शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

ही मग्रुरी येते कोठून?

By admin | Published: May 11, 2016 2:50 AM

निवडणूक काळात मतदारांना चरणस्पर्श करून मतांची भीक मागणारे उमेदवार विजयाची माळ गळ्यात पडल्यानंतर आपले खरे रूप दाखवायला सुरुवात करतात हे सर्वज्ञात आहे.

निवडणूक काळात मतदारांना चरणस्पर्श करून मतांची भीक मागणारे उमेदवार विजयाची माळ गळ्यात पडल्यानंतर आपले खरे रूप दाखवायला सुरुवात करतात हे सर्वज्ञात आहे. त्यातील काहीजण खरोखर आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेने वागतात व तेच खरे जनतेच्या गळ्यातील ताईत ठरत असतात; परंतु केवळ स्वार्थासाठी मूळ चेहरा झाकून बनावट मुखवट्याने जनतेसमोर जातात, ते नंतर जनतेकडे पाठ फिरविल्यावाचून राहत नाहीत. काही जणांच्या वागण्या-बोलण्यातही कमालीचा जो बदल होत असतो, त्यास सत्तेची केवळ नशा असेच म्हणता येईल. लोकप्रतिनिधीने त्याचे रूप बदलणे हे समजू शकते; पण त्याचे कुटुंबीय जेव्हा सर्वसामान्यांशी हुकूमशाही वृत्तीने वागू लागते तेव्हा त्यास सत्तेची मग्रुरीच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या मग्रुरीचे दर्शन बिहारमधील जदयूच्या आमदार मनोरमादेवी यांचा पुत्र रॉकी यादवने घडविले आहे. आपल्या वाहनास ओव्हरटेक केले म्हणून रॉकीने आदित्य सचदेव नामक वीस वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्त्या केली. या घटनेनंतर आमदारांचे पती आणि अंगरक्षकास अटक झाली मात्र मूळ आरोपी अद्याप फरारच आहे. दहशत, गुन्हे, घात याबाबत बिहारचा हात कोणी धरू शकणार नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे अशा घटना बिहारसाठी नव्या राहिलेल्या नाहीत. मुळात बिहार अथवा अन्य प्रांत हा मुद्दा याठिकाणी महत्त्वाचा नाही. दोष प्रवृत्तीचा आहे. अशा घटना प्रत्येक राज्यात घडतात, त्यास महाराष्ट्रदेखील अपवाद राहिलेले नाही. सत्तेतून आलेली मग्रुरी ठेचूनच काढायची असेल तर जनतेशी उद्धट आणि उर्मटपणे वागणारी अशी बेदरकारी मग ती कोणाचीही असो, ती मोडून काढायला हवी. असे पाऊल उचलले गेले तर कायदा सर्वांसाठी समान आहे, असा संदेश जनतेत आपसूकच पोहचल्यावाचून राहणार नाही.