शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

होईल का महासत्ता?

By admin | Published: September 30, 2016 4:22 AM

शिक्षण हा मूलभूत अधिकार असलेल्या भारतवर्षात जवळपास साडेआठ कोटी मुले शाळेत जातच नाहीत. दरवर्षी २० ते २५ कोटी मुले शाळेत प्रवेश घेतात पण त्यांच्यापैकी एक तृतीयांश मुलांनी

शिक्षण हा मूलभूत अधिकार असलेल्या भारतवर्षात जवळपास साडेआठ कोटी मुले शाळेत जातच नाहीत. दरवर्षी २० ते २५ कोटी मुले शाळेत प्रवेश घेतात पण त्यांच्यापैकी एक तृतीयांश मुलांनी कधी शाळेचे तोंडही बघितले नाही, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कुठल्याही देशाचा विकास आणि जडणघडणीत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवढे शिक्षित नागरिक तेवढा तो देश अधिक समृद्ध समजला जातो. त्यामुळे शिक्षणाची होणारी हेळसांड आणि दुरवस्था बघितल्यावर हा देश कुठल्या बळावर जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो, हेच कळत नाही. विशेष म्हणजे शाळाबाह्य मुलांचा हा आकडा इ.स.२०११ च्या जनगणनेतील आहे. त्यानंतरच्या पाच वर्षात ही संख्या कितीतरी वाढली असणार, हे वेगळे सांगायला नको. जनगणनेच्या अलीकडेच प्रसिद्ध विश्लेषणानुसार ही मुले ५ ते १७ वयोगटातील असून शाळाबाह्य मुलांचे हे प्रमाण शिक्षणाधिकार कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वयोगटाच्या २० टक्के एवढे आहे. याशिवाय सुमारे ७८ लाख मुलांना शिक्षण घेत असतानाच पैसे कमविण्यासाठी काम करण्यास बाध्य केले जात असल्याचेही हे विश्लेषण सांगते. शासनाने वयाच्या १४ व्या वर्षापर्यंतचे शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले असताना कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित राहात असतील तर ही कुणाची जबाबदारी समजायची? वयाच्या १८ व्या वर्षानंतर या मुलांची गणना निरक्षरांमध्ये केली जात असते. अशा परिस्थितीत शाळाबाह्यांची ही आकडेवारी बघता भारतातील ७५ टक्के लोक साक्षर असल्याचा सरकारचा दावा किती फोल आहे ते लक्षात येते. याचाच अर्थ असा की आपण केवळ आकडे फुगवून शेखी मिरविताना या कोट्यवधी निरक्षर मुलामुलींकडे मात्र दुर्लक्ष करीत आहोत. शासनाने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क देणारा कायदा तर तयार केला पण त्याच्या अंमलबजावणीकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. आपल्या मुलांना शाळेत न पाठविता कामास जुंपणाऱ्या पालकांवर कुणाचा अंकुश नाही. याशिवाय शिक्षणाचा अफाट खर्च हे सुद्धा या शाळाबाह्य मुलांच्या संख्यावाढीमागील महत्त्वाचे कारण आहे. हा अवाढव्य खर्च या देशातील गरीब जनतेला परवडणारा नाही. दोन वेळ पोटाची खळगी भरणे जेथे शक्य नाही तेथे महागड्या शिक्षणाचा विचारही ते करु शकत नाहीत. परिणामी लाखो गरीब लोक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी बालवयातच कामाला जुंपतात. आणि यातच त्यांचे भविष्य असल्याचा त्यांना ठाम विश्वास वाटत् असावा. शिक्षणाची ही उपेक्षा गंभीर चिंतेचा विषय आहे. शेवटी प्रगतीचा मार्ग हा शिक्षणातूनच जात असतो आणि हा मार्गच खुंटला तर आम्ही प्रगती कशी साधणार? याचा सारासार विचार सरकार, राजकीय नेते आणि पालकांनी करावयास हवा.