शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

महाराष्ट्र कुठल्या नशेने झिंगला आहे?

By सुधीर लंके | Updated: October 11, 2023 08:07 IST

नाशिक, पुण्यासारखी शहरे अमली पदार्थांमुळे गाजत आहेत. शाळेजवळील गुटख्याची टपरी हटवल्याने नगरमध्ये मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला झाला. चाललेय काय?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

सामाजिक कार्यकर्ते व अहमदनगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला. शाळेसमोरील गुटख्याची टपरी त्यांनी प्रशासनाच्या मदतीने हलवली. या बाबीचा सूड उगविण्यासाठी टपरीचालकाने थेट सुपारी देऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिक्षक हा गाव सुधारण्यासाठी भूमिका घेणारा हवा. बनगरवाडी कादंबरीने तेच सांगितले. ‘पिंजरा’ चित्रपटातील सुरुवातीचा शिक्षकही असाच गावाला वळण लावणारा दाखविला आहे; पण येथे एक शिक्षक ‘शाळेच्या शंभर यार्ड परिसरात गुटखा, तंबाखू विकता येत नाही’ या सरकारच्या आदेशाचेच पालन करतो म्हणून ‘टार्गेट’ होतो. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. कारवाई करण्याचे आश्वासन दिले; पण या घटनेचे मूळ महाराष्ट्र समजून घेईल का? आपल्या गावातील शिक्षकावर हल्ला होत असताना अहमदनगर महापालिकेने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  आपली गावे, शहरे यांना वळण लागावे ही गरज मुळात समाजाला वाटते आहे का, हा प्रश्न यातून निर्माण होतो. सध्या पुणे व नाशिक ही दोन शहरे अमली पदार्थांच्या विक्रीमुळे गाजत आहेत. अमली पदार्थ विक्रीचा सूत्रधार असलेला आरोपी ललित पाटील हा रुग्ण म्हणून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तेथून तो अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता ही बाब समोर आली आहे. गरीब रुग्णांना सरकारी दवाखाने लवकर बेड देत नाहीत; पण ललित पाटीलसाठी तो कायम राखीव होता. त्याच्यावर उपचाराची गरज आहे, असे अहवाल डॉक्टरांनी दिले व त्याला महिनोन्महिने ससूनमध्ये ठेवले. यासाठी तो रुग्णालय प्रशासनाला दर दिवशी ७० हजार रुपये मोजत होता, असे धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत; पण एवढे होऊनही ससूनच्या अधिष्ठात्यासह कुणाचेही काही वाकडे झालेले नाही. ललित पाटील व त्याचा भाऊ महागडे अमली पदार्थ बनवत होते. त्यांच्या नाशिकमधील कारखान्यावरही या आठवड्यात पोलिसांनी छापे टाकून ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ‘एमडी’ (मेफेड्रोन पावडर) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पुणे व नाशिक ही दोन शहरे यानिमित्ताने चर्चेत आली आहेत. ‘माओ’ म्हणाला होता, ‘कॅच देम यंग’. जगभरातील बहुतांश चळवळींचा व प्रशासनाचाही हा अजेंडा राहिलेला आहे की ‘कॅच देम यंग’. याचा अर्थ तरुणांना जवळ करा; पण अमली पदार्थ विक्रेते व व्यसनांचा व्यापार करणाऱ्यांचाही ‘तरुण’ हाच अजेंडा दिसतो आहे. नाशिकमध्ये ‘एमडी’ या अमली पदार्थाला तरुण महाविद्यालयीन मुले बळी पडत आहेत म्हणून नागरिक चिंतेत आहेत. गत आठवड्यात नाशिक शहरात एक फलकच लागला होता ‘उडता पंजाब, सडता नाशिक’. पंजाबमध्ये मुले मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले. त्यावर ‘उडता पंजाब’ हा चित्रपट साकारला. ‘एमडी’ हा अमली पदार्थ सेवन केला की माणूस त्या नशेत धुंद होतो व हवी ती कृत्ये करतो अशी ही झिंग आहे. पुण्यात व नाशिकमध्ये जे रॅकेट समोर आले त्यात राजकीय आरोप- प्रत्यारोपही सुरू आहेत. राजकारण्यांचाच अवैध धंद्यांना वरदहस्त आहे, असा आरोप झाला आहे. गुटखा व मावाबंदी असली तरी या बाबी राजरोस विकल्या जातात. या मागील कारण उघड आहे.

राजकारणासाठी पैसा लागतो. हा पैसा बहुधा समाजाला झिंगवत ठेवतच उभारावा लागतो. समाज झिंगत राहिला तर कदाचित राजकारण निर्धोक चालत असावे. राजकारण तसेच समाज या दोन्ही ठिकाणची मूल्यव्यवस्था हरवली आहे. त्यामुळे ही झिंग आणखी चढत जाणार. हेरंब कुलकर्णी यांनी अनेक शाळांचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिले आहे, ‘शाळा आहे; पण शिक्षण नाही’. तेच वास्तव असावे. ससून रुग्णालय आरोपीला ड्रग्ज विकण्यासाठी हातभार लावत असेल तर संबंधितांनी नेमकी कुठली पदवी घेतली आहे, हा प्रश्न पडतोच. प्रश्न शाळा, महाविद्यालयात मिळणाऱ्या मूल्यांचाही आहे. या संस्था शाबूत राहिल्या तरच मूल्ये टिकतील, अन्यथा झिंग, हल्ले वाढत जाणार. ‘पिंजरा’ चित्रपटाचा उत्तरार्थ हेच सांगतो.

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्र