शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘टोल’धाड कधी थांबेल? महाराष्ट्र टोलमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 07:29 IST

राज्यातील जनतेला वाटले की, बस्स, महाराष्ट्र टोलमुक्त झालाच; पण तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही. 

महाराष्ट्रात गेला महिनाभर महामार्गावर होणाऱ्या टोलवसुलीच्या विषयावर राजकीय रणकंदन झाले. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक असते आणि त्यांच्या आंदोलनामुळे काही वर्षांपूर्वी राज्यातील काही टोलनाके बंदची घोषणा सरकारला करावी लागली होती. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्याच्या प्रवेशद्वारांवरील टोलवसुलीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची दखल घ्यावी लागली. सरकारमधील मंत्री थेट राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि यशस्वी वगैरे तोडगाही निघाला. राज्यातील जनतेला वाटले की, बस्स, महाराष्ट्र टोलमुक्त झालाच; पण तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही. 

कित्येक वर्षांनंतर जे महामार्ग आता कुठे टोलमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तिथेही वाढत्या रहदारीमुळे मार्गिका वाढविण्याचे प्रस्ताव तयार आहेत. यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे उदाहरण देता येईल. दोन महानगरे जोडणारा हा एक्स्प्रेस वे अठ्ठावीस वर्षांपूर्वी बांधला गेला. नंतर अधूनमधून त्याची दुरुस्ती केली गेली. काही नव्या लेन वाढविल्या गेल्या. त्यामुळे त्यावरील टोलवसुली पुढच्या २०४५ पर्यंत चालेल. 

दररोज तब्बल ५५ लाख वाहनांची ये-जा होणारा हा महामार्ग अपुरा पडत असल्याने आता रस्ते विकास महामंडळाने अंदाजे पाच हजार कोटींचा आठपदरी मार्गाचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. या खर्चाची सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी, असे महामंडळाचे म्हणणे आहे. तसे होण्याची शक्यता कमी आहे. कारण, सरकारचे टोलव्यवस्थेवरील प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे महामंडळ या कामासाठी निधी उभा करेल आणि त्यामुळे अनिश्चित काळासाठी तिथली टोलवसुली सुरू राहील. या पृष्ठभूमीवर, हे लक्षात घ्यायला हवे की, कोणताही रस्ता जनतेच्याच पैशाने बनतो. सरकारकडून थेट अर्थसंकल्पात तरतूद झाली तरी तो पैसा जनतेकडून कररूपाने वसूल करण्यात आलेला असतो आणि खासगी गुंतवणूकदारांनी बांधला तर थेट टोलच्या माध्यमातून त्याची वसुली होते. आणि मुळात या टोल व्यवस्थेवर कुणाचाही अंकुश नाही. 

एखादा रस्ता किंवा महामार्गाच्या बांधकामावर खर्च किती झाला आणि खासगी गुंतवणूकदाराने किती टोल वसूल केला, याची उपलब्ध होणारी आकडेवारी विश्वासार्ह नाही. त्यात चोरीचपाटी होत असावी, असा संशय नेहमीच व्यक्त होतो. जो प्रचंड खर्च दाखविला जातो, त्याच्या तुलनेत रस्त्याचा दर्जा अगदीच दुय्यम असल्याची आणि त्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. हे फक्त खासगी वसुलीच्या स्थितीतच होते, असे नाही. अलीकडे अपघाती मृत्यूंमुळे चर्चेत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर साधारणपणे पन्नास हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि त्याचा ठाणे जिल्ह्यातील टप्पा पूर्ण होईपर्यंत हा खर्च सत्तर- ऐंशी हजार कोटींच्या घरात जाईल. हा पैसा खासगी गुंतवणूकदारांकडून उभा करण्यात आलेला आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडूनच या महामार्गावर टोलवसुली केली जाते. 

तथापि, प्रचंड गुंतवणुकीच्या तुलनेत सध्या त्यातून जेमतेच पाचशे-साडेपाचशे कोटी रुपये वसूल होत आहेत. त्यामुळे हा महामार्ग गुंतवणुकीचा परतावा नेमका कधी पूर्ण करेल हे कोणीही सांगू शकत नाही. तो पेच कायम असतानाच नागपूर ते गोवा असा दक्षिण महाराष्ट्रातून जाणाऱ्या नव्या महामार्गाचा प्रस्ताव तयार आहे. टोलवसुलीचा कालावधी हादेखील वादग्रस्त मुद्दा आहे. राज्यकर्ते पुढारी, बांधकाम खात्यातील अधिकारी आणि रस्ते बांधकामातील खासगी गुंतवणूकदार यांची अशी एक साखळी तयार झाली आहे की, रस्ता छोटा असो की मोठा, महत्त्वाचा असो की बिनमहत्त्वाचा, एकदा टोलवसुली सुरू झाली की तहहयात ती सुरू राहील, याची काळजी हे सगळे घटक घेतात. 

वाहनचालकांच्या खिशातून ती रक्कम निघत राहते. टोलच्या संदर्भात नेहमी चर्चा होते ती प्रवासी वाहनांची; पण या वसुलीच्या साखळीची गोम तिथे नाहीच. अनेकांच्या ही गोष्ट खिजगणतीतही नसते की, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून होणारी वसुली हे तिथल्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे आणि वाहतूकदार भरतात तो टोल पुन्हा बाजारात ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जातो. इंधनावरील खर्चाइतकाच हा टोलचा खर्चही महागाई वाढविण्यास कारणीभूत ठरतो. म्हणूनच या वसुलीला ‘टोलधाड’ म्हणत असावेत आणि एकूणच सरकारी धोरणातील ‘टोलप्रेम’ लक्षात घेतले तर दुर्दैवाने हे दुष्टचक्र संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

 

टॅग्स :tollplazaटोलनाका