शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पाकिस्तानात पुढे काय? २६६ पैकी सर्वाधिक शंभरच्या आसपास जागा अपक्षांनीच जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 07:22 IST

ही समस्या सोडविण्यासाठी पीटीआय पक्ष आता अन्य एका छोट्या पक्षात विलीन होण्याच्या विचारात असल्याचे आणि त्या दृष्टीने वाटाघाटीही सुरू झाल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही, संपूर्ण निकाल अद्याप घोषित झाले नसून, जाहीर झालेल्या निकालांनुसार कोणत्याही पक्षाला बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यामुळे जन्मापासूनच अस्थिरता पाचवीला पुजलेल्या पाकिस्तानात पुढे काय, हा यक्ष प्रश्न पुन्हा एकदा उभा ठाकला आहे. हा मजकूर लिहीत असताना, पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेम्ब्लीच्या, मतदान पार पडलेल्या २६६ जागांपैकी २५३ जागांचे निकाल घोषित झाले होते. सर्वाधिक म्हणजे शंभरच्या आसपास जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या असून, त्यामध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे समर्थन प्राप्त असलेल्या ९३ उमेदवारांचा समावेश आहे. गत डिसेंबरमध्ये पीटीआय पक्षाचे निवडणूक चिन्ह क्रिकेट बॅट गोठविण्यात आल्याने, त्या पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज  (पीएमएलएन) पक्षाला अपक्षांच्या खालोखाल ७१ जागांवर विजय मिळाला आहे.

तिसऱ्या क्रमांकावर भुट्टो कुटुंबाचे वर्चस्व असलेला पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) पक्ष असून, त्या पक्षाला ५४ जागा जिंकता आल्या आहेत. थोडक्यात, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवता आलेले नाही. ताज्या निवडणूक निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे, चक्क अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय निवडणुकीत असे यापूर्वी कधी घडले असेल, असे वाटत नाही. या परिस्थितीत पाकिस्तानात नव्या सरकारचे गठन होणार तरी कसे, हा प्रश्न सगळ्यांनाच छळू लागला आहे. पीएमएलएन आणि पीपीपी हे दोन पक्ष पारंपरिक प्रतिस्पर्धी असून, त्या दोन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करायचे म्हटले तरी, त्यांचा एकत्रित आकडा बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचत नाही.

याचाच अर्थ अपक्षांची मदत घेतल्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही. दुसरीकडे इम्रान खान यांचे समर्थन प्राप्त असलेल्या विजयी अपक्ष उमेदवारांनी एकसंघ राहण्याचे ठरविल्यास तेदेखील तांत्रिकदृष्ट्या सरकार स्थापन करू शकतात; पण त्यांनाही इतर अपक्ष, तसेच उपरोल्लेखित दोनपैकी एका पक्षाच्या समर्थनाची गरज भासेलच! मुळात असे होण्याची शक्यताच दुरापास्त आहे आणि झाले तरी, सत्तेत येणारे सरकार कमकुवत असेल, अनेक जणांच्या मेहरबानीवर विसंबून असेल आणि त्यापैकी काही जणांनी ठरविल्यास कधीही कोसळू शकेल! त्यामधील आणखी एक गोची ही आहे, की पाकिस्तानातील तरतुदीनुसार, निवडणूक होणाऱ्या २६६ जागांशिवाय नॅशनल असेम्ब्लीच्या उर्वरित ६० जागा महिला आणि अल्पसंख्याक समुदायासाठी राखीव असतात आणि विविध राजकीय पक्षांमध्ये, त्यांनी जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात त्या ६० जागांची वाटणी होते. स्वाभाविकच अपक्षांच्या समूहास त्या जागांमधील हिस्सा मिळू शकणार नाही आणि त्यामुळे त्यांनी तूर्त बहुमताचा आकडा गाठला तरी तो टिकविणे अवघड होऊन बसेल! शिवाय इम्रान खान यांना पीएमएलएन किंवा पीपीपी या दोनपैकी एकाही पक्षाशी हातमिळवणी करायची नाही. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी पीटीआय पक्ष आता अन्य एका छोट्या पक्षात विलीन होण्याच्या विचारात असल्याचे आणि त्या दृष्टीने वाटाघाटीही सुरू झाल्याचे वृत्त आहे; परंतु त्या मुद्यावरही त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे पाकिस्तानात पुढे नेमके काय होईल, सरकारचे गठन होईल अथवा नाही, झाले तर कोणते पक्ष त्यामध्ये सहभागी असतील, यासंदर्भात सारीच अनिश्चितता आहे.

ही बाब  पाकिस्तानच्या सत्तेत नेहमीच स्वारस्य राखून असलेल्या लष्कराच्या पथ्यावर पडणारी आहे. पाकिस्तानी राजकारणाच्या काही अभ्यासकांचे तर असे मत आहे, की प्रत्येक निवडणुकीत कोणत्या तरी राजकीय पक्षाची तळी उचलून धरणाऱ्या लष्कराने यावेळी जाणीवपूर्वक कोणत्याही पक्षाला पुरस्कृत केले नाही, जेणेकरून निवडणुकोत्तर अनिश्चितता आपल्या पथ्यावर पडावी आणि सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात राहाव्यात! त्यामध्ये तथ्य असल्यास निवडणुकीत पाकिस्तानी लष्करच जिंकल्याचे म्हणता येईल! ही निवडणूक पाकिस्तानला अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या भोवऱ्यातून बाहेर काढून स्थैर्य प्रदान करील आणि कंगाल झालेला देश त्यातूनच प्रगतीच्या वाटेवर पुढे जाऊ शकेल, अशी सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांची अपेक्षा होती; पण तूर्त तरी ती फोलच ठरल्याचे दिसते!

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकImran Khanइम्रान खानNawaz Sharifनवाज शरीफ