा बाजूला; पण एक तरुण जीव असा गमावला गेला व संबंधित कुटुंबीयांवर हकनाक दुःखाचा डोंगर कोसळला; ही यानिमित्ताने राजकीय प्रवाहात अनायासे ओढले जाणाऱ्या तरुणांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी बाब ठरली आहे.

जय मालोकार या तरुणाच्या मृत्यूचे राजकारण अजिबात कुणी करू नये, पक्षाचे लेबल चिकटवूनही त्याकडे कोणी पाहू नये. पाहायचेच तर एवढेच पाहा की, एका वेगळ्या आशा-अपेक्षेतून, ऊर्मीतून जो तरुणवर्ग राजकारणाकडे वळू पाहतो आहे त्या तरुणाईत याच स्तंभाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे राजकारण करायचे कशासाठी? यासंबंधीची जाण व भान कसे जागविता येईल? कारण बाकी काहीही होऊ द्या; पण जीव जाण्यास यत्किंचितही कारण ठरणारे राजकारण घडता कामा नये.

सारांशात, व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांच्या व असंवैधानिक मार्गाचा अवलंब घडून येणाऱ्या राजकारणातून कुणाचेही भले होत नसते. तरुणवर्गाने वाहवत जाऊन राजकारण करण्याऐवजी यासंबंधीचे भान बाळगणे गरजेचे आहे.